घोडेगाव ग्रामपंचायती मध्येच दत्तात्रय पोखरकर यांचे आकस्मित रित्या निधन

घोडेगाव ग्रामपंचायती मध्येच दत्तात्रय पोखरकर यांचे आकस्मित रित्या निधन

पुणे: दिनांक 23 घोडेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील करुजूदेवी डेव्हलपर्स सर्वे नंबर १९८/२
इमारत नोंद रद्द करणेबाबत बजावलेल्या नोटिस संदर्भात सरपंच , उपसरपंच व ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या दत्तात्रय किसन पोखरकर यांचा ग्रामपंचायत मध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना काल घडली या संबंधी घोडेगाव पोलीस स्टेशन येथे गणेश दत्तात्रय पोखरकर यांनी माहिती दिली, मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत घोडेगाव ने दत्तात्रय पोखरकर यांच्या करुजूदेवी डेव्हलपर्स सर्वे नंबर १९८/२ येथील इमारत नोंद रद्द करण्याबाबत नोटीस बजावली होती. या नोटीस संदर्भात दत्तात्रय पोखरकर त्यांच्या पत्नी व अवधूत घोलप ग्रामपंचायत मध्ये गेले होते . यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्याशी चर्चा सुरू असताना दत्तात्रय पोखरकर यांना अचानक त्रास झाला व ते खाली पडले. त्यांना त्वरित ग्रामपंचायतमध्ये आलेले अवधूत घोलप व इतर लोकांच्या सहाय्याने त्यांना घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत झाल्याचे जाहीर केले. याबाबत पुढील तपास घोडेगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

प्रतिनिधी - आकाश भालेराव
घोडेगाव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप