पोस्ट्स

बातमी जनहित 9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप

इमेज
जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप उल्हासनगर: जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून उल्हासनगर शहरात ३ डिसेंबर २०२५ रोजी 'दिव्यांग आधार सेवा संस्थे'च्या वतीने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उल्हासनगर महानगरपालिकेच्या सहकार्याने अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना पालिका ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले,  ज्यामुळे त्यांना महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसेसमधून मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. दिव्यांग आधार सेवा संस्थेने गेली दीड वर्ष केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून, या ओळखपत्र वाटपामुळे शहरातील नोंदणीकृत दिव्यांग बांधवांना महापालिका परिवहन विभागाच्या बसेसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे.  आपली मागणी पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी महापालिकेचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उल्हासनगर महापालिका प्रशासक तथा आयुक्त श्रीमती आव्हाळे मॅडम यांच्यासह दिव्यांग कल्याणकारी विभागाचे उपायुक्त साहेब, दिव्यांग कल्याणकारी विभागाचे वरिष्ठ लिपिक, व...

आता ‘या’ नवीन तारखेला होणार अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक

इमेज
आता ‘या’ नवीन तारखेला होणार अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक (अंबरनाथ वृत्त) मतदान अवघ्या काही तासांवर असताना काही नगरपालिका आणि नगरपरिषदांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. यात अंबरनाथ नगरपरिषदेचाही समावेश आहे. या नगरपरिषदेची निवडणूक वीस दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे.नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकींच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील काही नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीला ब्रेक लागला आहे. यात अंबरनाथ नगरपरिषदेचाही समावेश आहे. अंबरनाथ नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 2 डिसेंबरला होणारं मतदान आता थेट 20 डिसेंबरला होणार आहे. निवडणूक अधिकारी विजयानंद शर्मा यांनी याबाबतची माहिती दिली.  तर कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात सहा प्रभागांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आलं आहे. कोणत्या प्रभागातील निवडणूक पुढे ढकलली? अंबरनाथ नगरपरिषेदतील प्रभाग क्रमांक 5 ब आणि प्रभाग 15 ब, प्रभाग क्रमांक 17 अ, प्रभाग क्रमांक 10 ब, प्रभाग क्रमांक 8 अ, प्रभाग 19 अ या प्रभागात नव्या कार्यक्रमानुसार निवडणूक घ्य...

महत्त्वाचा 'सर्वोच्च' निकाल! आरोपीच्या अटकेनंतर २ तासांत पोलिसांना सांगावी लागतील अटकेची कारणे, अन्यथा...; गुन्हा जामिनपात्र असेल तर आरोपीला सांगणे बंधनकारक

इमेज
महत्त्वाचा 'सर्वोच्च' निकाल! आरोपीच्या अटकेनंतर २ तासांत पोलिसांना सांगावी लागतील अटकेची कारणे, अन्यथा...; गुन्हा जामिनपात्र असेल तर आरोपीला सांगणे बंधनकारक.    सोलापूर : गुन्हा दाखल झाल्यावर कायद्याबाबत अनभिज्ञ लोक पोलिस अटक करतील म्हणून घाबरून जातात. पण, गुन्ह्यात आरोपीला अटक केल्यावर दोन तासांत संबंधित आरोपीला अटकेची कारणे देणे पोलिसांसाठी बंधनकारक आहे.त्या आरोपीला अटकेची कारणे समजावून सांगितल्याचे न्यायालयात सांगावे लागते. पोलिसांनी हा आदेश पाळला नाही, तर आरोपीची अटक किंवा रिमांड बेकायदा ठरेल, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. भारतीय न्याय संहितेनुसार अलीकडे सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेच्या अनेक गुन्ह्यांत संशयित आरोपींना शक्यतो अटक केली जात नाही. संबंधितांना नोटीस बजावून पोलिस चौकशीला बोलावतात, त्यानंतरही गरज वाटली तर त्या आरोपीस अटक करून पुढील तपास पोलिस करू शकतात.  दुसरीकडे, ६० वर्षांवरील आरोपीस अटक करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यास पूर्वीचा गंभीर आजार असेल तर पोलिस शक्यतो अटक करत नाहीत. खास करून गुन्ह्यातील मुद्देमा...

सावकारी कर्ज आणि कायद्यातील तरतूद

इमेज
सावकारी कर्ज आणि कायद्यातील तरतूद  नंदुरबार महाराष्ट्र:सावकारी नियमनाचा कठोर कायदा असला तरी आजही गरजू सर्वसामान्य, शेतकऱ्यांना परवानाधारक किंवा विनापरवाना सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. याचे कारण बँकांकडून कर्ज मिळण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आणि वेळखाऊ असते.                             तातडीच्या गरजा आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पैसा सुलभपणे मिळत नाही. तसेच कर्जाची परतफेड न झाल्यामुळे बँकांकडून नवीन कर्जासाठी नकार देण्यात येतो. त्यामुळे सावकार हा एकमेव पर्याय उरतो. अनेकदा शेतकऱ्यांना बँकांच्या विविध कर्ज योजनांची माहितीच नसते. या कारणामुळे शेतकऱ्यांना अनेकदा सावकारांच्या जाळ्यात अडकावे लागते. ज्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होते. कायद्याने दंडाची तरतूद कर्जदाराची कोणतीही स्थावर मालमत्ता कर्जापोटी स्वतःच्या नावावर करून घेता येत नाही. कर्ज वसुलीसाठी दमदाटी, मारहाण करता येत नाही. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि कर्जदारांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हा निबंधक व इतर प्राधिकृत अधिकाऱ्यांची ने...

मुंबई येथे बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ...*

इमेज
*मुंबई येथे बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ...*  मुंबई (प्रतिनिधी)  -  गणेश तळेकर  राज्यातील बालकलावंतांसह दिव्यांग बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ रविवारी ( दि.५ - १० -  २०२५ ) रोजी श्री सत्यनारायण महापुजेने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात झालेल्या या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. महापुजेनंतर अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्यासह मध्यवर्ती कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष राजू तुलालवार, प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह आसेफ शेख अन्सारी, दिपाली शेळके, कार्यकारिणी सदस्य अनंत जोशी, नागसेन पेंढारकर, वैदेही चवरे सोईतकर, निमंत्रित कार्यकारिणी सदस्य शिवाजी शिंदे, सुजय भालेराव, सीमा यलगुलवार, नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष शुभम चौगुले यांच्यासह बृहन्मुंबई शाखा उपाध्यक्ष  सुनील सागवेकर, कार्याधक्ष्य ज्योती निसळ, प्रमुख कार्यवाहक आसेफ शेख, को...

वंचित चे ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

इमेज
वंचित चे ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा  उल्हासनगर (अशोक शिरसाट) उल्हासनगर - ४ मध्ये सुभाष टेकडी येथे  सारंग थोरात यांनी प्रथम भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत केक कापून आपला वाढदिवस केला साजरा तसेच वाढदिवसा निमित्ताने सर्व कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना बॅग वाटप करण्यात आल्या  वंचित बहुजन आघाडीचे माजी अध्यक्ष नानासाहेब चव्हाण यांनी बोलताना सांगितले सारंग थोरात साहेब यांचे सामाजिक कार्य महान आहे असे चव्हाण वाढदिवसानिमित्त मागदर्शन करीत होते तसेच वंचितचे सारंग थोरात यांना पुढील वाटचालीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या असून या कार्यक्रमात  वंचित चे शेषराव वाघमारे,  रेखाताई उबाळे, उज्वल महाले , दिवाकर खळे, देवानंद ( प्रकाश) शिरसाट, महेंद्र अहिरे,प्रा सुरेश सोनवणे सर, प्रकाश इंगळे, प्रशांत सोनवणे, नितिन  भालेराव, निलेश  देवडे, दिपक आढाव, भारत थोरात, यांच्यासह भारतीय बौध्द महास...

लोकलच्या मालडब्यात बदल करून, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आकर्षक डबा तयार झाला आहे.

इमेज
लोकलच्या मालडब्यात बदल करून, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आकर्षक डबा तयार झाला आहे. मुंबईतील प्रत्येक लोकल ट्रेनमध्ये लागणार 'हा' एक्स्ट्रा डब्बा; तयारीही झाली, 'या' प्रवाशांना सर्वाधिक फायदा.           मध्य रेल्वेने एका नव्या बदलासंदर्भातील निर्णय घेतला असून त्याबद्दलचे रचनात्मक बदलही करण्यात आले आहेत. या निर्णायचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार आहेत.           रेल्वेने प्रवास आरामदायी होण्यासाठी लोकलचा मालडबा ज्येष्ठ नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने माटुंगा कारखान्यात लोकलच्या मालडब्यात बदल करून, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आकर्षक डबा तयार झाला आहे. नेमका काय आहे हा सारा प्रकार मध्य रेल्वेवरील प्रत्येक लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. लोकलमध्ये प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी असे डब्याचे प्रकार आहेत. तर, महिला, दिव्यांग आणि मालवाहतुकीसाठी स्वतंत्र डबे आहेत. गरोदर स्त्रियांना आणि ज्येष्ठ नागरिकांना लोकलच्या डब्यात काही आसने राखीव आहेत. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना गर्दीतून प्रवास करणे कठीण होते....

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण ब्लॉक

इमेज
मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण ब्लॉक मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी 10.40 ते दुपारी 3.40पर्यंत जलद मार्गावर ब्लॉक असेल. तसेच हार्बर लाईनवर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05पर्यंत ब्लॉक राहणार आहे. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.34 ते दुपारी 3.03पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्धजलद लोकल ठाणे व कल्याणदरम्यान धिम्या मार्गावर वळवल्या जातील.

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र झाला आहे. ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्रायलने इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलने इराणच्या मुख्य अणुऊर्जा प्रकल्पाचा भाग उद्ध्वस्त केला

इमेज
*जेरुसलेम/तेहरान : इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र झाला आहे. ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्रायलने इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलने इराणच्या मुख्य अणुऊर्जा प्रकल्पाचा भाग उद्ध्वस्त केला.*.    यानंतर शनिवारी पहाटे इराण आणि इस्रायलने एकमेकांवर पुन्हा हवाई हल्ले केले. इराणने या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत इस्रायलवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला आहे. आज पहाटे इस्रायलची दोन मोठी शहरे तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले, त्यामुळे रहिवाशांनी आश्रयस्थानांकडे धाव घेतली. लष्कराने सांगितले की, त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा कार्यरत असून इराणी क्षेपणास्त्रांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या तासाभरात इराणमधून इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली, त्यापैकी काहींना रोखण्यात यश आले आहे, असे लष्कराने सांगितले. इराणची राजधानी तेहरानमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त आहे. दोन क्षेपणास्त्रे तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर आदळली. या विमानतळावर लढाऊ विमाने आणि वाहतूक विमानांचा तळ आहे. स्फोटानंतर आगीचा भडका उडाल्याचे इर...

कोरोनाची साथ पुन्हा एकदा आली आहे, पण हा कोरोनाचा व्हेरिंयट तितका गंभीर नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेय.

इमेज
हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना महामारीने पुन्हा डोकं वर काढलेय. दोन्ही देशातील कोरोना रूग्णाची संख्या झपाट्याटे वाढत आहे, त्यामुळे निर्बंध लावले जाणार आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरनंतर आता मुंबईतही धोक्याची घंटा वाजली आहे. मुंबईमध्ये कोरोना रूग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे समजतेय. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णात झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णसंख्येत आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्याच्या रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत. २०२० ते २०२२ या काळात जगात हाहाकार माजवणाऱ्या आणि लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलेय. कोरोनाची साथ पुन्हा एकदा आली आहे, पण हा कोरोनाचा व्हेरिंयट तितका गंभीर नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेय. कोरोना पुन्हा आला असला तरी घाबरण्याचे कारण नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. कोरोनाची लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता उपाय योजना कराव्यात, असेही सांगितलेय. केंद्रीय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी देशात ९३ कोर...

बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी मोठी महत्वाची बातमी समोर येत आहे. खरेतर, RBI ने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतलाय ज्याअंतर्गत पाच महत्त्वाच्या बँकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

इमेज
RBI चा बँक ऑफ महाराष्ट्राला मोठा दणका, BOM वर मोठी कारवाई, आकारलेला दंड ग्राहकांकडून वसूल केला जाणार नाही  बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी मोठी महत्वाची बातमी समोर येत आहे. खरेतर, RBI ने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतलाय ज्याअंतर्गत पाच महत्त्वाच्या बँकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.        देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून अर्थातच आरबीआयकडून गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक सहकारी सहकारी आणि खाजगी बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच काही बँकांचे लायसन्स रद्द करण्याचा सुद्धा निर्णय आरबीआय कडून घेण्यात आलाय. आरबीआय देशातील सर्व सहकारी सहकारी आणि खाजगी बँकांवर नजर ठेवून असते. देशातील सर्वच बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते. जर देशातील बँकांनी आरबीआयच्या नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई होते. अशातच आता आरबीआयने देशातील पाच महत्त्वाच्या बँकांवर कारवाई केली असून यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचा सुद्धा समावेश होतो. आरबीआय ने बँक ऑफ महाराष्ट्र सहित पाच महत्त्वाच्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) या स...

पाच वर्षांत ६० नागरी सहकारी बँका नामशेषसर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी रिझर्व्ह बँकेने कडक धोरण अवलंबिले आहे. ठकसेनांवर कारवाईदेखील होत असली, तरी अद्याप धाक आणि वचक मात्र दिसत नाही.

इमेज
पाच वर्षांत ६० नागरी सहकारी बँका नामशेष सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी रिझर्व्ह बँकेने कडक धोरण अवलंबिले आहे. ठकसेनांवर कारवाईदेखील होत असली, तरी अद्याप धाक आणि वचक मात्र दिसत नाही.                         मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने अलीकडेच केलेल्या कारवाईमुळे नागरी सहकारी बँकांचे आर्थिक आरोग्य आणि ढिसाळ कारभाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. दरसाल डझनाहून अधिक बँकांना परवाना गमवावा लागून, मार्च २०२४पर्यंत गेल्या पाच वर्षांत राज्यातील तब्बल ६० नागरी सहकारी बँका नामशेष झाल्या आहेत. ही संख्या पाहता रिझर्व्ह बँकेच्या कारवाईची गती वाढल्याचे दिसत असले तरी उद्दाम बँकचालकांना वठणीवर आणण्यात ती कमी पडली आहे. उलट सामान्य सभासद, ठेवीदारांनाच अधिक झळ सोसावी लागल्याचे चित्र आहे. सहकाराची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रात, २०२४ सालात ४९६ नागरी बँका कार्यरत होत्या. ठेव विमा आणि पत हमी महामंडळाकडे (डीआयसीजीसी) मार्च २०२४ अखेर नोंदणीकृत बँकांची संख्या हे दर्शविते. २०२४ मध्ये तीन ...

प्रयत्न आमचेनशा मुक्त अंबरनाथ करण्याचे__मा , सुभाष साळुंके

इमेज
प्रयत्न आमचे नशा मुक्त अंबरनाथ करण्याचे__मा , सुभाष साळुंके  चरस,गांजा,ड्रग्स इ.नशा केल्याने व दारू व्यसनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याचे तसेच काही जण ऐन तारुण्यात मृत्युमुखीला जवळ केल्याच्या घटना घडताना मन सुन्न होत असे, यावर उपाय म्हणून दारू मुक्त घर व नशा मुक्त अंबरनाथ करण्याचा प्रयत्न संवाद फाऊंडेशन च्या वतीने मा.नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या वाढदिवसानिमित  भव्य नशा मुक्ती शिबिर रविवार,११ मे २०२५* रोजी सकाळी १० ते दु.१ वाजेपर्यंत*  रोटरी क्लब हॉल, वडवली विभाग अंबरनाथ पूर्व येथे आयोजित केले आहे. लाखो व्यक्तींना दारुमुक्ती देणारे *प्रख्यात उपचार तज्ज्ञ मा.डॉ.कृष्णा भावले हे समुपदेशन व आयुर्वेदिक औषध देणार असून IRS मा. समीर वानखेडे व सिने अभिनेत्री मा. क्रांती रेडकर उपस्थित राहणार आहे. सदर आयुर्वेदिक उपचारामुळे लाखो व्यसनाधीन व्यक्तीनी दारू पासून मुक्ती मिळविले आहे, म्हणूनच अंबरनाथमधील व्यसनाधीन व्यक्ती दारू पासून मुक्ती करण्याचा व त्यांचा कुटुंबात सुख समाधानाचा आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न कार्यकुशल नगरसेवक - सुभाष साळुंके यांच्या संकल्पनेतून होत आहे, ...

धुळवड खेळल्यानंतर दुपारच्या सुमारास रंग काढायला नदीवर गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून मृत्यू

इमेज
धुळवड खेळल्यानंतर दुपारच्या सुमारास रंग काढायला नदीवर गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून मृत्यू ठाणे : देशभरासह राज्यात धुळवड उत्साहात साजरी केली जात आहे. अनेकजण रंगात न्हावून निघालेत. सर्वत्र रंगांची उधळण केली जात आहे. हा रंग जसा आयुष्यात नवचैतन्य घेवून येतो, तसाच तो आयुष्याचा बेरंगही करतो. अशीच एक घटना बदलापूर येथे शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेनं मुलांच्या आयुष्याचा बेरंग झालाच पण त्या चार कुटुंबांच्या आयुष्यातला रंगही उडाला, असं म्हणावं लागेल. नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू : धुळवड खेळल्यानंतर दुपारच्या सुमारास रंग काढायला नदीवर गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. हे चौघे बदलापूर शहरातील चामटोली जवळील पोद्दार गृह संकुलातील राहणारे होते. विशेष म्हणजे, हे चारही मुलं दहावीचे विद्यार्थी असून, ते राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.  चौघांचे मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीनं पाण्याबाहेर काढण्यात आले असून, त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात रवाना करून पोलिसांनी तपास सुरू केला...

महाबोधी विहार मुक्त करा परिवर्तन एकलोक चळवळीचे राष्ट्र्पतीना निवेदन

इमेज
महाबोधी विहार मुक्त करा परिवर्तन एकलोक चळवळीचे राष्ट्र्पतीना निवेदन  परिवर्तन एकलोक चळवळीच्या माध्यमातून 12 मार्च,2025 रोजी उल्हासनगर तहसीलदार यांचे मार्फत राष्ट्र्पती यांना उल्हासनगर प्रभारी आबासाहेब साठे, दिपक सोनोने, शैलेंद्र रूपेकर, बाबू आढाव, केशव लोणारे, गणेश मोरे गुरुजी, संतोष पडघान, सुभाष सरकटे, यांनी निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की   महाबोधी विहार ( बुद्धगया ) ब्राह्मण मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे  आदी विषयी संपूर्ण भारतभर आंदोलने होत असुन  सदर विषयी बौद्ध समाजाच्या भावना लक्षात घेऊन बौद्ध विहार मुक्त करण्यात यावे अशी मागणी निवेदन पत्रात करण्यात आली आहे अशी माहिती आबासाहेब साठे यांनी दिली

परिवहन विभागातील गैरकाराभाराची अधिकाऱ्यांकडूनच तक्रार,परिवहन आयुक्त, अपर परिवहन आयुक्तांविरोधात तक्रार

इमेज
परिवहन विभागातील गैरकाराभाराची अधिकाऱ्यांकडूनच तक्रार,परिवहन आयुक्त, अपर परिवहन आयुक्तांविरोधात तक्रार परिवहन मंत्र्यांना उद्देशून २० फेब्रुवारी रोजी खडसे यांनी पत्र लिहले आहे. त्यात परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यावर निविदा प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.                                     मुंबई : परिवहन विभागाच्या वायुवेग पथकांसाठी ६९ नवीन इंटरसेप्टर वाहनांवर कॅमेरायुक्त रडार यंत्रणेच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारे साताऱ्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप खडसे यांनी लिहिलेले तक्रार पत्र प्रसारित झाले आहे.     परिवहन मंत्र्यांना उद्देशून २० फेब्रुवारी रोजी खडसे यांनी पत्र लिहले आहे. त्यात परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यावर निविदा प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  खडसे यांच्या पत्रात असा दावा करण्यात आला आहे की, भीमनवार...

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन

इमेज
उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन  6 तासांत रुग्णवाहिका आली नाही रुग्णाने सोडले प्राण जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी नोटीस बजावली होती. याबाबत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले.       रुग्णवाहिकेसाठी 108 क्रमांकावर फोन केला जातो. त्यानंतर काही वेळेतच रुग्णवाहिका येत असल्याचा दावा केला जातो. परंतु उल्हासनगरमध्ये वेगळाच प्रकार घडला. अत्यवस्थ असलेल्या रुग्णास नेण्यासाठी सरकारी रुग्णवाहिकेला फोन केला. परंतु एक तास झाला, दोन तास झाले तरी रुग्णवाहिका आली नाही. फोन केल्यावर सहा तास झाल्यावरही रुग्णवाहिका आली नाही. अखेर चिंताजनक प्रकृती असलेल्या त्या रुग्णाने प्राण सोडला. या प्रकरणात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन करण्यात आले.                          ...

लाचेप्रकरणी भूमी अभिलेख उप अधीक्षक ताब्यात तक्रारदाराला जमीन मोजणी करुन देण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे.

इमेज
लाचेप्रकरणी भूमी अभिलेख उप अधीक्षक ताब्यात तक्रारदाराला जमीन मोजणी करुन देण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.                                              ठाणे : येथील भूमि अभिलेख उप अधीक्षक चांगदेव मोहळकर आणि भूकरमापक श्रीकांत रावते यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. तक्रारदाराला जमीन मोजणी करुन देण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.                     भूमि अभिलेख विभागात चांगदेव मोहळकर हे उप अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांच्या जमीनीची मोजणी करायची होती. यासाठी ते ठाण्यातील भूमी अभिलेख कार्यालयात गेले होते. २७ फेब्रुवारीला तेथील अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून लाचेची मागणी केली होती. त्यानंत...

उल्हासनगर मधील रस्त्यांची खोदकाम सुरू असल्याने वाहन चालकांची कोंडी

इमेज
उल्हासनगर मधील रस्त्यांची खोदकाम सुरू असल्याने वाहन चालकांची कोंडी  .                        ( पटेल लो प्राईस/लिंक रोड मार्ग ) उल्हासनगर मधील रस्त्याच्या खोदकामा मुळे रस्त्यांची दुरवस्था सध्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत रस्त्यावर कामे सुरू असून प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसून येत आहे तसेच रस्त्याचे खोदकाम सुरू असताना वाहन चालकांना कोणत्या रस्त्यावर खोदकाम सुरू आहे हे नेमके कळत नाही त्याच्या मागचे कारण म्हणजेच पुढे रस्त्याचे काम सुरू आहे परंतु चौकात कोणत्याच प्रकारचे रस्ता बंद असल्याचे फलक लावलेले नसल्याने वाहन चालक सरळ पुढे गेल्यानंतर त्याला पुढे काम चालू असल्याचे दिसून येते परंतु पुढे वाहन घेऊन जाता येत नसल्याने पुन्हा त्याला त्या ठिकाणाहून परत मागे वळावे लागते त्यामुळे शहरात ट्राफिक ची समस्या निर्माण झाली आहे                    ( पटेल लो प्राईस/लिंक रोड मार्ग ) यामुळे रस्त्यावर वाहन चालकांना वाहन चालवत असताना नाहक त्रास सहन करावा लागत ...

भ्रष्टाचार जनअक्रोश संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने उल्हासनगर तहसीलदार यांना निवेदन पत्र

इमेज
भ्रष्टाचार जनअक्रोश संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने उल्हासनगर तहसीलदार यांना निवेदन पत्र विठ्ठल रुक्मणी पतपेढी कल्याण संस्थेने हरी आल्हाट यांच्यावर केलेल्या अन्यायाविरुद्ध सहकार मंत्री यांच्याकडे आल्हाट यांना न्याय मिळण्यासाठी केली मागणी                                                                   विठ्ठल रुक्मिणी पतपेढी कल्याण संस्थेने हरी आल्हाट यांच्यावर  लादलेल्या अवाढव्य कर्जामुळे हरी आल्हाट यांची मनस्थिती बिकट झाली असून त्यांना न्याय मिळावा यासाठी भ्रष्टाचार जन आक्रोश संघटना महाराष्ट्र राज्यचे पदाधिकारी यांनी उल्हासनगर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी निवेदन पत्र देऊन सहकार मंत्री मंत्रालय मुंबई यांच्याकडे मागणी केली आहे निवेदन पत्रात लिहिले आहे की  हरि चंदर आल्हाट यांच्यावर  विठ्ठल रुक्मणी पतपेढीकडून होत असलेल्या अन्याय बाबत यांनी सहकार मंत्री तसेच संबंधित अधिका...