पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विद्यार्थी तसेच सर्वसामान्यांना महापुरूषांचे योगदान समजावणे गरजेचे

इमेज
विद्यार्थी तसेच सर्वसामान्यांना महापुरूषांचे योगदान समजावणे गरजेचे भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे सुंदर डांगे यांचा सकल्प अंबरनाथ: समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांमध्ये निसर्गाने विशिष्ट कौशल्य जन्मजात दिलेले आहेत परंतु त्याचा पुरेपुर उपयोग शिक्षणामुळेच होऊ शकतो याची जाणीव ठेऊन शिक्षणासाठी पुढाकार घेणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी अंबरनाथ शहरातील आंबेवाडी या आदिवासी वस्तीवर भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने साजरी करण्यात आली, समाजासाठी आपले योगदान देणारे तसेच समाजात शिक्षणाची क्रांती घडवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी माहिती विचारताच विद्यार्थ्यांकडुन नकारार्थी मान हलवताच उपस्थिंताचे ह्रदय हेलावून गेले,  स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना तळागाळातील लोकांपर्यंत त्याग व बलिदान देणारे समाजसेवक यांचे योगदान बिंबवण्यात आपण कुठेतरी कमी पडलो आहोत अशी खंत सुन्दर डांगे यांनी व्यक्त केली भटके विमुक्त सामाजिक संस्था महापुरूषांच्या योगदानाबद्दल शाळास्तरावर व सामाजिक कार्यातून जनजागृती करेल असे आश्वासन भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे सु

उल्हासनगर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील दोनशे ते अडीचशे आशा स्वयंसेविका महिला यांना मनसे संघटनेच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त पहिल्यांदाच मिळाले सानुग्रह अनुदान

इमेज
उल्हासनगर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील दोनशे ते अडीचशे आशा स्वयंसेविका महिला यांना मनसे संघटनेच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त पहिल्यांदाच मिळाले सानुग्रह अनुदान                  उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात दोनशे ते अडीचशे अशा स्वयंसेविका , ऊन ,वारा ,पाऊस, सहन करत घरोघरी जाऊन आपले कर्तव्य बजावत असतात परंतु त्यांची दखल उल्हासनगर महानगरपालिकेने कधीही घेतलेली नाही  कोरोना काळात स्वतःची काळजी न घेता नागरी सुविधासाठी त्यांनी उत्तम प्रकारे आपले कर्तव्य बजावले होते त्यांच्या या कार्याचे कौतुक सुद्धा केले गेले होते.                                 आशा स्वयंसेविका यांनी सुरुवातीच्या अनेक वर्षापासून उल्हासनगर महानगरपालिकेकडे दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान मिळावा याकरिता मागणी केली होती अनेक वेळा आंदोलन सुद्धा केले होते परंतु महानगरपालिकेने आज पर्यंत दखल न घेतल्याने आशा स्वयंसेविका यांनी आज दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी महानगरपालिका गेटवर आरती ओवाळून तसेच संबंधित अधिकारी यांना दिवाळी भेट म्हणून प्रत्येक आशा स्वयंसेविका यांनी एका बॉक्समध्ये पैसे टा

विश्व कप 2023 का फाइनल मुकाबला भारत और ऑस्ट्रेलिया के बीच खेला गया। इस मैच में ऑस्ट्रेलिया ने भारत को हराकर 6वीं बार वनडे विश्व कप खिताब को अपने नाम किया है.

इमेज
विश्व कप 2023 का फाइनल मुकाबला भारत और ऑस्ट्रेलिया के बीच खेला गया। इस मैच में ऑस्ट्रेलिया ने भारत को हराकर 6वीं बार वनडे विश्व कप खिताब को अपने नाम किया है.                     भारत द्वारा मिले 241 रनों के लक्ष्य को ऑस्ट्रेलिया ने 4 विकेट खोकर हासिल किया। ऑस्ट्रेलिया की तरफ से इस मैच में ट्रेविस हेड ने सबसे ज्यादा 137 रनों की पारी खेली। अपनी पारी के दौरान हेड ने 15 चौके और 4 छक्के लगाए। इसके अलावा मार्नस लाबुसेन ने नाबाद 58 रनों की पारी खेली। शुरुआती 3 विकेट जल्दी गिरने के बाद ट्रेविस हेड ने न सिर्फ पारी को संभाला बल्कि टीम को जीत दिलाने में अहम भूमिका निभाई। भारत की तरफ से गेंदबाजी करते हुए जसप्रीत बुमराह ने सबसे ज्यादा 2 विकेट अपने नाम किए। इसके अलावा मोहम्मद शमी ने एक विकेट अपने नाम किया।

प्रणव गणेश कोतवाल यांनी बॉडी बिल्डर स्पर्धेत जिंकला गोल्ड मेडल

इमेज
प्रणव गणेश कोतवाल यांनी बॉडी बिल्डर स्पर्धेत जिंकला गोल्ड मेडल  अंबरनाथ बारकु पाडा येथे राहणारा कु प्रणव गणेश कोतवाल याने कोरिया येथे झालेल्या बॉडी बिल्डर स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकून फक्त अंबरनाथ व महाराष्ट्र देशाची मान उंचावल्या बद्दल  अंबरनाथ बारकूपाडा येथे जाऊन दीपक सोनवणे आबासाहेब साठे संगीता साळवे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्याचा सत्कार केला अशी माहिती आबासाहेब साठे यांनी दिली संपादक हरी आल्हाट 9960504729

व्हाईस ऑफ मीडिया राज्य शिखर अधिवेशन१४ ठराव मंजूर, शासनाकडे करणार पाठपुरावा

इमेज
पत्रकारांनी भरगच्च  ‘गदिमा’ ठरले अधिवेशन ठरावाच्या मंजुरीचे साक्षिदार ! व्हाईस ऑफ मीडिया राज्य शिखर अधिवेशन १४ ठराव मंजूर, शासनाकडे करणार पाठपुरावा बारामती :  दोन दिवसापासून बारामती येथे सुरू असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या राज्य शिखर अधिवेशना चा समारोप झाला. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यासह १४ ठराव यावेळी मांडण्यात आले. हात उंचावून पत्रकारांनी भरगच्च असलेले  "गदिमा सभागृह" या ठरावाच्या मंजुरीचे साक्षिदार ठरले! या प्रसंगी मंचावर राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के,  राज्य उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ यांच्यासह प्रदेश टीम, विभागीय अध्यक्ष, आणि सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.  व्हाईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी संजय पडोळे यांनी ठराव वाचन या प्रसंगी केले. यात १. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा. २. रेडिओ टीव्ही सोशल मिडिया कर्मचाऱ्यांना श्रमिक पत्रकार मान्यता द्यावी. ३. पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी क

अंबरनाथ वाहतूक नियंत्रण शाखा तसेच भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने दिवाळीनिमित्त महिलांना साडी व मिठाई वाटप

इमेज
 दिवाळीनिमित्त महिलांना साडी व मिठाई वाटप अंबरनाथ मधील आंबेवाडी या आदिवासी पाड्यात अनेक गरजवंत महिला व बालके असून आंबेवाडी मध्ये कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा अंबरनाथ नगर परिषदेने केलेल्या नाहीत अशी माहिती भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी जनहित न्यूज महाराष्ट्र ला दिली जनहित न्यूज महाराष्ट्राची टीम यांनी अंबरनाथ मधील आंबेवाडी या आदिवासी पाड्यात जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी सुंदर डांगे यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे सर्व काही निदर्शनास आले होते जनहित न्यूज च्या माध्यमातून आंबेवाडी ची बातमी जनहित न्यूज महाराष्ट्र चैनलवर प्रदर्शित करण्यात आली असता अनेक प्रेक्षकांनी बातमी पाहिली जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेलची बातमी अंबरनाथ वाहतूक नियंत्रण शाखेचे संबंधित अधिकारी यांना सुंदर डांगे यांनी दाखवली असता अंबरनाथ वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी यांनी तात्काळ सुंदर डांगे यांच्याशी चर्चा करून दिवाळीनिमित्त महिलांना साडी व मिठाई वाटप कार्यक्रम दिनांक १३ नोव्हेंबर 2023 रोजी अंबरनाथ येथील आंबेवाडी या ठिकाणी करण्यात आला

माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नांतून बनविलेल्या प्रेरणादायी भक्ती - शक्ती चौकात दिवाळी निमित्त मातीचे दिवे लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला.

इमेज
माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नांतून बनविलेल्या प्रेरणादायी भक्ती - शक्ती चौकात दिवाळी निमित्त मातीचे दिवे लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला.   अंबरनाथ: दीपोत्सव कार्यक्रम संवाद फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.सुवर्णा साळुंके यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आला.                                        या प्रसंगी शिवाजीनगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत व पोलिस निरीक्षक कांबळे, यांच्या शुभहस्ते  करण्यात आला. यावेळी विभागातील मोठया संख्येने उपस्थित असलेल्या जेष्ठ नागरिक, महिला व युवक यांच्या उपस्थित 201 दिव्यांचे प्रज्वलन करण्यात आले, यावेळी प्रशांत उतेकर,सुमित बनसोडे, कुमारी मानसी साळुंके, सिध्दी शेलार, राजकुमार जमखंडीकर, सार्थक साळुंके, सौ.सुनंदा मांढरे उपस्थित होते, अंबरनाथ नगर परिषदे हद्दीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी सुभाष साळुंके यांनी केलेल्या मागणीला आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  २.५ कोटी रुपये मंजूर केले, असल्याची माहिती साळुंके यांनी  दिली.  यावेळ

खाजगीकरणाच्या सरकारी धोरणाविरोधात उल्हासनगर महानगरपालिकेच्या गेटवर उग्र निदर्शने व उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन*

इमेज
* खाजगीकरणाच्या सरकारी धोरणाविरोधात उल्हासनगर महानगरपालिकेच्या गेटवर उग्र निदर्शने व उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन*  ' *मिशन जय भारत* अंतर्गत खाजगीकरणाच्या सरकारी धोरणानुसार मुरबाड रोड, म्हारळ येथील उन्हासनगर महानगरपालिकेचे रुग्णालय  सार्वजनिक खाजगी भागीदारी (P.P.P) मध्ये प्लॅटिनम हॉस्पीटल प्रा. लि. या कंपनीशी झालेल्या कराराविरोधात आणि सदर रुग्णालय महानगरपालिकेनेच सुरु करण्यासाठी विविध संस्था संघटनांच्या प्रतिनिधींकडून उल्हासनगर महानगर पालिकेच्या गेट समोर दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी तीन वाजेपासून संघटीतपणे निदर्शने करण्यात आली. निदर्शनाच्या ठीकाणी निदर्शने सुरु असतांना, उल्हासनगर महानगरपालिकेचे मा.आयुक्त अजीज शेख यांनी निदर्शनकर्त्यांना भेटण्यास प्रतिनिधि पाठविले. प्रतिनिधिमार्फत शिष्टमंडळास मा. आयुक्तांच्या भेटीसाठी बोलावण्यात आले. शिष्टमंडळ आणि  मा. आयुक्तांच्या भेटीमध्ये शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले की, सदर रुग्णालय हे सार्वजनिक खाजगी भागीदारीत (P.P.P) सुरू करण्यात येऊ नये व सदर करार रहित करून महानगरपालिकेनेच रुग्णालय आपल्या

विदर्भातल्या प्रवाशांची दिवाळी गोड होणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; ५ नोव्हेंबर रोजी विशेष गाडी

इमेज
विदर्भातल्या प्रवाशांची दिवाळी गोड होणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; ५ नोव्हेंबर रोजी विशेष गाडी नागपूर : दिवाळीच्या सुट्यांमुळे होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पुणे - नागपूर दरम्यान येत्या ५ नोव्हेंबर रोजी अतिरिक्त विशेष गाडी सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. नोकरी तसेच शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात वास्तव्याला असणाऱ्या नागपूर विदर्भातील लोकांची संख्या मोठी आहे. दिवाळीत यातील बहुतांशजण घरी परतत असतात. त्यामुळे दरवर्षीच दिवाळीच्या आधी पुणे - नागपूर व दिवाळीनंतर नागपूर - पुणे या मार्गावर रेल्वे, बस, विमान यात जागा मिळणे कठीण होते. या काळात विमानाचे दर तर प्रचंड वाढलेले असतातच, पण खासगी बसेसचे तिकीटही ५ हजार रुपयांच्या पुढे जाते. यंदा एसटीनेही या मार्गावर स्लिपर सेवा सुरू केली आहे. मात्र, ही बस वातानुकूलित नाही. नागपूर- पुणे प्रवासाचे एका व्यक्तीला १५९५ रुपये पडतात. नागपूर - पुणे- नागपूर दरम्यान दररोज एसटीच्या तीन स्लिपर बस धावतात. मात्र, आजघडीस या गाड्यांचे आरक्षणही फुल्ल झाले आहे. रेल्वेचे आरक्षण तर दोन महिने आधीच संपले. त्यामुळे रेल्वे प्रशासनातर्फे अतिरिक्त ग

जायकवाडी'चे पाणी पेटणार! नाशिक-नगरमधून विसर्गाला विरोध कायम, राजकीय हस्तक्षेप वाढला

इमेज
जायकवाडी'चे पाणी पेटणार! नाशिक-नगरमधून विसर्गाला विरोध कायम, राजकीय हस्तक्षेप वाढला  छत्रपती संभाजीनगर : नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरण समूहातील ८.६ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश आहेत. पण, दोन्ही जिल्ह्यांतून विरोध सुरू झाला आहे. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट झाले असून, राजकीय हस्तक्षेपही वाढला आहे. मराठवाड्यातून राजकीय पक्ष-संघटनांनी पाठपुरावा केला नसल्यामुळे पाणी सोडण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.राजकीय नेत्यांचा विरोधमराठवाड्यात दुष्काळाचे संकट गडद झाले असताना जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मुद्द्यावर पुन्हा प्रादेशिक संघर्ष सुरू झाला आहे. जायकवाडी धरणासाठी पाणी सोडू नये, म्हणून मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे; तर राजकीय नेत्यांनी पाणी सोडण्यास विरोध केला आहे. मेंढेगिरी समितीचे निकष पूर्ण करण्यासाठी गोदावरी, प्रवरा व मुळा धरण समूहातून सोडण्यात येणारे पाणी अत्यंत कमी असल्याने पाण्याची नासाडी होण्याची शक्यता आहे. परिणामी, धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी टंचाई भेडसावणार आहे.नगर, नाशिकमध्ये आंदोलननगर व नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून

महाराष्ट्रात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर, 'या' 8 सवलती मिळणार

इमेज
महाराष्ट्रात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर, 'या' 8 सवलती मिळणार महाराष्ट्र :  सरकारनं 2023 या वर्षासाठी राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. 31 ऑक्टोबर 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर, तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. शासन निर्णयानुसार, “जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दुरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार करून 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये, गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करत आहे.” दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या 40 तालुक्यांमध्ये काही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे : जमीन महसुलात सूट. पीक कर्जाचं पुनर्गठन. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती. कृषी पंपाच्या चालू विजबिलाबात 33.5% सूट. शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुक्लात माफी. रोजगार हमी योजने अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता. पिण

पुणे-दौंड मार्गाला उपनगरीय दर्जा द्या, डेमू-मेमू ऐवजी EMU लोकल सुरु करा, रेल्वे प्रवाशांची मागणी

इमेज
पुणे-दौंड मार्गाला उपनगरीय दर्जा द्या, डेमू-मेमू ऐवजी EMU लोकल सुरु करा, रेल्वे प्रवाशांची मागणी पुणे: पुणे ते दौंड मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रश्नाकडे रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुणे दौंड मार्गाचा उपनगरीय रेल्वे मार्गात समावेश करावा, अशी मागणी रेल्वे बोर्ड व राज्य शासनाला पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी ग्रुपकडून करण्यात आली आहे.पुणे दौंड मार्गावर इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (ईएमयू) दोन रेक दिले जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. पण, अद्याप तरी या मार्गावर हे दोन रेक मिळालेले नाहीत. पुणे दौंड मार्गावर सध्या डेमू चालविली जाते. पण, तिला सतत बाजूला उभे केल्यामुळे गाडीला उशीर होता. त्यामुळे या मार्गाला उपनगरीय रेल्वे मार्गाचा दर्जा देण्याची मागणी पुणे जिल्हा ग्रामीण रेल्वे प्रवासी संघाकडून करण्यात आली आहे. प्रवाशांच्या मागण्या आणि समस्या- पुणे दौंड मार्गावर डेमू-मेमू ऐवजी ईएमयू लोकल सेवा सुरू करा- ईएमयूचा रेक हा डब्यांच्या असल्यामुळे त्यात महिला, सामान, दिव्यांग, फर्स्ट क्

केंद्र सरकारचं दिवाळी गिफ्ट, ठाणे-कोल्हापूरसह १५ शहरांत PM ई-बस सेवा

इमेज
केंद्र सरकारचं दिवाळी गिफ्ट, ठाणे-कोल्हापूरसह १५ शहरांत PM ई-बस सेवा, कोल्हापूर : राज्यातील महापालिका क्षेत्रातील जनतेचा प्रवास नवीन वर्षापासून अतिशय सुखकर होणार आहे. यासाठी केंद्राने पीएम इ बस सेवा प्रकल्पा अंतर्गत तब्बल तेराशे वातानुकूलित बसेस मंजूर केल्या आहेत. दोन महिन्यात या बसेस महापालिका परिवहन समितीच्या ताफ्यात दाखल होतील. यामध्ये नागपूर, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यासह पंधरा शहरांचा समावेश आहे. यासाठी केंद्राकडून तब्बल पाचशे कोटीपेक्षा अधिक निधी खर्च करणार आहे. राज्यात बहुतांशी महापालिका क्षेत्रात सुरू असलेली परिवहन सेवा ही तोट्यात आहे. काही ठिकाणी बसेसची संख्या प्रचंड कमी आहे. ज्या आहेत, त्यांची स्थिती खराब आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेचा प्रवास सुखकर आणि गतीमान व्हावा, पर्यावरणाचे प्रदूषण कमी व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या विशेष समितीच्या वतीने पीएम इ बस सेवा प्रकल्प ही योजना राबविली. त्याअंतर्गत देशभरातील शहरात इ बस देण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते.देशभरातून आलेल्या प्रस्तावाबाबत केंद्र, राज्य व महापालिका अ

भारतीय संविधान - आरक्षण आणि सद्यपरिस्थितीत वास्तव* या विषयावर प्रशिक्षण शिबिर

इमेज
भारतीय संविधान - आरक्षण आणि सद्यपरिस्थितीत  वास्तव* या विषयावर प्रशिक्षण शिबिर.    उल्हासनगर: दिनांक 5 नोव्हेंबर, 23, रविवार रोजी, मानवता अभियान सामाजिक संस्थे मध्ये *भारतीय संविधान - आरक्षण आणि सद्यपरिस्थितीत  वास्तव* या विषयावर प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रा. विकास जाधव यांनी या वेळी सदर विषयावर मार्गदर्शन केले तसेच संविधानातील मुलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि प्रतिनिधित्व व प्रक्रिया तसेच संविधान सभेतील चर्चा या विषयावर भाष्य केले. या शिबिरात 20 जन सहभागी झाले होते. तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या वेळी सामाजिक कार्यकर्ते शशीकांत दायमा, प्रशांत पवार,  दिव्यांग संस्थेचे प्रतिनिधी प्रमोद गायकवाड, तसेच मानवता अभियान सामाजिक  संस्थेच्या अध्यक्ष निवेदिता जाधव, खजिनदार प्रफुल्लता मोहोड तसेच एस एन डी टी व मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी उपस्थित होते. आजच्या सामाजिक आणि राजकीय सद्या परिस्थिती मध्ये अशा  शिबिरांची कॅडर कॅम्प ची गरज आहे असे विचार शशिकांत दायमा यांनी व्यक्त केली. सदर शिबिरातील सहभागी यांनी असे शिबिर नेहमी व्हावेत अशी आशा व्यक्त केली.