उल्हासनगर महानगर पालिका कचरा डंपिंग वर स्थानिक नागरिकांनी अडवील्या कचऱ्याच्या गाड्या उल्हासनगर महानगर पालिकेच्या कॅम्प नंबर 5 मधील कचरा डंपिंग ग्राउंडवर उल्हासनगर मधील कचरा टाकण्यात येतो सध्या पाऊस सुरू असताना पाण्याच्या प्रवाहात कचरा वाहून नागरिकांच्या घरात जात आहे यामुळे स्थानिक नागरिक यांना त्रास सहन करावा लागत आहे असे स्थानिक नागरिक माहिती देत आहे आज दिनांक 12 जून 2021 रोजी सकाळ पासून स्थानिक नागरिकांनी कचरा डंपिंग वर येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या अडवून आंदोलन केले . उल्हासनगर ची लोकसंख्या पाहता उल्हासनगर महानगरपालिका कचरा डंपिंग करण्याकरिता पर्याप्त जागेची आवश्यकता आहे उल्हासनगर शहरात दोनच ठिकाणी डम्पिंग ग्राउंड असून या दोन्ही ही ठिकाणी डम्पिंग ग्राउंड च्या परिसरात लोकवस्ती आहे प्रत्येक पावसाळ्यात डम्पिंग ग्राउंड च्या आसपास रहात असलेल्या नागरिकांना कचऱ्यामुळे त्रास सहन करावा लागतो तर दुसरीकडे उल्हासनगर शहराची लोकसंख्या पाहता व नागरिकांच्या तक्रारी पाहता उल्हासनगर महानगरपालिकेला शहरातील कचरा उचलणे ही गरजेचे आहे . शहरातील कचरा उचलला नाही तर उल्हासनगर शहरात घाणीचे साम्राज्य पसरते . आणि पावसाळ्यापूर्वी डम्पिंग वर कचऱ्याचे प्रमाण वाढले तर कचरा डंपिंग वरील घाणीमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची संभावना असते अशा परिस्थितीमध्ये उल्हासनगर महानगरपालिका च्या सत्तेवर असलेल्या सत्ताधारी व उल्हासनगर महानगरपालिका चे अधिकारी यांनी लवकरच हा प्रश्न सोडविण्यासाठी उपाय योजना करावी अन्यथा उल्हासनगर शहरात घाणीचे साम्राज्य पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप