वांद्रे स्टेशनवरील लिफ्टमध्ये अडकलेल्या २० जणांची, रेल्वे पोलिस कॉन्स्टेबल शाहीन अल्ताफ पठाण यांनी अर्ध्या तासानंतर सुखरूप सुटका केली

वांद्रे स्टेशनवरील लिफ्टमध्ये अडकलेल्या २० जणांची, रेल्वे पोलिस कॉन्स्टेबल शाहीन अल्ताफ पठाण यांनी अर्ध्या तासानंतर सुखरूप सुटका केली
मुंबई लोकलच्या अनेक रेल्वे स्टेशनवर हल्ली लिफ्टची सुविधा दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचा त्रास कमी व्हावा म्हणून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.    
परंतु त्याच लिफ्ट ने बुधवारी सकाळी २० जणांना काही काळासाठी घाम फोडला. सुमारे २० प्रवासी वांद्रे रेल्वे स्टेशनवरील एका लिफ्टमध्ये अंदाजे अर्धा तास अडकून पडले होते.

पोलिस कॉन्स्टेबल शाहीन पठाण या वांद्रे रेल्वे पोलिस स्टेशनच्या महिला कर्मचारी यांनी योग्य वेळी कर्तव्यतत्परता दाखवून व मदत मिळवून दिली आणि त्यांना सुखरूप बाहेर काढले 
पश्चिम रेल्वेने दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे स्थानकातील विविध फलाटावर जाण्यासाठी सरकते जिने आणि लिफ्टची सोय केली आहे. मात्र हीच लिफ्ट प्रवाशासाठी धोकादायक देखील ठरू शकते याची प्रचिती वांद्रे रेल्वे स्थानकात प्रवाशांना आली. मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म १ आणि पादचारी पूल यांना जोडणाऱ्या लिफ्ट मध्ये २० प्रवासी अडकले. मात्र पोलिस कॉन्स्टेबल शाहीन अल्ताफ पठाण यांनी या सर्व प्रवाशांना प्रसंगावधान राखत सुखरूप बाहेर आणले.
पोलिस कॉन्स्टेबल शाहीन अल्ताफ पठाण यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे
ब्यूरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र मुम्बई
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप