पोस्ट्स

बातमी जनहित लेबलसह पोस्ट दाखवत आहे

एका रात्रीत गायब झाले संपूर्ण गाव ? न सुटलेले रहस्य ?

*एका रात्रीत गायब झालेले संपूर्ण गाव: 'कुलधरा'चे न सुटलेले रहस्य*  इतिहासामध्ये अनेक अशी रहस्ये दडलेली आहेत, ज्यांची उत्तरे आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानालाही आजपर्यंत शोधता आलेली नाहीत. असंच एक अंगावर काटा आणणारं आणि विचार करायला लावणारं रहस्य राजस्थानच्या वाळवंटात दडलं आहे. एकाच रात्रीत तब्बल १५०० लोक राहते घरदार सोडून अचानक गायब होतात आणि जाताना त्या जागेला एक असा शाप देतात की, त्यानंतर पुढील २०० वर्षे तिथे पाखर  देखील फिरत नाही! हे काल्पनिक चित्रपट किंवा कादंबरीचे कथानक नसून, राजस्थानमधील कुलधरा'या गावाचे जळजळीत सत्य आहे. राजस्थानमधील ऐतिहासिक जैसलमेर शहरापासून साधारण १८ किलोमीटर अंतरावर असलेले 'कुलधरा' हे गाव १३ व्या शतकात पालीवाल ब्राह्मणांनी वसवले होते. हे ब्राह्मण अत्यंत बुद्धिमान, कष्टाळू आणि जलव्यवस्थापनात पटाईत होते. वाळवंटी भागातही त्यांनी शेती फुलवली होती. उत्कृष्ट वास्तुकलेची साक्ष देणारी दुमजली पक्की घरे, विहिरी आणि मंदिरांनी हे गाव नटलेले होते. कुलधरा आणि आसपासची अशी ८४ गावे पालीवाल ब्राह्मणांच्या समृद्धीने ओसंडून वाहत होती. साधारण १८२५ च्या सुमारास ...

स्वतःला येशू मसिहा समजत होता...* व्हाइट हाऊसबाहेर थरार! सुरक्षा रक्षकांवर अंदाधुंद गोळीबार करणारा तरुण ठार;

इमेज
*स्वतःला येशू मसिहा समजत होता...*   व्हाइट हाऊसबाहेर थरार! सुरक्षा रक्षकांवर अंदाधुंद गोळीबार करणारा तरुण ठार;   *वॉशिंग्टन* :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवासस्थान असलेल्या 'व्हाइट हाऊस'च्या परिसरात शनिवारी संध्याकाळी गोळीबाराची एक धक्कादायक घटना घडली. एका २१ वर्षीय तरुणाने थेट व्हाइट हाऊसच्या सुरक्षा रक्षकांना लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला. यावर 'सीक्रेट सर्व्हिस'च्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाला आहे. नसीर बेस्ट असे या मृत हल्लेखोराचे नाव असून, त्याच्याबाबत आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. *नेमका कसा झाला हल्ला?** मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास व्हाइट हाऊसपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या '१७वी स्ट्रीट आणि पेनसिल्वेनिया आव्हेन्यू NW' या सुरक्षा रक्षकांच्या चेक पॉइंटजवळ हा प्रकार घडला. आरोपी नसीर बेस्ट याने अचानक आपल्या बॅगेतून बंदूक काढली आणि तैनात अधिकाऱ्यांच्या दिशेने थेट फायरिंग सुरू केली. त्याने जवळपास २० ते ३० राऊंड गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या ...

बहुजन संग्राम संघटना व वृत्तदर्शन मीडियातर्फे १३५ किलो मिठाई आणि किराणा मालाचे वाटप*

इमेज
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मुंबईत १३५ कुटुंबांना मदतीचा आधार*   * बहुजन संग्राम संघटना व वृत्तदर्शन मीडियातर्फे १३५ किलो मिठाई आणि किराणा मालाचे वाटप*   *( प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट )*   * मुंबई * : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून 'बहुजन संग्राम' ही सामाजिक संघटना आणि 'वृत्तदर्शन मीडिया' या राज्यस्तरीय वृत्तसंस्थेच्या वतीने मुंबईत अनोखा सेवा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत १३५ किलो मिठाई तसेच १३५ गरजू कुटुंबांना प्रत्येकी १ हजार रुपयांचा शिधा, किराणा आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले. मुंबई उपनगरातील १३५ दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि बहुजन समाजातील निराधार कुटुंबांना साडी-चोळी व कपड्यांचे वाटप करण्यात आले. बहुजन संग्राम संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष विनोद कांबळे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. भीमराव चिलगावकर (प्रदेशाध्यक्ष, बहुजन संग्राम संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला असून, सर्व स्तरांतून या उपक्र...

प्रियकराचा प्लॅन तगडा, पण जळीत मृतदेहामुळेच सत्य उघड; किरणही होती कटात सहभागी, पोलिसही झाले अचंबित

इमेज
प्रियकराचा प्लॅन तगडा, पण जळीत मृतदेहामुळेच सत्य उघड; किरणही होती कटात सहभागी, पोलिसही झाले अचंबित.                        सोलापूर : पाटखळ (ता. मंगळवेढा) येथील निशांत सावतचे (वय २०) घराशेजारील चुलत वहिनी किरण सावतसोबत (वय २३) प्रेमसंबंध जुळले. बारावीपर्यंत शिकलेला निशांत कराड येथील एका ज्वेलरी शॉपमध्ये कामाला होता.           २० दिवसांपूवी तो किरणला कायमचेच घेऊन जायचे म्हणून गावी आला होता. त्या दोघांनी 'सापही मेला पाहिजे आणि काठीही तुटली नाही पाहिजे' असा तगडा प्लॅन आखला होता. निशांतने पंढरपूर हद्दीतून एक अनोळखी मनोरुग्ण महिलेला हेरून गावीही आणले होते. किरणच्या आई-वडिलांनी तिचा विवाह धुमधडाक्यात लावला होता. किरणला छोटी मुलगी आहे. पती तिच्यावर जिवापाड प्रेम करायचा, पण निशांतने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि ती त्याच्या प्रेमात पडली. काही महिन्यांनंतर त्यांनी पळून जाऊन एकत्र राहण्याचा डाव आखला. त्यासाठी निशांतने मनोरुग्ण महिलेला आणून गळा आवळला आणि तिचा मृतदेह घराजवळील कडब्याच्या गंजी...

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

इमेज
फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले  पनवेल शहरातील तक्का परिसरात शनिवारी (दि.२८) सकाळी एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली. फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले असून, त्यासोबत सापडलेल्या एका इंग्रजीतील भावनिक चिठ्ठीने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली आहे.   आपल्या बाळाला सांभाळण्यास असमर्थ असल्याचे या चिठ्ठीतून पालकांनी म्हटले आहे. नेमके काय घडले? शनिवारी सकाळी तक्का परिसरातील नागरिकांना एका बास्केटमधून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता, त्यांना बास्केटमध्ये एक नवजात बाळ दिसले. नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ पनवेल शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बाळाला ताब्यात घेऊन उपचारासाठी पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. चिठ्ठीतील भावनिक मजकूर समोर बास्केटमध्ये बाळासोबत एक इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी सापडली, ज्यामुळे या घटनेला एक भावनिक वळण मिळाले ...

भटके विमुक्तांचा अंबरनाथ नगर परिषदेवर मोर्चा

https://youtu.be/gbaEXJm1o40?si=kA3pkVT3a750KbO3 जनहित न्यूज महाराष्ट्र  9960504729

पुण्यात कुर्ला बस अपघाताची पुनरावृत्ती: अनेक गाड्यांना बस ने चिरडलं सीसीटीव्ही समोर

पुण्यात कुर्ला बस अपघाताची पुनरावृ्त्ती; अनेक गाड्यांना चिरडलं, सीसीटीव्ही समोर पुण्यातील चांदणी चौकात पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला. मुंबईतील कुर्ला अपघातासारखीच ही घटना आहे. दुचाकी आणि अन्य वाहनांना धडक दिल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे. पुण्यातील पीएमपीएमएल बसचा भीषण अपघात झाला. चांदणी चौकातून पुणे शहराच्या दिशेने येत असताना पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे मोठा अपघात घडला. या बसने ५ ते ६ दुचाकी, एक रिक्षा आणि काही अन्य वाहनांना धडक दिली. या अपघातात ४ जण जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेनंतर मुंबईतील कुर्ला अपघाताची पुनरावृत्ती झाल्याचे म्हटले जात आहे. मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील एस. जी. बर्वे मार्गावर सोमवारी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बेस्ट बसने अनेक गाड्यांना धडक दिली होती. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला. तर ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यानंतर आता पुण्यातील चांदणी चौकात पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल झाले आहेत. या बसने ५ ते ६ दुचाकी ए...