उल्हासनगर महानगरपालिका स्थायी समितीची निवडणूक शिवसेनेचे विजय पाटील एका मताने विजय

स्थायीसमीती निवडणूक, 
   भाजपा विरुध्द भाजप रंगतदार सामन्यात शिवसेनेचा विजय !!!
   - उल्हासनगर महापालिका स्थायीसमीती सभापती पदाच्या आज पार पडलेल्या निवडणूकीत भाजपा विरुध्द भाजप असा रंगतदार सामान्यात शिवसेना महाआघडी पुरस्कृत भाजपचे उमेद्ववार विजय पाटील हे एका मताने विजयी झाले. या निवडणूकीत सेनेने भाजपाला धक्का देत.हा विजय मिळवल्याची चर्चा शहरात होत आहे.
    उल्हासनगर महापालिका स्थायीसमीती सभापती पदाची निवडणूक आज पार पडली. गत सोमवारी या पदासाठी उमेद्ववारी आर्ज दाखल करण्यात आले होते.शहरात शिवसेना महाविकास आघाडीची सत्ता आहे. मात्र विरोधी पक्ष भाजपा कडे संख्या बळ जास्त असल्याने स्थायीसमीती सभापती पदी भाजपाचा उमेद्ववार निवडूण येणार असे वाटत असतांनाच मंगळवारी मोठी राजकीय घडामोड झाली.भाजपाचे डाँ. प्रकाश नाआथाणी यांनी आपल्या स्थायीसमीती सदस्य पदाचा राजिनामा दिला. त्यामुळे भाजपाची संख्या ८ झाली.भाजप नगरसेवक विजय पाटील यांनी सेनेच्या अनुमतीने उमेद्ववारी आर्ज भरल्याने भाजपाची संख्या ७ झाली.
   ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणूकीत भाजपाच्या जया माखिजा यांना ७ तर शिवसेना पुरुस्कृत भाजपा नगरसेवक विजय पाटील यांना ८ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी नार्वेकर यांनी पाटील यांना विजयी घोषित केलं आहे. आखेर शिवसेनेन भाजपाला धक्का देत स्थायीसमीती आपल्याकडं खेचून आणली असल्याची चर्चा शिवसैनिकां मध्ये रंगली आहे.
 जनहित न्यूज महाराष्ट्र
 एडिटर हरी आल्हाट
 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप