राज्यात कडक निर्बंध लागू मागील काही दिवसांत करोनानं अक्षरक्षः थैमान घातल्यानं राज्य सरकारची झोप उडाली आहे. प्रचंड वेगानं होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर ताण येण्यास सुरूवात झाली असून, रुग्णांचे हाल टाळण्यासाठी आणि विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाउन संदर्भात चाचपणी सुरू होती. सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज लॉकडाउन/ कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.काय आहेत नेमके कडक निर्बंध;शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ पर्यंत लॉकडाऊनलोकल ट्रेन सुरू राहणारजिम बंद होणारअत्यावश्यक सेवांना परवनगीरेस्टॉरंट, मॉल टेक अवे सर्व्हिस सुरु राहणारअत्यावश्यक सेवेतील लोकांनाच गाडी चालण्याची परवानगीरात्री केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतीलधार्मिक स्थळांवर निर्बंध असतीलसिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णत: बंदगार्डन, मैदाने बंदजिथे केसेस वाढतायेत तेथील निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनालासिनेमा, मालिकांचे शुटींग मोठ्या संख्येनं करता येणार नाहीरिक्षा- ड्रायव्हर + २ लोकबसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईलटॅक्सीत मास्क घालावाकार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या सूचनामंत्रालय, महत्वाचे ठिकाणी व्हिजिटर्स बंदीचित्रपट शूटिंगला परवानगी आहे, पण गर्दी करू नये, लढाई, आंदोलन असे सीन असतील त्या शूटिंगला बंदीबाजारपेठांमध्ये मर्यादित संख्येनं सोडलं जाईलशाळा कॉलेज बंद, इंडस्ट्री चालू राहतीलप्रतिबंधित क्षेत्र तयार करासोसायटीच्या बाहेर बोर्ड लावायचा अन्यथा दंड आकारणार २० लोकांना अंत्यविधींसाठी परवानगीलग्नसमारंभांबाबत लोकांची संख्या मर्यादितविमान प्रवासाबाबत कोणतेही बदल नाहीत मात्र, टेस्टिंग कडक करणार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

उल्हासनगर महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या तक्रारीनंतर कामगार नेत्यावर गुन्हा दाखल