पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

इमेज

बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी मोठी महत्वाची बातमी समोर येत आहे. खरेतर, RBI ने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतलाय ज्याअंतर्गत पाच महत्त्वाच्या बँकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

इमेज
RBI चा बँक ऑफ महाराष्ट्राला मोठा दणका, BOM वर मोठी कारवाई, आकारलेला दंड ग्राहकांकडून वसूल केला जाणार नाही  बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी मोठी महत्वाची बातमी समोर येत आहे. खरेतर, RBI ने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतलाय ज्याअंतर्गत पाच महत्त्वाच्या बँकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.        देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून अर्थातच आरबीआयकडून गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक सहकारी सहकारी आणि खाजगी बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच काही बँकांचे लायसन्स रद्द करण्याचा सुद्धा निर्णय आरबीआय कडून घेण्यात आलाय. आरबीआय देशातील सर्व सहकारी सहकारी आणि खाजगी बँकांवर नजर ठेवून असते. देशातील सर्वच बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते. जर देशातील बँकांनी आरबीआयच्या नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई होते. अशातच आता आरबीआयने देशातील पाच महत्त्वाच्या बँकांवर कारवाई केली असून यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचा सुद्धा समावेश होतो. आरबीआय ने बँक ऑफ महाराष्ट्र सहित पाच महत्त्वाच्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) या स...

पाच वर्षांत ६० नागरी सहकारी बँका नामशेषसर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी रिझर्व्ह बँकेने कडक धोरण अवलंबिले आहे. ठकसेनांवर कारवाईदेखील होत असली, तरी अद्याप धाक आणि वचक मात्र दिसत नाही.

इमेज
पाच वर्षांत ६० नागरी सहकारी बँका नामशेष सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी रिझर्व्ह बँकेने कडक धोरण अवलंबिले आहे. ठकसेनांवर कारवाईदेखील होत असली, तरी अद्याप धाक आणि वचक मात्र दिसत नाही.                         मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने अलीकडेच केलेल्या कारवाईमुळे नागरी सहकारी बँकांचे आर्थिक आरोग्य आणि ढिसाळ कारभाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. दरसाल डझनाहून अधिक बँकांना परवाना गमवावा लागून, मार्च २०२४पर्यंत गेल्या पाच वर्षांत राज्यातील तब्बल ६० नागरी सहकारी बँका नामशेष झाल्या आहेत. ही संख्या पाहता रिझर्व्ह बँकेच्या कारवाईची गती वाढल्याचे दिसत असले तरी उद्दाम बँकचालकांना वठणीवर आणण्यात ती कमी पडली आहे. उलट सामान्य सभासद, ठेवीदारांनाच अधिक झळ सोसावी लागल्याचे चित्र आहे. सहकाराची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रात, २०२४ सालात ४९६ नागरी बँका कार्यरत होत्या. ठेव विमा आणि पत हमी महामंडळाकडे (डीआयसीजीसी) मार्च २०२४ अखेर नोंदणीकृत बँकांची संख्या हे दर्शविते. २०२४ मध्ये तीन ...

प्रयत्न आमचेनशा मुक्त अंबरनाथ करण्याचे__मा , सुभाष साळुंके

इमेज
प्रयत्न आमचे नशा मुक्त अंबरनाथ करण्याचे__मा , सुभाष साळुंके  चरस,गांजा,ड्रग्स इ.नशा केल्याने व दारू व्यसनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याचे तसेच काही जण ऐन तारुण्यात मृत्युमुखीला जवळ केल्याच्या घटना घडताना मन सुन्न होत असे, यावर उपाय म्हणून दारू मुक्त घर व नशा मुक्त अंबरनाथ करण्याचा प्रयत्न संवाद फाऊंडेशन च्या वतीने मा.नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या वाढदिवसानिमित  भव्य नशा मुक्ती शिबिर रविवार,११ मे २०२५* रोजी सकाळी १० ते दु.१ वाजेपर्यंत*  रोटरी क्लब हॉल, वडवली विभाग अंबरनाथ पूर्व येथे आयोजित केले आहे. लाखो व्यक्तींना दारुमुक्ती देणारे *प्रख्यात उपचार तज्ज्ञ मा.डॉ.कृष्णा भावले हे समुपदेशन व आयुर्वेदिक औषध देणार असून IRS मा. समीर वानखेडे व सिने अभिनेत्री मा. क्रांती रेडकर उपस्थित राहणार आहे. सदर आयुर्वेदिक उपचारामुळे लाखो व्यसनाधीन व्यक्तीनी दारू पासून मुक्ती मिळविले आहे, म्हणूनच अंबरनाथमधील व्यसनाधीन व्यक्ती दारू पासून मुक्ती करण्याचा व त्यांचा कुटुंबात सुख समाधानाचा आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न कार्यकुशल नगरसेवक - सुभाष साळुंके यांच्या संकल्पनेतून होत आहे, ...

पुण्यात कुर्ला बस अपघाताची पुनरावृत्ती: अनेक गाड्यांना बस ने चिरडलं सीसीटीव्ही समोर

पुण्यात कुर्ला बस अपघाताची पुनरावृ्त्ती; अनेक गाड्यांना चिरडलं, सीसीटीव्ही समोर पुण्यातील चांदणी चौकात पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला. मुंबईतील कुर्ला अपघातासारखीच ही घटना आहे. दुचाकी आणि अन्य वाहनांना धडक दिल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे. पुण्यातील पीएमपीएमएल बसचा भीषण अपघात झाला. चांदणी चौकातून पुणे शहराच्या दिशेने येत असताना पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे मोठा अपघात घडला. या बसने ५ ते ६ दुचाकी, एक रिक्षा आणि काही अन्य वाहनांना धडक दिली. या अपघातात ४ जण जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेनंतर मुंबईतील कुर्ला अपघाताची पुनरावृत्ती झाल्याचे म्हटले जात आहे. मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील एस. जी. बर्वे मार्गावर सोमवारी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बेस्ट बसने अनेक गाड्यांना धडक दिली होती. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला. तर ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यानंतर आता पुण्यातील चांदणी चौकात पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल झाले आहेत. या बसने ५ ते ६ दुचाकी ए...