एमआईडीसी तर्फे आपटी बंधारा वर उपाययोजना सुरु.. आपटी, बारे, चोण, मांजर्ली, दहागाव, वाहोली, कुंभारपाडा, बांधणेपाडा ग्रामस्थाना थोड़ाफार दिलासा.

 एमआईडीसी तर्फे आपटी बंधारा वर उपाययोजना सुरु..

आपटी, बारे, चोण, मांजर्ली, दहागाव, वाहोली, कुंभारपाडा, बांधणेपाडा ग्रामस्थाना थोड़ाफार दिलासा..

कल्याण तालुक्यातील उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या आपटी या शेतीप्रधान गावातील ग्रामस्थ व तरुणांना रस्त्याच्या अभावामुळे अत्यंत जीवघेणा व अंगावर शहारे आणणारा प्रवास करावा लागत होता,
उल्हास नदीच्या काठावर आपटी हे गाव वसलेले आहे. पुर्वीच्या काळात शेती हाच येथील लोकांचा मुख्य व्यवसाय होता. परंतु अंबरनाथ, बदलापूर येथे एमआयडीसी झाल्याने आजूबाजूच्या आपटी, बारे, चोण, मांजर्ली, दहागाव, वाहोली, कुंभारपाडा, बांधणेपाडा आदी गावातील तरुण येथे कामधंद्यानिमित्ताने उल्हास नदीतून जात येत होते, येथे उल्हास व बारवी नदीचा संगम होत असल्याने जांभूळ एमआयडीसी ने येथे पाणसाठवण बंधारा बांधला होता. 
वाढणारी लोकसंख्या आणि नव्याने वसलेली शहरे यांना पाणी पुरवठा कमी पडू लागल्याने एमआयडीसी ने या आपटी बंधाऱ्याच्या उंची वाढविली, तसेच बंधाऱ्याच्या खाली आपटी जांभूळ वसद, आदी गावातील लोकांना येण्याजाण्यासाठी एक ते दिड मिटर रुंंदीची साधारण ५०० मीटर लांबीची पायवाट बनवून दिली होती. येथूनच गावकऱ्यांची ये जा सुरू होती. परंतु मागील एक दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुरामुळे या पायवाटेचा काही भाग वाहून गेला आहे. त्यामुळे या लोकांचा रस्ता बंद झाला होता. आपटी गावातील ५०/६० तरुण या मार्गाने एमआयडीसी येथे पोटाची खळगी भरण्यासाठी ये जा करीत होते त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली. दुसरीकडून जायचं असेल तर २०/२५ किमी अंतर जावं लागत असे. यामुळे पैसा व वेळ दोन्ही खर्ची पडत होते. कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे अगोदरच अनेकांचे रोजगार गेले होते. ज्यांचे होते ते रस्त्याच्या अडचणी मुळे जाणार होते. त्यामुळे ते जाऊ नये म्हणून हे तरुण, महिला, मुले आणि वयोवृद्ध व्यक्ति अंत्यत जीवघेणा बाईक व पायी प्रवास करतात, थोडाजरी तोल गेला तर सरळ उल्हास नदीच्या प्रवाहात वाहून जाण्याची भिती असते.
परंतु ग्रामस्थाच्या मागणी मुळे आता एमआईडीसी तर्फे आपटी बंधारा वर उपाययोजना सुरु करण्यात आली आहे, असे स्थानिक उल्हास नदी प्रेमी श्री श्याम शिसवे यानी सांगितले.अशी माहिती शशिकांत दायमा यांनी दिली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप