पोस्ट्स

बातमी जनहित 9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अंबरनाथमध्ये २० एप्रिलला भव्य 'रोजगार मेळावा'; शिवसेनेचे सुभाष साळुंके आणि संवाद फाउंडेशन अध्यक्ष सुवर्णाताई साळुंके यांच्या पुढाकाराने शेकडो तरुणांना मिळणार 'ऑन द स्पॉट' नोकरी

इमेज
अंबरनाथमध्ये २० एप्रिलला भव्य 'रोजगार मेळावा'; शिवसेनेचे सुभाष साळुंके आणि संवाद फाउंडेशन अध्यक्ष सुवर्णाताई साळुंके यांच्या पुढाकाराने शेकडो तरुणांना मिळणार 'ऑन द स्पॉट' नोकरी अंबरनाथ: बेरोजगार तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी अंबरनाथमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना नगरसेवक श्री. सुभाष नारायण साळुंके आणि संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या मेळाव्यात पात्र उमेदवारांना 'ऑन द स्पॉट जॉब' मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मेळाव्याचे सविस्तर तपशील: हा मेळावा सोमवार, २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. 'पीएसएन सप्लाय चेन सोल्यूशन प्रा. लि. या कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. भरतीसाठी पात्रता आणि अटी: * काम: स्कॅनिंग, पॅकिंग आणि पिकिंग. कामाचे ठिकाण: आईस्क्रीम वेअरहाऊस, पाले MIDC, अंबरनाथ (पूर्व). पात्रता: फक्त पुरुष उमेदवार (वय १९ ते ३५ वर्षे). वेतन व सुविधा: १५,९०० ...

धूप में डटे रहने वाले यातायात पुलिसकर्मियों के सम्मान में आगे आया ज्योतिरमणि फाउंडेशन**

इमेज
धूप में डटे रहने वाले यातायात पुलिसकर्मियों के सम्मान में आगे आया ज्योतिरमणि फाउंडेशन** **उल्हासनगर:** "जो धूप में खड़े हैं हमारे लिए, आज उनके लिए हम खड़े हुए!" इसी प्रेरणादायी संदेश के साथ ज्योतिरमणि फाउंडेशन द्वारा शहर में एक सराहनीय सामाजिक पहल की गई। फाउंडेशन की ओर से उल्हासनगर कैंप नंबर 1 से लेकर कैंप नंबर 5 तक चिलचिलाती धूप में अपनी सेवाएं दे रहे यातायात (ट्रैफिक) पुलिस अधिकारियों और कर्मचारियों को सनग्लासेस (धूप के चश्मे) वितरित किए गए। तेज धूप, धूल और लगातार ट्रैफिक के भारी दबाव के बीच ये पुलिसकर्मी बिना थके अपनी जिम्मेदारी निभाते हैं। उनके इसी समर्पण और निष्ठा के प्रति आभार व्यक्त करने के उद्देश्य से फाउंडेशन ने यह कदम उठाया। इस दौरान फाउंडेशन के सदस्यों ने न केवल चश्मों का वितरण किया, बल्कि अधिकारियों से संवाद कर उनके प्रति कृतज्ञता भी प्रकट की। यह कार्यक्रम केवल एक वितरण अभियान न रहकर समाज और सुरक्षा बलों के बीच एक भावनात्मक जुड़ाव का प्रतीक बन गया। फाउंडेशन का मानना है कि जो लोग हर दिन हमारी सुरक्षा के लिए सड़कों पर डटे रहते हैं, उनके स्वास...

तपती धूप में सुरक्षा देने वाले हाथों को मिला सम्मान; ट्रैफिक पुलिस को बांटे सनग्लासेस

इमेज
तपती धूप में सुरक्षा देने वाले हाथों को मिला सम्मान; ट्रैफिक पुलिस को बांटे सनग्लासेस उल्हासनगर: शहर की यातायात व्यवस्था को सुचारू बनाए रखने के लिए कैंप नंबर 1 से 5 तक कड़ी धूप में तैनात रहने वाले ट्रैफिक पुलिस कर्मियों के प्रति आभार व्यक्त करने हेतु एक विशेष पहल की गई। मंडल 3B और ज्योतिरमणि फाउंडेशन** के संयुक्त तत्वावधान में ट्रैफिक पुलिस अधिकारियों और कर्मचारियों को धूप से राहत देने के लिए उच्च गुणवत्ता वाले सनग्लासेस (धूप के चश्मे) वितरित किए गए। कर्तव्यनिष्ठा का सम्मान** यह कार्यक्रम मंडल अध्यक्ष श्री हरेश भाटिया जी के मार्गदर्शन में संपन्न हुआ। इस अवसर पर उन्होंने कहा, "जब हम भीषण गर्मी में अपने घरों या कार्यालयों में होते हैं, तब ये पुलिसकर्मी सड़क पर खड़े होकर हमारी सुरक्षा और सुविधा सुनिश्चित करते हैं। उनके इस निस्वार्थ समर्पण को देखते हुए यह छोटा सा प्रयास किया गया है ताकि उन्हें कार्य के दौरान थोड़ी राहत मिल सके।" समाज और सुरक्षा के बीच बढ़ा जुड़ाव वितरण के दौरान मंडल 3B के कार्यकर्ताओं और ज्योतिरमणि फाउंडेशन के सदस्यों ने ड्यूटी प...

सहेली' संस्थेचा पुढाकार: ३० गरजू महिलांना शिलाई मशीन व प्रमाणपत्रांचे वाटप*

इमेज
* सहेली' संस्थेचा पुढाकार: ३० गरजू महिलांना शिलाई मशीन व प्रमाणपत्रांचे वाटप*   * प्रकल्प 'हुन्नर' अंतर्गत महिलांना स्वावलंबनाचे धडे; आतापर्यंत १३२ महिला झाल्या सक्षम*   * प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट*  उल्हासनगर: वंचित आणि शोषित घटकातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 'सहेली' संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'प्रकल्प हुन्नर' अंतर्गत ३० गरजू महिलांना शिलाई मशीन आणि शिवणकाम किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये एकल महिला, परित्यागता, विधवा, घरेलू कामगार आणि हात मजुरी करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. या प्रशिक्षणाद्वारे महिलांमध्ये स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करण्याइतपत आत्मविश्वास निर्माण झाला आहे. सहेली संस्थेच्या वतीने या महिलांना गेल्या चार महिन्यांपासून शिवणकामाचे 'बेसिक' पासून 'अ‍ॅडव्हान्स' पर्यंतचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल सर्व ३० महिलांना अधिकृत प्रमाणपत्रे देण्यात आली. या उपक्रमामुळे या महिला आता कोणावरही अवलंबून न राहता स्वाभिमानाने स्वतःचे आण...

नवे आर्थिक वर्ष, नवे नियम

इमेज
**नवे आर्थिक वर्ष, नवे नियम!* आजपासून देशात प्राप्तिकर, वेतन संहिता आणि डिजिटल पेमेंटमध्ये मोठे बदल  *नवी दिल्ली:*  आज, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत असून, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. यामध्ये १९६१ च्या जुन्या प्राप्तिकर कायद्याची जागा घेणारा 'नवा प्राप्तिकर कायदा २०२५', नवीन वेतन संहिता आणि डिजिटल व्यवहारांसाठी कडक सुरक्षा नियमांचा समावेश आहे.  *नवा कायदा:* आता १९६१ ऐवजी 'प्राप्तिकर कायदा २०२५' लागू झाला आहे.  *१२ लाखांपर्यंत करमुक्ती:* वार्षिक १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. नोकरदारांसाठी ७५,००० रुपयांची अतिरिक्त वजावट जाहीर करण्यात आली आहे.  *बदललेले फॉर्म्स:* आता फॉर्म १६ ऐवजी 'फॉर्म १३१' वापरावा लागेल. तसेच फॉर्म १३० आणि १६ अ च्या जागी नवीन प्रक्रिया सुरू होईल.  *भत्त्यांमध्ये वाढ:* मुलांच्या शैक्षणिक भत्त्याची मर्यादा प्रति महिना १०० रुपयांवरून थेट ३,००० रुपये (प्रति मुल) करण्यात आली आहे. करमुक्त जेवण कूपनची मर्यादा...

*उल्हासनगर महापालिका निवडणूक २०२६: प्रभाग क्र. १७ मधून हरी चंदर आल्हाट निश्चितपणे अपक्ष लढणार!*

इमेज
*उल्हासनगर महापालिका निवडणूक २०२६: प्रभाग क्र. १७ मधून हरी चंदर आल्हाट निश्चितपणे अपक्ष लढणार!*   *उल्हासनगर:आबासाहेब साठे*  उल्हासनगर महानगरपालिकेच्या २०२६ च्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १७ मधून एक महत्त्वाची घोषणा झाली आहे. स्थानिक जनसेवक श्री. हरी चंदर आल्हाट यांनी आगामी महापालिका निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवण्याचा आपला निर्णय निश्चित केला आहे. श्री. आल्हाट यांनी घेतलेला हा ठाम निर्णय प्रभाग क्र. १७ मध्ये मोठी राजकीय चुरस निर्माण करणारा ठरणार आहे.  *नागरिकांसाठी लढणार!*  प्रभागातील नागरिक आणि समस्यांवर प्रकाश टाकताना श्री. हरी चंदर आल्हाट म्हणाले की प्रभागतील अनेक विकास कामे रखडली आहेत त्यांना पूर्ण करण्याची गरज आहे  १ ) पिण्याचे पाण्याची समस्याचे निवारण  २ )  ओला व सुका कचरा वेग वेगळा टाकण्यासाठी प्रभागात ठीक ठिकाणी व्यवस्था करणे  ३ )  कचरा उचलण्यासाठी प्रत्येक वस्ती मध्ये वेळेवर घंटा गाडीची वेळ निश्चित करणे  ४ ) सांडपाणी सुरूळीत वाहून जाण्यासाठी नाली व गटारे व्यवस्थित करणे व नाली वर ढाकणे बसविणे ५ ...

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप

इमेज
जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप उल्हासनगर: जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून उल्हासनगर शहरात ३ डिसेंबर २०२५ रोजी 'दिव्यांग आधार सेवा संस्थे'च्या वतीने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उल्हासनगर महानगरपालिकेच्या सहकार्याने अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना पालिका ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले,  ज्यामुळे त्यांना महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसेसमधून मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. दिव्यांग आधार सेवा संस्थेने गेली दीड वर्ष केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून, या ओळखपत्र वाटपामुळे शहरातील नोंदणीकृत दिव्यांग बांधवांना महापालिका परिवहन विभागाच्या बसेसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे.  आपली मागणी पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी महापालिकेचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उल्हासनगर महापालिका प्रशासक तथा आयुक्त श्रीमती आव्हाळे मॅडम यांच्यासह दिव्यांग कल्याणकारी विभागाचे उपायुक्त साहेब, दिव्यांग कल्याणकारी विभागाचे वरिष्ठ लिपिक, व...

आता ‘या’ नवीन तारखेला होणार अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक

इमेज
आता ‘या’ नवीन तारखेला होणार अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक (अंबरनाथ वृत्त) मतदान अवघ्या काही तासांवर असताना काही नगरपालिका आणि नगरपरिषदांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. यात अंबरनाथ नगरपरिषदेचाही समावेश आहे. या नगरपरिषदेची निवडणूक वीस दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे.नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकींच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील काही नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीला ब्रेक लागला आहे. यात अंबरनाथ नगरपरिषदेचाही समावेश आहे. अंबरनाथ नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 2 डिसेंबरला होणारं मतदान आता थेट 20 डिसेंबरला होणार आहे. निवडणूक अधिकारी विजयानंद शर्मा यांनी याबाबतची माहिती दिली.  तर कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात सहा प्रभागांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आलं आहे. कोणत्या प्रभागातील निवडणूक पुढे ढकलली? अंबरनाथ नगरपरिषेदतील प्रभाग क्रमांक 5 ब आणि प्रभाग 15 ब, प्रभाग क्रमांक 17 अ, प्रभाग क्रमांक 10 ब, प्रभाग क्रमांक 8 अ, प्रभाग 19 अ या प्रभागात नव्या कार्यक्रमानुसार निवडणूक घ्य...

महत्त्वाचा 'सर्वोच्च' निकाल! आरोपीच्या अटकेनंतर २ तासांत पोलिसांना सांगावी लागतील अटकेची कारणे, अन्यथा...; गुन्हा जामिनपात्र असेल तर आरोपीला सांगणे बंधनकारक

इमेज
महत्त्वाचा 'सर्वोच्च' निकाल! आरोपीच्या अटकेनंतर २ तासांत पोलिसांना सांगावी लागतील अटकेची कारणे, अन्यथा...; गुन्हा जामिनपात्र असेल तर आरोपीला सांगणे बंधनकारक.    सोलापूर : गुन्हा दाखल झाल्यावर कायद्याबाबत अनभिज्ञ लोक पोलिस अटक करतील म्हणून घाबरून जातात. पण, गुन्ह्यात आरोपीला अटक केल्यावर दोन तासांत संबंधित आरोपीला अटकेची कारणे देणे पोलिसांसाठी बंधनकारक आहे.त्या आरोपीला अटकेची कारणे समजावून सांगितल्याचे न्यायालयात सांगावे लागते. पोलिसांनी हा आदेश पाळला नाही, तर आरोपीची अटक किंवा रिमांड बेकायदा ठरेल, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. भारतीय न्याय संहितेनुसार अलीकडे सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेच्या अनेक गुन्ह्यांत संशयित आरोपींना शक्यतो अटक केली जात नाही. संबंधितांना नोटीस बजावून पोलिस चौकशीला बोलावतात, त्यानंतरही गरज वाटली तर त्या आरोपीस अटक करून पुढील तपास पोलिस करू शकतात.  दुसरीकडे, ६० वर्षांवरील आरोपीस अटक करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यास पूर्वीचा गंभीर आजार असेल तर पोलिस शक्यतो अटक करत नाहीत. खास करून गुन्ह्यातील मुद्देमा...

सावकारी कर्ज आणि कायद्यातील तरतूद

इमेज
सावकारी कर्ज आणि कायद्यातील तरतूद  नंदुरबार महाराष्ट्र:सावकारी नियमनाचा कठोर कायदा असला तरी आजही गरजू सर्वसामान्य, शेतकऱ्यांना परवानाधारक किंवा विनापरवाना सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. याचे कारण बँकांकडून कर्ज मिळण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आणि वेळखाऊ असते.                             तातडीच्या गरजा आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पैसा सुलभपणे मिळत नाही. तसेच कर्जाची परतफेड न झाल्यामुळे बँकांकडून नवीन कर्जासाठी नकार देण्यात येतो. त्यामुळे सावकार हा एकमेव पर्याय उरतो. अनेकदा शेतकऱ्यांना बँकांच्या विविध कर्ज योजनांची माहितीच नसते. या कारणामुळे शेतकऱ्यांना अनेकदा सावकारांच्या जाळ्यात अडकावे लागते. ज्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होते. कायद्याने दंडाची तरतूद कर्जदाराची कोणतीही स्थावर मालमत्ता कर्जापोटी स्वतःच्या नावावर करून घेता येत नाही. कर्ज वसुलीसाठी दमदाटी, मारहाण करता येत नाही. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि कर्जदारांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हा निबंधक व इतर प्राधिकृत अधिकाऱ्यांची ने...

वंचित चे ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

इमेज
वंचित चे ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा  उल्हासनगर (अशोक शिरसाट) उल्हासनगर - ४ मध्ये सुभाष टेकडी येथे  सारंग थोरात यांनी प्रथम भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत केक कापून आपला वाढदिवस केला साजरा तसेच वाढदिवसा निमित्ताने सर्व कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना बॅग वाटप करण्यात आल्या  वंचित बहुजन आघाडीचे माजी अध्यक्ष नानासाहेब चव्हाण यांनी बोलताना सांगितले सारंग थोरात साहेब यांचे सामाजिक कार्य महान आहे असे चव्हाण वाढदिवसानिमित्त मागदर्शन करीत होते तसेच वंचितचे सारंग थोरात यांना पुढील वाटचालीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या असून या कार्यक्रमात  वंचित चे शेषराव वाघमारे,  रेखाताई उबाळे, उज्वल महाले , दिवाकर खळे, देवानंद ( प्रकाश) शिरसाट, महेंद्र अहिरे,प्रा सुरेश सोनवणे सर, प्रकाश इंगळे, प्रशांत सोनवणे, नितिन  भालेराव, निलेश  देवडे, दिपक आढाव, भारत थोरात, यांच्यासह भारतीय बौध्द महास...

लोकलच्या मालडब्यात बदल करून, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आकर्षक डबा तयार झाला आहे.

इमेज
लोकलच्या मालडब्यात बदल करून, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आकर्षक डबा तयार झाला आहे. मुंबईतील प्रत्येक लोकल ट्रेनमध्ये लागणार 'हा' एक्स्ट्रा डब्बा; तयारीही झाली, 'या' प्रवाशांना सर्वाधिक फायदा.           मध्य रेल्वेने एका नव्या बदलासंदर्भातील निर्णय घेतला असून त्याबद्दलचे रचनात्मक बदलही करण्यात आले आहेत. या निर्णायचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार आहेत.           रेल्वेने प्रवास आरामदायी होण्यासाठी लोकलचा मालडबा ज्येष्ठ नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने माटुंगा कारखान्यात लोकलच्या मालडब्यात बदल करून, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आकर्षक डबा तयार झाला आहे. नेमका काय आहे हा सारा प्रकार मध्य रेल्वेवरील प्रत्येक लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. लोकलमध्ये प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी असे डब्याचे प्रकार आहेत. तर, महिला, दिव्यांग आणि मालवाहतुकीसाठी स्वतंत्र डबे आहेत. गरोदर स्त्रियांना आणि ज्येष्ठ नागरिकांना लोकलच्या डब्यात काही आसने राखीव आहेत. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना गर्दीतून प्रवास करणे कठीण होते....

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण ब्लॉक

इमेज
मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण ब्लॉक मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी 10.40 ते दुपारी 3.40पर्यंत जलद मार्गावर ब्लॉक असेल. तसेच हार्बर लाईनवर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05पर्यंत ब्लॉक राहणार आहे. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.34 ते दुपारी 3.03पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्धजलद लोकल ठाणे व कल्याणदरम्यान धिम्या मार्गावर वळवल्या जातील.

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र झाला आहे. ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्रायलने इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलने इराणच्या मुख्य अणुऊर्जा प्रकल्पाचा भाग उद्ध्वस्त केला

इमेज
*जेरुसलेम/तेहरान : इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र झाला आहे. ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्रायलने इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलने इराणच्या मुख्य अणुऊर्जा प्रकल्पाचा भाग उद्ध्वस्त केला.*.    यानंतर शनिवारी पहाटे इराण आणि इस्रायलने एकमेकांवर पुन्हा हवाई हल्ले केले. इराणने या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत इस्रायलवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला आहे. आज पहाटे इस्रायलची दोन मोठी शहरे तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले, त्यामुळे रहिवाशांनी आश्रयस्थानांकडे धाव घेतली. लष्कराने सांगितले की, त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा कार्यरत असून इराणी क्षेपणास्त्रांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या तासाभरात इराणमधून इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली, त्यापैकी काहींना रोखण्यात यश आले आहे, असे लष्कराने सांगितले. इराणची राजधानी तेहरानमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त आहे. दोन क्षेपणास्त्रे तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर आदळली. या विमानतळावर लढाऊ विमाने आणि वाहतूक विमानांचा तळ आहे. स्फोटानंतर आगीचा भडका उडाल्याचे इर...

कोरोनाची साथ पुन्हा एकदा आली आहे, पण हा कोरोनाचा व्हेरिंयट तितका गंभीर नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेय.

इमेज
हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना महामारीने पुन्हा डोकं वर काढलेय. दोन्ही देशातील कोरोना रूग्णाची संख्या झपाट्याटे वाढत आहे, त्यामुळे निर्बंध लावले जाणार आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरनंतर आता मुंबईतही धोक्याची घंटा वाजली आहे. मुंबईमध्ये कोरोना रूग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे समजतेय. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णात झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णसंख्येत आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्याच्या रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत. २०२० ते २०२२ या काळात जगात हाहाकार माजवणाऱ्या आणि लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलेय. कोरोनाची साथ पुन्हा एकदा आली आहे, पण हा कोरोनाचा व्हेरिंयट तितका गंभीर नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेय. कोरोना पुन्हा आला असला तरी घाबरण्याचे कारण नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. कोरोनाची लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता उपाय योजना कराव्यात, असेही सांगितलेय. केंद्रीय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी देशात ९३ कोर...

बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी मोठी महत्वाची बातमी समोर येत आहे. खरेतर, RBI ने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतलाय ज्याअंतर्गत पाच महत्त्वाच्या बँकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

इमेज
RBI चा बँक ऑफ महाराष्ट्राला मोठा दणका, BOM वर मोठी कारवाई, आकारलेला दंड ग्राहकांकडून वसूल केला जाणार नाही  बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी मोठी महत्वाची बातमी समोर येत आहे. खरेतर, RBI ने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतलाय ज्याअंतर्गत पाच महत्त्वाच्या बँकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.        देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून अर्थातच आरबीआयकडून गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक सहकारी सहकारी आणि खाजगी बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच काही बँकांचे लायसन्स रद्द करण्याचा सुद्धा निर्णय आरबीआय कडून घेण्यात आलाय. आरबीआय देशातील सर्व सहकारी सहकारी आणि खाजगी बँकांवर नजर ठेवून असते. देशातील सर्वच बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते. जर देशातील बँकांनी आरबीआयच्या नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई होते. अशातच आता आरबीआयने देशातील पाच महत्त्वाच्या बँकांवर कारवाई केली असून यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचा सुद्धा समावेश होतो. आरबीआय ने बँक ऑफ महाराष्ट्र सहित पाच महत्त्वाच्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) या स...