मुंबई किनारी नौदलाची स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली; १३ मृत्यू, ९९ जणांना वाचविण्यात यश
मुंबई किनारी नौदलाची स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली; १३ मृत्यू, ९९ जणांना वाचविण्यात यश मुंबई: गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला निघालेल्या नीलकमल या प्रवासी फेरीबोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने बुधवारी दुपारी जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत प्रवासी बोट समुद्रात बुडून १३ जणांचा मृत्यू, तर ९९ प्रवाशांना वाचविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली. नौदलाच्या प्रवक्त्यानेही दुर्घटनेची माहिती दिली. इंजिनाची चाचणी करीत असताना अरबी समुद्रात उरण करंजाजवळ दुपारी ४ च्या सुमारास नौदलाच्या बोटीचे नियंत्रण सुटले आणि ती करंजा येथे नीलकमल या प्रवासी फेरी बोटीला धडकली. या दुर्घटनेत १ नौदल कर्मचारी, नौदलाचे दोन अधिकारी यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला, तर ९९ जणांना वाचवण्यात यश आले, असे नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले. बोटीत शंभराहून अधिक प्रवासी आणि कर्मचारी होते. हा अपघात एवढा भीषण होता की त्यात प्रवासी बोट समुद्रात बुडाली आणि प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ उडाला. बचावकार्य युद्धपातळीवर अपघाताची माहिती मिळताच नौदलाच्या ११ बोटी, तटरक्षक दलाची एक बोट, सागरी पोलिस...