पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

इमेज

भारत पुन्हा गुलामगिरीच्या दिशेने; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात*

इमेज
* भारत पुन्हा गुलामगिरीच्या दिशेने; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात*   * मुंबई/ (प्रतिनिधी, अशोक शिरसाट)*  आर.एस.एस.चे इस्रायलशी असलेले संबंध, केंद्राचे परराष्ट्र धोरण आणि अमेरिकेसोबतचे एकतर्फी करार यामुळे भारत पुन्हा एकदा गुलामगिरीच्या दिशेने जात असल्याची भीती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. या धोरणांमुळे भारतीय नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली असून, देशात संतापाची लाट असल्याचे सांगत आंबेडकरांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेल्या 'एपस्टीन फाईल्स' आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या एकतर्फी व्यापार कराराच्या निषेधार्थ सोमवारी मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसर कार्यकर्त्यांच्या घोषणांनी दणाणून गेला होता. ' * मोदी हटाव, देश बचाव'च्या घोषणांनी मुंबई दणाणली*  या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी 'मोदी हटाव, देश बचाव' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आंदोलनाचे गांभीर्य लक्ष...

दिव्यांगांना आता १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य; तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णयतीन दशकानंतर निधीत १५ पट वाढ; स्वयंरोजगारासाठी 'दिव्यांग सहाय्यक' पोर्टलवर नोंदणीचे आवाहन

इमेज
दिव्यांगांना आता १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य; तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय तीन दशकानंतर निधीत १५ पट वाढ; स्वयंरोजगारासाठी 'दिव्यांग सहाय्यक' पोर्टलवर नोंदणीचे आवाहन मुंबई : राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी आणि त्यांच्या स्वयंरोजगाराला बळ देण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री (टूलकिट) खरेदी करण्याकरिता आता १,००० रुपयांऐवजी थेट १५,००० रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तब्बल ३० वर्षांनंतर या रकमेत १५ पटीने वाढ करण्यात आल्याने दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, "विकसित महाराष्ट्र २०४७" या आराखड्याचा भाग म्हणून दिव्यांगांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हे शासनाचे मुख्य ध्येय आहे. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि स्वरूप थेट लाभ हस्तांतरण (DBT): मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाईल. पात्रता: अर्जदाराने शासकीय किंवा शासनमान्य संस्थेतून कौशल्य ...

राज्याचा ऐतिहासिक निर्णय: शासकीय वसतिगृहांच्या नावांतून 'मागासवर्गीय' शब्द कायमचा वगळला ! मुलांच्या वसतिगृहांना 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर', तर मुलींच्या वसतिगृहांना 'सावित्रीबाई फुले' यांचे नाव

इमेज
राज्याचा ऐतिहासिक निर्णय: शासकीय वसतिगृहांच्या नावांतून 'मागासवर्गीय' शब्द कायमचा वगळला! ​मुलांच्या वसतिगृहांना 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर', तर मुलींच्या वसतिगृहांना 'सावित्रीबाई फुले' यांचे नाव ​मुंबई: राज्यातील सामाजिक विषमता नष्ट करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारने आज एक अत्यंत क्रांतीकारी आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या शासकीय वसतिगृहांच्या नावांतून 'मागासवर्गीय' हा शब्द आता कायमचा वगळण्यात आला असून, या वसतिगृहांना आता महापुरुषांची नावे देण्याचा शासन आदेश (GR) जारी करण्यात आला आहे. ​बदलाचे नेमके कारण काय? ​राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत एकूण ४४९ शासकीय वसतिगृहे चालवली जातात. यातील बहुतांश वसतिगृहांच्या नावांत 'मागासवर्गीय' असा उल्लेख होता. शासनाच्या मते, 'मागासवर्गीय' या शब्दामुळे समाजातील उपेक्षित आणि शोषित घटकांची ओळख अधोरेखित होऊन त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन दूषित होतो. ही विषमता मुळापासून उपटून टाकण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वाभिमान जागवण्यास...

स्त्रीच्या अंतर्मनातील न बोललेल्या भावनांचा शब्दबद्ध इतिहास: 'गर्भातील सावल्या'*

इमेज
* स्त्रीच्या अंतर्मनातील न बोललेल्या भावनांचा शब्दबद्ध इतिहास: 'गर्भातील सावल्या'*  ​ * पुणे/प्रतिनिधी:*  स्त्री मनाच्या वेदना, तिचा संघर्ष, आशा आणि अस्तित्वाच्या शोधाचा एक अंतर्मुख प्रवास म्हणजे कवयित्री प्रतिभा विनायक पवार यांचा 'गर्भातील सावल्या' हा काव्यसंग्रह. नावाप्रमाणेच या संग्रहातील कवितांमध्ये अंधार-प्रकाश, वेदना-आशा आणि बंधन-मुक्ती यांचा एक संवेदनशील खेळ वाचकांना पाहायला मिळतो. ​ *स्त्री जीवनाचा आरसा*  ​या संग्रहातील ‘ती एक स्त्री...’, ‘स्त्री मनाचा वेध’ आणि ‘तू एक बंदिस्त स्त्री’ यांसारख्या कविता स्त्रीच्या अदृश्य यातना आणि तिच्या अफाट सहनशीलतेचे प्रभावी चित्रण करतात. कवयित्रीने स्त्री जीवनातील तडजोड, सामाजिक बंधने, पुरुषप्रधान संस्कृतीतील संघर्ष आणि स्वसन्मानाचा लढा अत्यंत प्रामाणिकपणे शब्दांत मांडला आहे. ​ * साधी पण भावस्पर्शी मांडणी*  ​या संग्रहाची भाषाशैली साधी, सरळ आणि थेट काळजाला भिडणारी आहे. केवळ शब्दांची जुळवाजुळव किंवा अलंकारिकतेपेक्षा अनुभवांची तीव्रता आणि भावनेची प्रामाणिकता याला येथे अधिक महत्त्व दिले गेले आहे. वाचक जेव्हा ही कविता...

जनहित'न्यूज महाराष्ट्रच्या ठाणे जिल्हा क्राईम रिपोर्टर पदी मच्छिंद्र मोरे यांची नियुक्ती

इमेज
* जनहित'न्यूज महाराष्ट्रच्या ठाणे जिल्हा क्राईम रिपोर्टर पदी मच्छिंद्र मोरे यांची नियुक्ती*   ​ * ठाणे (प्रतिनिधी आबासाहेब साठे )*   राज्यात आपल्या परखड पत्रकारितेमुळे अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले 'जनहित न्यूज महाराष्ट्र' आणि 'साप्ताहिक बातमी जनहित' या वृत्तसमूहाचा विस्तार आता अधिक जोमाने होत आहे. जनहित कार्याचा आणि अन्यायाविरुद्धचा आवाज तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये ठाणे जिल्हा क्राईम रिपोर्टर म्हणून मच्छिंद्र विक्रम मोरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. ​ * मान्यवरांची उपस्थिती:*  या विशेष नियुक्ती प्रसंगी जनहित न्यूज महाराष्ट्र व'बातमी जनहित'चे संपादक व अध्यक्ष श्री. हरी चंदर आल्हाट यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन मोरे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी कार्यकारी संपादक विनोद तायडे, प्रतिनिधी आबासाहेब साठे यांच्यासह जनहित परिवारातील सदस्य आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​मच्छिंद्र मोरे यांच्या नियुक्तीमुळे ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी क्षेत्रातील बातम्यांना वाचा फोडण्यास आणि सर्...

*उल्हासनगर महापालिका निवडणूक २०२६: प्रभाग क्र. १७ मधून हरी चंदर आल्हाट निश्चितपणे अपक्ष लढणार!*

इमेज
*उल्हासनगर महापालिका निवडणूक २०२६: प्रभाग क्र. १७ मधून हरी चंदर आल्हाट निश्चितपणे अपक्ष लढणार!*   *उल्हासनगर:आबासाहेब साठे*  उल्हासनगर महानगरपालिकेच्या २०२६ च्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १७ मधून एक महत्त्वाची घोषणा झाली आहे. स्थानिक जनसेवक श्री. हरी चंदर आल्हाट यांनी आगामी महापालिका निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवण्याचा आपला निर्णय निश्चित केला आहे. श्री. आल्हाट यांनी घेतलेला हा ठाम निर्णय प्रभाग क्र. १७ मध्ये मोठी राजकीय चुरस निर्माण करणारा ठरणार आहे.  *नागरिकांसाठी लढणार!*  प्रभागातील नागरिक आणि समस्यांवर प्रकाश टाकताना श्री. हरी चंदर आल्हाट म्हणाले की प्रभागतील अनेक विकास कामे रखडली आहेत त्यांना पूर्ण करण्याची गरज आहे  १ ) पिण्याचे पाण्याची समस्याचे निवारण  २ )  ओला व सुका कचरा वेग वेगळा टाकण्यासाठी प्रभागात ठीक ठिकाणी व्यवस्था करणे  ३ )  कचरा उचलण्यासाठी प्रत्येक वस्ती मध्ये वेळेवर घंटा गाडीची वेळ निश्चित करणे  ४ ) सांडपाणी सुरूळीत वाहून जाण्यासाठी नाली व गटारे व्यवस्थित करणे व नाली वर ढाकणे बसविणे ५ ...

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप

इमेज
जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप उल्हासनगर: जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून उल्हासनगर शहरात ३ डिसेंबर २०२५ रोजी 'दिव्यांग आधार सेवा संस्थे'च्या वतीने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उल्हासनगर महानगरपालिकेच्या सहकार्याने अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना पालिका ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले,  ज्यामुळे त्यांना महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसेसमधून मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. दिव्यांग आधार सेवा संस्थेने गेली दीड वर्ष केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून, या ओळखपत्र वाटपामुळे शहरातील नोंदणीकृत दिव्यांग बांधवांना महापालिका परिवहन विभागाच्या बसेसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे.  आपली मागणी पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी महापालिकेचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उल्हासनगर महापालिका प्रशासक तथा आयुक्त श्रीमती आव्हाळे मॅडम यांच्यासह दिव्यांग कल्याणकारी विभागाचे उपायुक्त साहेब, दिव्यांग कल्याणकारी विभागाचे वरिष्ठ लिपिक, व...