भारतीय बौद्ध महासभा ,चिंचपाडा शाखेची एक दिवसीय पर्यटन धम्म सहल संपन्न

भारतीय बौद्ध महासभा ,चिंचपाडा शाखेची एक दिवसीय पर्यटन धम्म सहल संपन्न
प्रतिनिधी आशा रणखांबे 
कल्याण / ठाणे 
 बौद्ध स्थळांना भेटी देऊन त्यांचा इतिहास आणि महत्त्व  बौद्ध  उपासक  - उपासिका अनुयायी  यांना व्हावे. बौद्ध धम्माचे ज्ञान मिळावे  या करता एक दिवसीय पर्यटन धम्म सहलीचे आयोजन करण्याचा उपक्रम  दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा, कल्याण तालुका अंतर्गत   100 फूट रोड, चिंचपाडा शाखा  यांनी आयोजित केला  होता. नालासोपारा येथील सम्राट अशोक   यांच्या कालखंडातील असलेले बौद्ध स्तूप  आणि जागतिक विपशना केंद्र गोल्डन पॅगोडा, गोराई  येथे
 एक दिवसीय पर्यटन धम्म सहल मोठ्या  उत्साहात संपन्न झाली . 
        बौद्ध स्थळांना भेटी देऊन त्यांचा इतिहास आणि महत्त्व  बौद्ध  उपासक  - उपासिका अनुयायी  यांना व्हावे. बौद्ध धम्माचे ज्ञान मिळावे  या करताना एक दिवसीय पर्यटन धम्म सहलीचे आयोजन करण्याचा  स्तुत्य उपक्रम   हाती घेतला त्याबद्दल  जीवनसंघर्षकार फेम, साहित्यिक नवनाथ रणखांबे यांनी  अध्यक्ष रमेश पी. सोनावणे आणि शाखेच्या सर्व पदाधिकारी यांचे कौतुक करून अभिनंदन केले. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  
          ही धम्म सहल यशस्वी करण्यासाठी  अध्यक्ष  रमेश पी. सोनावणे,  सरचिटणीस सुमेध ओव्हाळ, कोषाध्यक्ष मिलींद गांगुर्डे , पर्यटन प्रमुख गणेश चाबुकस्वार , संस्कार प्रमुख भीमराव आढाव , महिला प्रमूख  संगीता रामटेके , संघटीका आशा सोनावणे व सुनीता पाटोळे आणि समस्त पदाधिकारी यांनी  मेहनत घेतली . सहलीचे आयोजन आणि नियोजन  शिस्तप्रिय  उत्कृष्ट केले होते . जाण्या येण्याचा प्रवास खर्च , सकाळी चहा-  नाष्टा तसेच दुपारी सुग्रास भोजन व सायंकाळी चहा व बिस्कीट  हे सर्व पर्यटन फक्तं 500 रूपया मध्ये खूप नियोजपूर्वक केले होते.
अशी माहिती कवी नवनाथ रणखांबे यांनी दिली
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप