पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कलर्स मराठी वरील कस्तुरी मालिकेत आशु सुरपूर दमदार भूमिकेत

इमेज
कलर्स मराठी वरील कस्तुरी मालिकेत आशु सुरपूर दमदार भूमिकेत प्रतिनिधी मुंबई: सोमवार दिनांक 26 जुन 2023 पासून रात्री साडे दहा वाजता नव्याने सुरू झालेल्या कस्तुरी या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आशु सुरपूर ही एका महत्त्वाच्या भूमिका मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये तिच्यासोबत शिल्पा कुलकर्णी यांची भूमिका असून या मालिकेचे दिग्दर्शक  दीपक नलावडे आहेत.  आज पर्यंत अनेक  चित्रपटांमध्ये आपण तिला पाहिलेले आहे. या मालिकेच्या निमित्ताने गप्पा मारत असताना आपण स्वकष्टाने आतापर्यंत जवळपास 20 मालिकांमध्येही  अभिनयाचा प्रवास  पूर्ण केल्याचे तिने सांगितले. कोविडच्या कालावधीमध्ये अचानक झालेल्या आईच्या निधनामुळे ती पूर्ण खचून गेली होती. इंडस्ट्रीमध्ये पुन्हा आगमन करण्यासाठी कस्तुरी मालिकेचे कार्यकारी निर्माते सुनील कुलकर्णी यांनी दिलेली संधी तिने स्वीकारली. त्याबद्दल ती त्यांचे आभारही मानते.  "सुरुवात छोटी असली तरी चालेल, मोठे होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे असते". असे मत व्यक्त करून आशु सुरपूर हिने तिच्या महाराष्ट्रातील तमाम चाहत्या प्रेक्षकांना ही मालिका बघण्या

उल्हासनगर महानगरपालिका इमारतीमध्ये राहत असलेले कर्मचारी यांना भरमसाठ घर भाडे कपात करूनही मूलभूत सुविधा मिळत नाहीत

इमेज
उल्हासनगर महानगरपालिका इमारतीमध्ये राहत असलेले कर्मचारी यांना भरमसाठ घर भाडे कपात करूनही मूलभूत सुविधा मिळत नाहीत उल्हासनगर महानगरपालिकेच्या ए बी आणि सी अशा एकूण तीन इमारती उल्हासनगर महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांना राहण्याकरिता दिलेल्या आहेत या इमारतीमध्ये एकूण 128 खोल्या आहेत,प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्यांच्या वेतनातून घर भाडे कपात होत आहे उल्हासनगर महानगरपालिका इमारतीमध्ये मागील अनेक वर्षापासून पाणीपुरवठा करणारी जलपरी ही मोटर बंद पडली असून स्थानिक रहिवासी यांना पिण्याचे पाणी मिळत नाही,घराच्या खिडक्या व दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असून याची डागडुजी सुद्धा महानगरपालिका करीत नाही,पीडब्ल्यूडी विभागाकडे या इमारतीचे विकास कामाची मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मिळत असतानाही पीडब्ल्यूडी विभागाने या इमारतीची कोणतीही डागडुजी केली नाही,कर्मचाऱ्यांच्या वेतनातून घर भाडे रुपये सहा हजार पासून  साडे आठ हजार रुपये पर्यंत घर भाडे कपात होत आहे परंतु कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या इमारतीमध्ये सुविधा मिळत नाही,अशा तक्रारी इमारतीमध्ये राहत असलेले कर्मचारी करीत आहेत, दिनांक १७/०८/२०२२

महानगर पालिका वसाहती मध्ये राहतं असलेल्या सफाई कामगार यांना मिळणार मालकी हक्काचं घर..उ म पा आयुक्त यांनी दीले आश्वासन

इमेज
महानगर पालिका वसाहती मध्ये राहतं असलेल्या सफाई कामगार यांना मिळणार हक्काचं घर..उ म पा आयुक्त यांनी दीले आश्वासन   उल्हासनगर प्रतिनिधी. दिनांक १७/०८/२०२२ रोजी उल्हासनगर महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी यांच्या हक्काच्या घराबाबत प्रलंबित असलेले प्रकरण घेऊन हरि चंदर आल्हाट यांनी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर माटे यांना निवेदन देण्यात आले होते   त्या निवेदनाची दखल घेऊन कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर माटे कोकण विभागीय अध्यक्ष नितीन साळवे कोकण विभागीय सचिव आनंद भाऊ गांगुर्डे व हरि चंदर आल्हाट तसेच त्यांचे सहकारी यांनी उल्हासनगर महानगर पालिका आयुक्त अजीज शेख यांना उल्हासनगर महानगर पालिका वसाहती मध्ये राहतं असलेल्या सफाई कर्मचारी यांना हक्काची घरे देण्यात यावी असे लेखी पत्र देवून विनंती केली असता तत्काळ आयुक्त साहेब यांनी उप आयुक्त व संबधित अधिकारी यांना आदेश दिलें की लवकरात लवकर सफाई  कामगारांच्या मालकी हक्काच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी आदेश देण्यात आले.

.मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा टँकर उलटला आहे.

इमेज
 मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर टँकर उलटला मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणामपुण्यातून टँकर अपघाताची मोठी अपघात घडली आहे. गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना घडली आहे. चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने आज पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा टँकर उलटला आहे. यामुळे या जुन्या महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात काल मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या दरम्यान गॅस कॅप्सूल टँकरचा अपघात झाला. गॅस कॅप्सूल टँकर चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने वाहन उलटून हा अपघात झाला आहे. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बीपीसीएल कंपनीच्या या गॅस टँकरचा अपघात झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील जुन्या पुणे - मुंबई महामार्गावरील मधुकरराव पवळे पुलाच्या सुरुवातीलाच हा अपघात झाला आहे.वायू गळती थांबवण्याचा प्रयत्न सुरू गॅस टँकरचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यांनंतर पिंपरी चिंचवड महापालिकेचे अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी वायू गळती थांबवण्याचे

प्रवाशांची गर्दी‎ लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी ७६ विशेष‎ गाड्यांचे नियोजन केले आहे

इमेज
प्रवाशांची गर्दी‎ लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी ७६ विशेष‎ गाड्यांचे नियोजन केले आहे अमरावती: पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त‎ संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक‎ दाखल होतात. प्रवाशांची गर्दी‎ लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी ७६ विशेष‎ गाड्यांचे नियोजन केले आहे.‎ यातील १६ फेऱ्यांतून विदर्भातील‎ भाविकांचीही सोयी होणार आहे.‎ यात‎ नागपूर-मिरज (४ फेऱ्या),‎ नागपूर-पंढरपूर (४ फेऱ्या), नवी‎ अमरावती-पंढरपूर (४ फेऱ्या), व‎ खामगाव-पंढरपूर (४ फेऱ्या) या विशेष गाड्या ‎ विदर्भातून धावणार आहेत,नागपूर-मिरज विशेष गाडी‎ क्रमांक ०१२०५ विशेष गाडी २५‎ आणि २८ जून रोजी ८.५० वाजता ‎ ‎ नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी‎ ११.५५ वाजता मिरजला पोहोचेल.‎ तर गाडी क्रमांक ०१२०६ ही गाडी २६‎ आणि २९ जून रोजी १२.५५ वाजता‎ सुटून दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता‎ नागपूरला पोहोचेल. या गाडीला‎ अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव,‎ चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर,‎ अकोला, शेगाव, मलकापूर,‎ भुसावळ, जळगाव, चाळीसगाव,‎ मनमाड, कोपरगाव, बेलापूर,‎ ‎अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी,‎ पंढरपूर, सांगोला, म्हसाबा‎ डोंगरगाव, जठरगाव धालगाव,‎ कवठेमह

नासिक मध्ये उभ्या असलेल्या बसला लागली आग

इमेज
*नासिक मध्ये उभ्या असलेल्या बसला लागली आग *                            नाशिक: नाशिकमध्ये मोठी दुर्घटना टळली,,नाशिकच्या नांदगाव बसस्थानकात उभ्या असलेल्या बसने अचानक पेट घेतला.आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही क्षणात बस पूर्णपणे जळून खाक झाली. बसमधील चालक - वाहकासह सर्व प्रवासी हे खाली उतरलेले असल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.   नाशिकच्या नांदगाव बस स्थानकात हा प्रकार घडला. बस मधून धूर येत होता. यामुळे वाहक आणि चालकाने सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. आजूबाजूला उभ्या असलेल्या बस प्रसंगावधान राखत सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्या. तसेच प्रवाशांना तात्काळ बाजूला हलविण्यात आल्याने इतर नुकसान टळले. दरम्यान, बसला आग लागली तेव्हा आग थोड्या प्रमाणात होती मात्र आगीवर नियंत्रण मिळविण्याची साधनसामुग्री वेळेत उपलब्ध न झाल्याने बस पूर्णतः जळून खाक झाली. बॅटरीच्या शॉर्ट सर्किट झाल्याने बस पेटली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

लावणी सम्राज्ञीवर आली बसस्टॉपवर भीक मागण्याची वेळ.

इमेज
लावणी सम्राज्ञीवर आली बसस्टॉपवर भीक मागण्याची वेळ. कोपरगांव:( गणेश तळेकर) सध्या सोशल मीडियावर एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत ही महिला या रावजी बसा भावोजी हे गाणे हातवारे करत गात आहे. या महिलेला तुम्ही ओळखळलंत का? ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर आहेत.                     सध्या त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे सांगितले जात आहे. कोपरगाव येथील बस स्थानकावर त्या गेल्या अनेक वर्षांपासून भीक मागत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे त्या कलावंत असल्याचे समजले. कोपरगावचे बसस्थानक हेच त्यांचे घर बनले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच स्थानिक कार्यकर्त्यांनी शांताबाई यांना हुडकून काढले. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शांताबाई कोपरगावकर यांना शासनाने आर्थिक मदत मिळवून द्यावी आणि कलावंतांची दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे. सुरेखा पुणेकर यांनी देखील शांताबाईंना योग्य ती मदत मिळवून द्यावी असे म्हटले आहे. या घटनेनंतर शांताबाईंचे मानसिक संतुलन

ऑगस्टपर्यंत पिण्याचे मुबलक पाणी; अहमदनगर जिल्ह्यातील धरणांत 38 टक्के साठा

इमेज
ऑगस्टपर्यंत पिण्याचे मुबलक पाणी;   अहमदनगर जिल्ह्यातील धरणांत 38 टक्के साठा  अहमदनगर; पावसाळा लांबल्यामुळे जनतेचे लक्ष आता साहजिकच जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याकडे वळाले आहे. आजमितीस धरणांत 18 हजार 783 दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. एकूण क्षमतेच्या 37.42 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मुळा धरणात 9 हजार 350 व भंडारदरा धरणात 5 हजार 697 दलघफू इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लांबला तरीही, या दोन मोठ्या धरणांवरील पाणीयोजनांना ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी पाणी पुरणार आहे. जिल्ह्यात मध्यम व मोठे असे एकूण आठ धरणे आहेत. त्यांची एकूण पाणीसाठवण क्षमता 50 हजार 188 दलघफू इतकी आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून जिल्हाभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अधिक पाऊस झाल्याने जिल्हाभरातील लहान-मोठी धरणे ओव्हरफ्लो झाली. धरणांच्या लाभक्षेत्रात देखील चांगला पाऊस झाल्यामुळे भूजलपातळी देखील कमालीची वाढलेली आहे. त्यामुळे गावागावांतील विहिरींची पाणीपातळी देखील वाढलेली होती. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी आवर्तनाची म्हणावी अशी गरज लागली नाही. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरूच राहणार

इमेज
पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरूच राहणार         सर्वाधिक श्रोते असलेल्या आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडून प्रसारित होणारी बातमीपत्रे छत्रपती संभाजीनगर केंद्राकडे सोपविण्याच्या निर्णयाला अखेर गुरुवारी प्रसारभारतीने स्थगिती दिली.   पुणे : आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना स्वातंत्र्याच्या 5-6 वर्षानंतर म्हणजेच 1953 रोजी झाली. गेल्या 40 वर्षापासून या केंद्रावरुन नियमित बातमीपत्र प्रसारित होत होत्या. आकाशवाणीची बातमी म्हणजे विश्वास, आकाशवाणीची बातमी म्हणजे खात्री, आकाशवाणीची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी असं चित्र आजही आहे. पुढील आदेशापर्यंत सध्याचीच व्यवस्था कायम राहील, असे प्रसारभारतीच्या आदेशात म्हटले आहे. प्रादेशिक वृत्त विभागाकडून प्रसारित होणारी बातमीपत्रे छत्रपती संभाजीनगर केंद्राकडे सोपविण्याच्या निर्णयाला होणारा विरोध पाहता त्या पार्श्वभूमीवर प्रसारभारतीने तूर्तास तरी स्थगितीचा निर्णय घेतला आहे. प्रसारभारतीतर्फे गुरुवारी दुपारी याबाबतचे आदेश काढण्यात आले. या आदेशात आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी प्रसारित होणारे बातमीपत्र तस

सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे संचालक राजकुमार शर्मा यांचा वाढदिवस उल्हासनगर मध्ये मोठ्या उत्साहात साजरा

इमेज
सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे संचालक राजकुमार शर्मा यांचा वाढदिवस उल्हासनगर मध्ये मोठ्या उत्साहात साजरा उल्हासनगर: राजकुमार शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांना वह्या पेन आणि खाऊ वाटप करण्यात आला तसेच गरजवंत महिलांना राशन किट वाटप करण्यात आली उल्हासनगर कॅम्प नंबर ५ मधील श्री स्वामी शांती प्रकाश वृद्धाश्रम या ठिकाणी वृद्ध नागरिकांसोबत केक कापून राजकुमार शर्मा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे संपादक हरी आल्हाट , जनहित स्वयंसेवी संस्थेच्या महाराष्ट्र अध्यक्षा ज्योती पवार, प्रिया समाज विकास सामाजिक संस्था च्या संस्थापिका सौ प्रिया गायकवाड, प्रिया समाज विकास सामाजिक संस्थाच्या खजिनदार सौ सुरेखा तळेकर तसेच जनहित न्यूज महाराष्ट्र चे कार्यकारी संपादक हर्षद पठाडे, तसेच अनेक महिला व बालके उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर

लोकांनी बुद्ध वाचला पाहिजे- मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड.

इमेज
लोकांनी बुद्ध वाचला पाहिजे- मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड. पद्मश्री रमेश पतंगे यांच्या तथागतांचा कर्तव्य धर्ममार्ग पुस्तकाचे प्रकाशन संपन्न. लातूर : साप्ताहिक विवेक नी प्रकाशीत केलेले पद्मश्री रमेश पतंगे यांच्या तथागतांचा कर्तव्य धर्ममार्ग पुस्तकाचे प्रकाशन लातूर चे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मभूषण आदरणीय डॉ अशोक कुकडे काका यांच्या विशेष उपस्थितीत आणि लातूर चे खासदार सुधाकर शिंगारे,संजय कांबळे  यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रमुख वक्ता संजय कांबळे यांनी तथागताचा कर्तव्य धर्ममार्ग या पुस्तकाच्या संदर्भात माहिती दिली.सुधाकर सिंगारे यांनी ही आपले मत व्यक्त केले.पद्मभूषण डॉ अशोक कुकडे काका यांनी आपल्या मनोगतात १९५४ पासून बुद्ध शी माझा अभ्यास आहे असे सांगून जातक कथा च्या माध्यमातून बुद्धाचे ज्ञान लोकापर्यंत गेले आहे असे म्हणाले. अध्यक्षीय समारोप करताना माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड म्हणाले की पद्मश्री रमेश पतंगे यांनी लिहलेला ग्रंथ तथागतांचा कर्तव्य धर्ममार्ग पुस्तक हे सर्वांनी वाचले पाहिजे आणि लेखकांनी बुद्धांच्या