उल्हासनगर मध्ये लोक कल्याणासाठी सह्यांची मोहीम

उल्हासनगर मध्ये लोक कल्याणासाठी सह्यांची मोहीम,
पुर्व आमदार पप्पु कालानी व उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयचे मुख्य शल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांचे समर्थन
उल्हासनगर: मिशन जय भारत अंतर्गत 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिना पासून सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत लोक कल्याणासाठी सह्यांची मोहीम मध्यवर्ती रुग्णालय गेटच्या बाहेर गेल्या 4 दिवसांपासुन राबवण्यात येत आहे.
उल्हासनगर 3 येथील सेंट्रल हॉस्पिटल सुधारलाच पाहिजे, मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, कुपोषित बालकांसाठी विशेष केंद्र झालं पाहिजे, अपंगांसाठी विशेष केंद्र झालंच पाहिजे, मनोरुग्णांसाठी विशेष केंद्र झालंच पाहिजे, नर्सिंग कॉलेज झालं पाहिजे, या सगळ्या मागण्या घेऊन आज सह्यांच्या मोहीमचा चौथा दिवस आहे.
बौध्द विहार संघटना समन्वय समिती व इंडियन सोशल मुव्हमेंट च्या माध्यमातून सुरू असलेल्या आरोग्यव्यवस्था सुधारणांच्या आंदोलनाच्या ठिकाणी आज चौथ्या दिवशी पुर्व आमदार पप्पु कालानी यांनी भेट दिली.
त्या प्रसंगी मध्यवर्ती रुग्णालय चे मुख्य शल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे उपस्थित राहून हस्ताक्षर अभियानात भाग घेतला व समर्थन दिले,
तसेच पप्पु कालानी यांचेशी कार्यालयात हस्ताक्षर अभियान प्रणेते आनंद दादा ओव्हाळ यांचे समवेत सविस्तर चर्चा करुन कामाची माहिती दिली,
सदरप्रसंगी बौद्धविहार संघटना समन्वय समिती चे कार्यकर्ते नवीन गायकवाड़, मिरा सपकाळे, विनायक आठवले, रोहिणी जाधव व विजय हळदे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप