पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

३२वर्षाच्या यशस्वी सेवेनंतर एमआयडीसीचे उपअभियंता सुधीर कुंभार सेवानिवृत्त

इमेज
अंबरनाथमधील अति. एमआयडीसी उपविभागात निरोप समारंभ संपन्न; मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव  *अंबरनाथ (प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट):*  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अतिरिक्त अंबरनाथ उपविभागाचे उप अभियंता सुधीर कुंभार हे आपल्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर ३० मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त ३० मार्च २०२६ रोजी अंबरनाथ येथील 'सुदामा हॉटेल, कृष्णा पॅलेस' येथे एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत भावूक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी कुंभार यांच्या कार्यशैलीचा गौरव केला.   *कर्तव्यतत्पर आणि अभ्यासू अधिकारी*  सुधीर कुंभार यांनी आपल्या ३२ वर्षांच्या सेवाकाळात अनेक आव्हानात्मक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले. लोकप्रतिनिधी, उद्योजक, पत्रकार किंवा सामान्य कर्मचारी असो, प्रत्येकाचे प्रश्न स्मितहास्याने ऐकून घेऊन ते मार्गी लावण्याकडे त्यांचा कल असे. मितभाषी आणि साधे व्यक्तिमत्व असूनही कर्तव्यपालनात ते तितकेच कठोर होते. विभागातील कामकाजा...

पलावा तमिळ संगम'तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्याचा जागर

इमेज
पलावा तमिळ संगम'तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्याचा जागर  * डोंबिवली: प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट*   जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'पलावा तमिळ संगम' (PTS) या संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यंदाच्या वर्षी देखील या परंपरेचे जतन करत संस्थेने डोंबिवलीतील 'रोटरी मूक-बधिर विद्यालया'ला आर्थिक मदत सुपूर्द केली, तसेच वृद्धाश्रमात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून एक आगळावेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. मूक-बधिर विद्यालयाला आर्थिक बळ संस्थेच्या महिला विभागाने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता. सदस्या उमा मणिकवासगम आणि लक्ष्मी वैरावन यांच्या समन्वयाखाली महिला विंगने या सत्कार्यासाठी भरीव निधी संकलित केला. 'पलावा तमिळ संगम'चे अध्यक्ष पांडियन सर, समिती सदस्य लक्ष्मी वयरवन, श्रीविद्या, कलावती जी, आणि मालती यांनी प्रत्यक्ष विद्यालयाला भेट देऊन शाळेच्या प्रमुखांकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी सदस्यांनी वर्गांना भेटी देऊन मुलांशी संवाद साधला. मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि शिक्षकांचे समर्पण पाहून सर्व सदस्य भा...

समाज सेवा के क्षेत्र में 'सिमरन सेवा एनजीओ का सराहनीय कदम; पटेल रिटेल लिमिटेड' ने सी एस आर के माध्यम से बढ़ाया मदद का हाथ

इमेज
समाज सेवा के क्षेत्र में 'सिमरन सेवा एनजीओ का सराहनीय कदम; '* पटेल रिटेल लिमिटेड' ने सी एस आर के माध्यम से बढ़ाया मदद का हाथ उल्हासनगर: रिपोर्टर बाळकृष्ण आल्हाट*                     पिछले 12 वर्षों से निरंतर समाज के जरूरतमंद वर्गों की सेवा में समर्पित 'सिमरन सेवा एन जी ओ के राजकुमार शर्मा के  कार्यों को देखते हुए, प्रसिद्ध रिटेल श्रृंखला 'पटेल रिटेल लिमिटेड' ने अपना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सी एस आर योगदान संस्था को प्रदान किया है। इस सहयोग का उद्देश्य समाज के वंचित लोगों तक आवश्यक सहायता पहुँचाना है समाज सेवा के क्षेत्र में 'सिमरन सेवा एनजीओ का सराहनीय कदम;  पटेल रिटेल लिमिटेड' ने सी एस आर के माध्यम से बढ़ाया मदद का हाथ उल्हासनगर: पिछले 12 वर्षों से निरंतर समाज के जरूरतमंद वर्गों की सेवा में समर्पित 'सिमरन सेवा एनजीओ के कार्यों को देखते हुए, प्रसिद्ध रिटेल श्रृंखला 'पटेल रिटेल लिमिटेड' पटेल लो प्राईसने अपना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सी एस आर योगदान संस्था को प्रदान किय...

अध्यक्ष चषक २०२६:* अंबरनाथ शिवसेना नगरसेवक संघाचा दणदणीत विजय

इमेज
* अध्यक्ष चषक २०२६ :* अंबरनाथ शिवसेना नगरसेवक संघाचा दणदणीत विजय ​ * कल्याण/डोंबिवली:*  शिवसेनेचे कल्याण-डोंबिवलीतील ज्येष्ठ नगरसेवक मा. अर्जुनशेट पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'अध्यक्ष चषक २०२६' या क्रिकेट स्पर्धेत राजकीय मैदानानंतर आता क्रिकेटच्या मैदानावरही अंबरनाथच्या नगरसेवकांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शिवसेना अंबरनाथ नगरसेवक+युवासेना विरुद्ध कल्याण-डोंबिवली नगरसेवक+युवासेना यांच्यात रंगलेल्या प्रेक्षणीय सामन्यात अंबरनाथ संघाने एकतर्फी विजय मिळवत बाजी मारली. ​ * अंबरनाथ संघाची अष्टपैलू कामगिरी*  या अटीतटीच्या लढतीत नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ संघाने मैदानात उतरत उत्कृष्ट रणनीती आखली होती. प्रथम फलंदाजी करताना अंबरनाथ संघाने अवघ्या ४ षटकांत २ गडी गमावून ४६ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये नगरसेवक शैलेश भोईर यांनी स्फोटक फलंदाजी करत संघाला भक्कम धावसंख्या उभारून दिली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना 'सामनावीर' (Man of the Match) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ​ * सार्थक साळुंके यांची ...

उल्हासनगर तहसील कार्यालयामार्फत 'महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न*

इमेज
*उल्हासनगर तहसील कार्यालयामार्फत 'महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न*  ​एकाच छताखाली विविध शासकीय दाखले व सेवांचे वाटप; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ​ *उल्हासनगर:* महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली, उल्हासनगर तहसील कार्यालयाच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' अभियानाचे शनिवारी, ७ मार्च २०२६ रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले. नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवा आणि दाखले विनाविलंब उपलब्ध करून देणे, हा या शिबिराचा *मुख्य उद्देश होता.*  ​तहसीलदार कार्यालयातील कॅम्प नंबर ५ येथे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर पार पडले. तहसीलदार कल्याणी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे जागेवरच वाटप करण्यात आले. ​ *विविध सेवांचा लाभ*  ​या शिबिरात नागरिकांच्या सुविधेसाठी विविध कक्षांची स्थापना करण्यात आली होती, ज्यामध्ये खालील सेवा पुरवण्यात आल्या: ​ *महसूल दाखले:* उत्पन्न द...

कालकथित सावित्रीबाई दामू सुरवाडे यांचा उद्या प्रथम स्मृतिदिन; कल्याण येथे अभिवादन सभेचे आयोजन*

इमेज
* कालकथित सावित्रीबाई दामू सुरवाडे यांचा उद्या प्रथम स्मृतिदिन; कल्याण येथे अभिवादन सभेचे आयोजन*   * कल्याण:*  बहुजन संग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा वृत्तदर्शन मीडियाचे संपादक भीमराव निकम-चिलगावकर यांच्या भगिनी  कालकथित सावित्रीबाई दामू सुरवाडे यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम उद्या, रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दुपारी १२ वाजता लेक कॅन्सल बिल्डिंग (रूम नं. ७०४), बिर्ला कॉलेज जवळ, कल्याण (पश्चिम), जिल्हा ठाणे येथे संपन्न होईल.  * मेहनती आणि संघर्षमय जीवनप्रवास*  सावित्रीबाई सुरवाडे यांचा जीवनप्रवास अत्यंत कष्टप्रद आणि प्रेरणादायी राहिला आहे. मूळच्या वाकडी येथील असलेल्या सावित्रीबाई पतीच्या निधनानंतर आपल्या तीन मुलांसह चिलगाव येथे माहेरी आल्या होत्या. त्यांचे काका रामा निकम (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे खंदे समर्थक) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भीमराव निकम-चिलगावकर व त्यांच्या बंधूंच्या (सुखदेव व श्रावण निकम) सहकार्याने त्यांनी आपल्या मुलांचे संगोपन केले. ' * सावित्रीबाई यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत ...

भारत पुन्हा गुलामगिरीच्या दिशेने; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात*

इमेज
* भारत पुन्हा गुलामगिरीच्या दिशेने; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात*   * मुंबई/ (प्रतिनिधी, अशोक शिरसाट)*  आर.एस.एस.चे इस्रायलशी असलेले संबंध, केंद्राचे परराष्ट्र धोरण आणि अमेरिकेसोबतचे एकतर्फी करार यामुळे भारत पुन्हा एकदा गुलामगिरीच्या दिशेने जात असल्याची भीती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. या धोरणांमुळे भारतीय नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली असून, देशात संतापाची लाट असल्याचे सांगत आंबेडकरांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेल्या 'एपस्टीन फाईल्स' आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या एकतर्फी व्यापार कराराच्या निषेधार्थ सोमवारी मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसर कार्यकर्त्यांच्या घोषणांनी दणाणून गेला होता. ' * मोदी हटाव, देश बचाव'च्या घोषणांनी मुंबई दणाणली*  या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी 'मोदी हटाव, देश बचाव' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आंदोलनाचे गांभीर्य लक्ष...

दिव्यांगांना आता १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य; तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णयतीन दशकानंतर निधीत १५ पट वाढ; स्वयंरोजगारासाठी 'दिव्यांग सहाय्यक' पोर्टलवर नोंदणीचे आवाहन

इमेज
दिव्यांगांना आता १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य; तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय तीन दशकानंतर निधीत १५ पट वाढ; स्वयंरोजगारासाठी 'दिव्यांग सहाय्यक' पोर्टलवर नोंदणीचे आवाहन मुंबई : राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी आणि त्यांच्या स्वयंरोजगाराला बळ देण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री (टूलकिट) खरेदी करण्याकरिता आता १,००० रुपयांऐवजी थेट १५,००० रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तब्बल ३० वर्षांनंतर या रकमेत १५ पटीने वाढ करण्यात आल्याने दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, "विकसित महाराष्ट्र २०४७" या आराखड्याचा भाग म्हणून दिव्यांगांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हे शासनाचे मुख्य ध्येय आहे. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि स्वरूप थेट लाभ हस्तांतरण (DBT): मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाईल. पात्रता: अर्जदाराने शासकीय किंवा शासनमान्य संस्थेतून कौशल्य ...

राज्याचा ऐतिहासिक निर्णय: शासकीय वसतिगृहांच्या नावांतून 'मागासवर्गीय' शब्द कायमचा वगळला ! मुलांच्या वसतिगृहांना 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर', तर मुलींच्या वसतिगृहांना 'सावित्रीबाई फुले' यांचे नाव

इमेज
राज्याचा ऐतिहासिक निर्णय: शासकीय वसतिगृहांच्या नावांतून 'मागासवर्गीय' शब्द कायमचा वगळला! ​मुलांच्या वसतिगृहांना 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर', तर मुलींच्या वसतिगृहांना 'सावित्रीबाई फुले' यांचे नाव ​मुंबई: राज्यातील सामाजिक विषमता नष्ट करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारने आज एक अत्यंत क्रांतीकारी आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या शासकीय वसतिगृहांच्या नावांतून 'मागासवर्गीय' हा शब्द आता कायमचा वगळण्यात आला असून, या वसतिगृहांना आता महापुरुषांची नावे देण्याचा शासन आदेश (GR) जारी करण्यात आला आहे. ​बदलाचे नेमके कारण काय? ​राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत एकूण ४४९ शासकीय वसतिगृहे चालवली जातात. यातील बहुतांश वसतिगृहांच्या नावांत 'मागासवर्गीय' असा उल्लेख होता. शासनाच्या मते, 'मागासवर्गीय' या शब्दामुळे समाजातील उपेक्षित आणि शोषित घटकांची ओळख अधोरेखित होऊन त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन दूषित होतो. ही विषमता मुळापासून उपटून टाकण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वाभिमान जागवण्यास...

जनहित'न्यूज महाराष्ट्रच्या ठाणे जिल्हा क्राईम रिपोर्टर पदी मच्छिंद्र मोरे यांची नियुक्ती

इमेज
* जनहित'न्यूज महाराष्ट्रच्या ठाणे जिल्हा क्राईम रिपोर्टर पदी मच्छिंद्र मोरे यांची नियुक्ती*   ​ * ठाणे (प्रतिनिधी आबासाहेब साठे )*   राज्यात आपल्या परखड पत्रकारितेमुळे अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले 'जनहित न्यूज महाराष्ट्र' आणि 'साप्ताहिक बातमी जनहित' या वृत्तसमूहाचा विस्तार आता अधिक जोमाने होत आहे. जनहित कार्याचा आणि अन्यायाविरुद्धचा आवाज तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये ठाणे जिल्हा क्राईम रिपोर्टर म्हणून मच्छिंद्र विक्रम मोरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. ​ * मान्यवरांची उपस्थिती:*  या विशेष नियुक्ती प्रसंगी जनहित न्यूज महाराष्ट्र व'बातमी जनहित'चे संपादक व अध्यक्ष श्री. हरी चंदर आल्हाट यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन मोरे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी कार्यकारी संपादक विनोद तायडे, प्रतिनिधी आबासाहेब साठे यांच्यासह जनहित परिवारातील सदस्य आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​मच्छिंद्र मोरे यांच्या नियुक्तीमुळे ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी क्षेत्रातील बातम्यांना वाचा फोडण्यास आणि सर्...