पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रंगकर्मी ९ ऑगस्ट क्रांतीदिनी चित्रपती फाळके पुतळ्या शेजारी आंदोलन छेडणार. मुंबई दि.५: येत्या सोमवारी ९ ऑगस्ट क्रांतीदिनी सकाळी १० वाजता हिंदमाता सिनेमा समोर भारताचे चित्रपट निर्माते स्व.दादासाहेब फाळके यांच्या दादर येथील अर्धपुतळ्या शेजारी सर्वच कलाकार "जागर रंगकर्मीचा " हा कार्यक्रम सादरकरुन आपल्या मागण्यांमागील आक्रोश आनोख्या पध्दतीने सरकाच्या निदर्शनास आणून देणार आहेत ! देशात कोरोना महामारी सुरू होऊन गेल्या सव्वा वर्षा पासून हातावर पोट घेऊन जगणारा रंगकर्मी देशोधडीला लागला आहे.तर असंख्य कलाकार कामाअभावी मेटाकुटीला आला आहे.या मागण्यांच्या पूर्ततेसाठी गेल्या सहामहिन्यापासून लोकप्रिय अभिनेते विजय पाटकर,विजय राणे, संचित यादव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राभर सुरू झालेले आक्रोश आंदोलन आता कलाकारांच्या वर्षोनुवर्षाच्या दशावतारावर स्थिरावले आहे. मेघा घाडगे,विजय राणे,संचित जाधव,सुभाष जाधव ,चंद्रशेखर सांडवे, हरी पाटणकर, प्रमोद मोहिते, शीतल माने ,कृष्ण कुमार गावंड,सदानंद राणे आदींनी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात सभा घेऊन,निर्मात्यांसह, विविध पारंपरिक रंगकर्मी, चित्रपट, नाट्य, मालिकां मधील कलाकार हिंदी मराठी वाद्यवृंदातील वादक, गायक, निर्माते, शाहीर, तमासगीर,ढोल ताशे, बेंजो पार्टी, ,बुकिंग क्लार्क, व्यवस्था पक,नाट्य वितरक,रंगमंच कामगार,तंत्रज्ञानी यासर्वांना एकत्र आणून मोठे संघटन उभे केले आहे. आज ५ अगस्ट रोजी दुपारी ३ वाजता नायगाव येथील अंकूर बुद्धविहार येथे विविध कला क्षेत्रातील संघटकांची सभा होऊन,अभिनेते विजय पाटकर म्हणाले,कलाकारांच्या मागण्या़वर महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यात प्रथमच एकाचवेळी आंदोलन ९ ऑगस्ट रोजी छेडले जाणार आहे.हा ऐतिहासिक योगायोग असून हे आंदोलन राजकारण आणि संस्था विरहित आहे.कोणी अध्यक्ष नाही. कोणी सेक्रेटरी नाही. कलाकारांनी कलाकारांसाठी सुरु केलेले हे आंदोल न आहे. विजय पाटकर पुढे म्हणाले,कोरोना किती काळ रहाणार हे माहीत नाही,पण या पुढे आईच्या किवा स्वतःच्या आजरात लाख दीड लाख रुपये लागले तर दुसऱ्यावर अवलंबून रहाता येऊ नये यासाठी आता स्वतःच्या पायावर उभे रहाण्यासाठी संघटन मजबूत करावी लागणार आहे .या द्वारे कलाकारांना मी कोण आहे,याची ओळख करुन देण्याची वेळ आली आहे,असेही विजय पाटकर आपल्या भाषणात म्हणाले. संचित जाधव यांनी सांगितले, आंदोलन कलाकारांच्या आजवरच्या उज्वल किर्तीला शोभेल असे शांततेने पार पडेल.सर्व स्तरातील कलाकारांच्या एकूण १४ मागण्या सरकारपुढे ठेवण्यात येणार आहेत.सात मागण्या लॉकडाऊन मधील भिषण समस्येवर वर आहेत तर सात मागण्या कलाकारांच्या आयुष्यभराच्या व्यथेवर आहेत. विजय राणे यांनी सांगितले की,सात मागण्यांमध्ये माथाडी कामगारांच्या धरतीवर रंगकर्मी बोर्ड, रंगकर्मी हमी योजनाची मागणी करण्यात आली आहे.या प्रसंगी अनेक संस्था प्रमुखांनी आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला. अभिनेत्री मेघना घाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सरकारने सहानुभूतीपूर्वक या आंदोनाचा विचार नाही केला तर अमरण उपोषण छेडण्याचा इशारा या प्रसंगी देण्यात आला आहे अशी माहिती बुकिंग व्यवस्थापक हरि पाटणकर यांनी दिली

इमेज

अंबरनाथ चे शिवसेना नगरसेवक– सुभाष साळुंके व संवाद फाऊंडेशन यांच्या वतीने महाड तालुक्यातील तळीये (कोंडळकर वाडी) दरड दुर्घटनेतून बचावलेल्या२५ कुटुंबांना प्रत्येकीदोन बर्नरची शेगडी + ५ लिटर चे कुकर आणि बकेट तसेच इतर गृह उपयोगी साहित्याची मदत आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते देण्यात आली यावेळी संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा साळुंके,जिल्हा परिषद सदस्य. मनोज काळीजकर,माजी तालुका प्रमूख तुळशीराम पोळ,स्थानिक ग्रामस्थ. व वरंध संपर्क प्रमुख – नथुराम कोंडाळकर ,आनंद यादव उपस्थित होते. मदतकार्यात सौ.नंदिनी शेलार,Jogger's क्लब चे राजकुमार जमखडीकर, निलेश झांजे,रामदास नरे, गोविंद शेडगे, नंदू शेलार,बाबू झांजे,सार्थक साळुंके, यांनी परिश्रम घेतले.

इमेज

साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम. डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर उल्हासनगर कॅम्प नंबर 5 या ठिकाणी लहुजी शक्ती मित्र मंडळ आणि क्रांतीसुंर्य ,विश्वरत्न ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मित्र मंडळ यांच्या वतीने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आलीया वेळी प्रमुख उपस्थिती मुक्ता साळवे वस्ती स्तर संघ व लहूजी संघर्ष सेना ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष्या सोनी धुळे. सावित्री कांबळे. क्रांतीसुंर्य ,विश्वरत्न ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मित्र मंडळ अध्यक्ष महेश कांबळे. अनिल धुळे. पवन ढाले . रोशन मरसाळे. वेनकट हजारे. अमोल लोखडे .प्रवीण गायकवाड. आकाश कांबळे. बाळू भोसले. तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

इमेज

उल्हासनगर चालिया साहेब मन्दिर में 4 अगस्त से पवित्र चालिया व्रत की शुरुआत...सिंधी समुदाय का चालीस दिवसीय अखंड ज्योती महोत्सव चालिया पर्व पूज्य चालिया मंदिर उल्हासनगर कैम्प नम्बर 5 में 4 अगस्त से 40 दिन के व्रत उपवास से आरम्भ होगा, भगवान झूलेलाल के इस पर्व में जल की आराधना की जाती है, यह सिंधी समुदाय का सबसे बडा़ पर्व माना जाता है 72 सालों से अखंड प्रज्वलित पीरघोट से लाई परम्परागत ज्योती का पूजन किया जाता है

इमेज