पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रचनाकार यांनी उपोषण कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलीमनसेने लाक्षणिक उपोषण स्थगित केले उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतीतील रहिवाशांना न्याय मिळावा यासाठी मनसेने लाक्षणिक उपोषण केले असता पालिकेचे नगर रचनाकार यांनी आश्वासन दिले मनसेने आपले उपोषण स्थगित केले.यासंदर्भात सविस्तर माहिती देताना मनसेचे संजय घुगे यांनी सांगितले की शहरात धोकादायक इमारती पडण्याच्या घटना सतत घडत आहेत. परंतु त्यांना फक्त आश्वासन दिले जाते. त्यांच्या मदतीसाठी कोणीही जात नाही. शहरात बिल्डर लॉबी सक्रिय आहे या बिल्डर लॉबी ला राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळत चालले आहे. त्यामुळे हे संगनमताने खाली प्लॉट हडपण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे रहिवाशांवर अन्याय केला जातो. या रहिवाशांना न्याय मिळावा हीच मनसेची रास्त मागणी असल्याचे घुगे यांनी सांगितले. १२ लोकांचा मृत्यू झाला पण त्यांना ५ लाख रुपये देण्यात आले नाही. राजकीय नेते प्लॉट हाडपण्याच प्रयत्न आहे. महापौर सेनेचा, पालकमंत्री सेनेचा, मुख्यमंत्री सेनेचा मग अडचण कुठे आहे. धोकादायक इमारतीतील रहिवाशांना न्याय मिळालाच पाहिजे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे. यावेळी पालिकेचे नगर रचनाकार प्रकाश मुळे यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली यावेळी पालिकेचे नगर रचनाकार प्रकाश मुळे यांनी मनसेला दिलेल्या आश्वासनात म्हंटले आहे की आपल्या दि. २७/१०/२०२१ रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारती व अनधिकृत बांधकामाच्या निष्कासनाविरुद्ध आप लिकेसमोर महान उपोषणास बसण्यात असल्याचे आपण कळविले आहे.याबाबत उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास व २००५ पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण करण्याबाबत शासनाच्या दि. २७/०७/२०२१ च्या शासन निर्णय क्र. १२१९/२१७२/प्र.क्र. ११०/१९/ नवि१२ याद्वारे अप्पर मुख्य सचिव महसूल याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली असून तिच्या ३ सभा झालेल्या आहेत. सदर समिती उल्हासनगर शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत शासनाने परत केलेल्या अध्यादेश क्र. १२/२००६ मध्ये सुधारणा सुचवून त्याद्वारे धोकादायक इमारतींचा पुनर्विकास व २००५ पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण करण्याबाबत येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर दूर करण्यात येतील. अशा परिस्थितीत आपणास विनंती करण्यात आली असून सदर उपोषण मागे घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे अशी विनंती पालिका मार्फत करण्यात आली.पालिका नगर रचनाकार प्रकाश मुळे अधिकारी यांनी आश्वासन दिले यावेळी मनसेचे जिल्हा सचिव संजय घुगे,शहर अध्यक्ष बंडू देशमुख,शहर सचिव शालिग्राम सोणवने,उपशहर अध्यक्ष सचिन बेंडाके,मुकेश सेठपलानी,सुभाष हटकर,विभाग अध्यक्ष सुहास बनसोडे,योगिराज देशमुख,सागर चौहाण,उपविभाग अध्यक्ष रवी पाल,मधूकर बागुल,सुनिल रोहडा,मनविसे शहर सचिव सचिन चौधरी,तन्मेश देशमुख,शाखा अध्यक्ष सुधिर सावंत,संजय नार्वेकर,रवी बागुल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

इमेज

जुन्नर - जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक गावातील जेष्ठ नागरिक रामचंद्र काशिनाथ आल्हाट यांचे वयाच्या ९९व्या वर्षी दिनांक 11 ऑक्टोंबर 2021 रोजी निधन झाले आहे.त्यांनी मोठ्या कष्टातुन आपला परीवार उभा केला असुन त्यांचे मुळ गाव संगमनेर तालुक्यातील धांदरफळ हे त्यांचे गाव आहे अनेक वर्षापूर्वी ते जुन्नर तालुक्यातील शिरोली येथे स्थायिक झाले होते.त्यांनी कष्ट हाच देव मानत त्यांनी आपल्या जीवनाला आकार दिला व आपल्या चार मुलांवर अतिशय चांगले संस्कार करत मुलांना समाजिक कार्याची आवड निर्माण केली आहे.अतिशय कष्टमय जीवन जगत त्यांनी आपल्या घामाने संसार व शेती खुलवली असुन आपल्या मधुर वाणीमुळे व कष्टमय स्वभावामुळे ते खोडद व शिरोली,बु. पंचक्रोशीत प्रसिध्द होते तसेच जुन्या पिढीतील घटनांचा साक्षीदार म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जात होते.त्यांनी शेती मध्ये राबताना वेगवेगळे प्रयोग राबवले होते.दुरदुर्शनवर लोकप्रिय असलेल्या "आमची माती, आमची माणसं" या एका माहितीपटा मध्ये कोबीचे दुबार पिक घेतल्याने त्यांची विशेष मुलाखत ही पार पडली होती कारण त्यांनी केलेला प्रयोग हा पूर्णपणे सफल झाला होता तसेच.त्यांना विविध संघटना व संस्था यांनी आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन ही गौरवले होते.अतिशय मधुर वाणीचे असलेले रामचंद्र काशिनाथ आल्हाट हे उतारवयामुळे अलीकडे आजारी होते.काल त्यांचे निधन झाले त्यांचा अंत्यविधी शिरोली गावातील स्मशानभुमीत काल सात वाजता पार पडले यावेळी त्यांचे पाथर्डी, अकोले,संगमनेर,मुंबई परिसरातून नातेवाईक,स्नेही यावेळी उपस्थित होते.त्यांचा लोकप्रिय स्व.खासदार निवृत्ती शेरकर यांच्या कुटुंबाशी विशेष स्नेह होता.त्यांनी शेवट पर्यंत जपण्याचे काम त्यांनी केले.त्यांच्या जाण्यामुळे जुन्या पिढीतील व धार्मिक क्षेञातील एक अभ्यासु व्यक्तीमत्व हरपल्याची भावना समाज्यातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.मातंग समाज्यात ही त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जात असत कारण सामजिक चळवळीच्या बाबतीत नेहमीच राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांना ते मार्गदर्शन करत असत.आपल्या परीवारातील व नात्यातील प्रत्येक गोष्टींंची माहिती घेत असत व चुकीच्या होणाऱ्या गोष्टींना ते सष्टपणे विरोध करण्याचा त्यांचा स्वभाव होता.त्याच कारणामुळे त्यांचा नातेवाईक व मातंग समाज्यात आदरयुक्त दबदबा त्यांचा होता.त्यांच्या मागे दोन भाऊ शंकर व महादेव आल्हाट तसेच चार मुले व सुना आहेत.मुले एकनाथ रामचंद्र आल्हाट,जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोक रामचंद्र आल्हाट,गुलाब रामचंद्र आल्हाट,काँग्रेस पक्षाचे माजी सेक्रेटरी बाळासाहेब उर्फ लक्ष्मण आल्हाट,तसेच नातु गणेश एकनाथ आल्हाट,अनिकेत अशोक आल्हाट, विक्रांत बाळासाहेब आल्हाट,मयूर गुलाब आल्हाट,सुशांत बाळासाहेब आल्हाट,भाऊ असा मोठा परीवार त्यांच्या मागे आहे.त्यांचा दशक्रिया विधी जुन्नर तालुक्यातील शिरोली ( बुद्रुक) येथे बुधवार रोजी दिनांक 20 /10/2021 रोजी सकाळी 7.30 वा होईल येथे पार पडणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांना आधिन राहून हा दशक्रिया विधी पार पडणार आहे.

इमेज

जळगाव मध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत उल्हासनगरचे अंकुश गोलतकर . सिल्वर मेडल व ब्रॉंझ मेडल चे ठरले मानकरी दिनांक 1 ऑक्टोंबर ते 3 ऑक्टोंबर रोजी जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट या स्पर्धेमध्ये उल्हासनगर येथील दत्तात्रेय व्यायाम शाळा चे अंकुश गोलतकर यांना राज्यस्तरीय स्पर्धेत बेंच प्रेस मध्ये द्वितीय क्रमांक वर सिल्वर मेडल तसेच डेडलिफ्ट मध्ये तृतीय क्रमांकावर ब्राँझ मेडल मिळविला अंकुश गोलतकर यांना सन्मानित करण्यात आल्यामुळे उल्हासनगर मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून दत्तात्रेय व्यायाम शाळा व नमस्कार मंडळ कल्याण. सार्वजनिक गणेश मित्र मंडळ, तरुण मित्र मंडळ कृष्णा नगर व गोवा बॉईज ग्रुप तसेच मानव हित लोकशाही पक्ष तसेच समस्त मित्र मंडळी यांनी अंकुश गोलतकर यांना भरभरून शुभेच्छा दिल्या

इमेज

मध्य रेल्वे DRUCC सदस्य- *सुभाष साळुंके* यांनी रेल्वे अधिकारी व अंबरनाथ न. पा. अधिकारी यांच्या समवेत अंबरनाथ *रेल्वे स्टेशन परिसर व बी कॅबिंन नाल्याची केली संयुक्त पाहणी*.......!— खासदार *डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या सूचनेनुसार ,आमदार डॉ. बालाजी किणीकर* यांच्या सहकार्याने *अंबरनाथ स्टेशन परिसर,रेल्वे स्थानकात प्रवेश करताना होणारी अडचण, पादचारी पुलावरील लाद्यांची दुरूस्ती, बी कॅबींन नाला सफाई व बांधणी, संरक्षक भिंत, पाण्याचा निचरा होण्यासाठी चार जून्या अरुंद कल्व्हर्टची नवीन बांधणी तसेच मोरीवली ते निसर्ग ग्रीन चा प्रस्तावित ROB* इ. बाबत अंबरनाथ स्टेशन प्रबंधक श्री. जॉय इब्राहम यांच्या दालनात *बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर स्थानक परिसर व बी कॅबिन नाला परिसराची संयुक्त स्थळ पाहणी केली.*सकारात्मक चर्चा व निर्णय :*1. *रेल्वे स्थानकात सोयीस्कर व प्रशस्त प्रवेश करता यावा याकरिता रिक्षास्टँड कडील मार्ग मोठा करून जुने रॅलिंग हटविणे, त्यामुळे Entey & Exist प्रवाशांसाठी उपयुक्त होईल.*2. पादचारी पुलाची आठवडा भरात दुरूस्ती करणे.3.RPF व अन्प कर्मचारी यांनी फेरीवाला मुक्त स्टेशन परिसर करण्यासाठी संयुक्त कारवाई करणे.4. बी कॅबिन नाल्याची खोली वाढविणे, बांधकाम करणे याकरीता रेल्वेने NOC देणे तसेच डिटेल्स प्लॅन बनविणे. यामुळे पावसाळ्यात राहुलनगर, बी कॅबीन परीसरात पूरग्रस्त परिस्थिती टाळता येईल.5. मोरिवली पाडा, नवरेनगर, बी केबिन कडून येणारे सांडपाणी तसेच पावसाळी पाणी वाहून जाणारे 4 अरूंद, काही बंद झालेले कल्व्हर्ट रुंद करणे, जेणेकरून चोकअप न होता पाण्याचा निचरा सहज होऊन रेल्वे रुळावर पाणी साचणार नाही. यावर त्वरीत कारवाई करण्यात आली.6. बी कॅबीन रस्ता- रेल्वे हद्द यामधील रुंदीचा प्रलंबित वाद मिटविणे, याकरीता दोन्ही बाजूचे वास्तुविशारदची जॉईंट मीटिंग करणे,असे ठरले,7.अपूर्ण रेटेनिंग वॉल चे बांधकाम पूर्ण करणे.यावेळी रेल्वे अधिकारी श्री. दिपक सिंग, ट्रॅक अभियंता श्री. यादव, स्टेशन प्रबंधक श्री.जॉय अब्राहम,RPF इन्चार्ज अरविंद कुमार, अंबरनाथ नगर परिषदेचे उपमुख्यधिकरी संदिप कांबळे, आरोग्य अधिकारी श्री. सुरेश पाटील, शाखा अभियंता श्री. राजेश तडवी, आरोग्य निरीक्षक श्री.विलास भोपी व नितीन सावंत तसेच गोपी नायर, बाळा राऊत, राजकुमार जमखंडिकर, गणेश गायकवाड, बळीराम पालांडे, दिपक विशे उपस्थित होते.

इमेज