जुन्या पेन्शनचा मुद्दा तापणार

 जुन्या पेन्शनचा मुद्दा तापणार 
राज्यभरात होणार्या या आंदोलनाची दखल घेतली नाही तर 14 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा सरकारी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, सरकारी विभागातील कंत्राटीकरण थांबवावे, सरकारी कार्यालयांतील रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात आदी 18 प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी व शिक्षकांनी मार्च महिन्यात आठ दिवस बेमुदत संप केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पेन्शनप्रमाणे आर्थिक लाभ व सामाजिक सुरक्षितता दिली जाईल असे लिखित आश्वासन कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना दिले होते. सहा महिने उलटून गेले तरी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नसल्याने राज्यभरातील सरकारी कर्मचाऱयांत सत्ताधाऱयांविरोधात असंतोष खदखदत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी संघटनांची आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीत कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी 8 नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आहे.

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयांवर 8 नोव्हेंबरला 'माझे कुटुंब माझी पेन्शन' अशी घोषणा देत सहकुटुंब धडक मोर्चे नेऊन राज्य सरकारला भावी संघर्षाच्या पुनरावृत्तीचा इशारा देण्यात येणार आहे. या मोर्चाकडे दुर्लक्ष केल्यास अंतिम निर्वाणीचा संघर्ष म्हणून 14 डिसेंबरपासून राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी-शिक्षक नाइलाजाने बेमुदत संपावर जातील. हा तीव्र संघर्ष थोपविणे हे सर्वस्वी सरकारच्या हाती असल्याचे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे निमंत्रक विश्वास काटकर म्हणाले.

निवृत्तीचे वय 60 वर्षे करा
सरकारी क्षेत्रातील खासगीकरणाचे धोरण रद्द करा
कंत्राटीकरण बंद करून कायमस्वरूपी रिक्त पदे भरा
कंत्राटी कर्मचार्यांच्या सेवा नियमित करा
अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या विनाअट करा
चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरतीवरील बंदी उठवा
नवीन शैक्षणिक दत्तक योजना धोरण रद्द करा

निवृत्त सनदी अधिकारी सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली जुनी पेन्शन अभ्यास समिती स्थापना केली. या समितीला तीन महिन्यांची विहित मुदत दिली; परंतु आता 6 महिने उलटूनसुद्धा समितीचा अहवाल गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे.........

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप