पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

इमेज

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र झाला आहे. ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्रायलने इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलने इराणच्या मुख्य अणुऊर्जा प्रकल्पाचा भाग उद्ध्वस्त केला

इमेज
*जेरुसलेम/तेहरान : इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र झाला आहे. ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्रायलने इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलने इराणच्या मुख्य अणुऊर्जा प्रकल्पाचा भाग उद्ध्वस्त केला.*.    यानंतर शनिवारी पहाटे इराण आणि इस्रायलने एकमेकांवर पुन्हा हवाई हल्ले केले. इराणने या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत इस्रायलवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला आहे. आज पहाटे इस्रायलची दोन मोठी शहरे तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले, त्यामुळे रहिवाशांनी आश्रयस्थानांकडे धाव घेतली. लष्कराने सांगितले की, त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा कार्यरत असून इराणी क्षेपणास्त्रांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या तासाभरात इराणमधून इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली, त्यापैकी काहींना रोखण्यात यश आले आहे, असे लष्कराने सांगितले. इराणची राजधानी तेहरानमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त आहे. दोन क्षेपणास्त्रे तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर आदळली. या विमानतळावर लढाऊ विमाने आणि वाहतूक विमानांचा तळ आहे. स्फोटानंतर आगीचा भडका उडाल्याचे इर...

अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर एआय-१७१ विमान कोसळून भीषण अपघात झाला होता. या विमानात एकूण २४२ जण प्रवास करत होते.

इमेज
अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर एआय-१७१ विमान कोसळून भीषण अपघात झाला होता. या विमानात एकूण २४२ जण प्रवास करत होते.  अहमदाबादवरुन लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतले असताना काही मिनिटांतच ते कोसळले.                                     मात्र आता अहमदाबाद विमान अपघातातील मृतांची संख्या २७४ वर पोहोचली आहे. प्रवाशांव्यतिरिक्त स्थानिक लोकांचाही मृतांमध्ये समावेश आहे. अपघातस्थळी ढिगारा काढण्याचे काम अजूनही सुरू आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत २६५ जणांचा मृ्त्यू झाल्याचे सांगण्यात येत होतं. मात्र आता हा आकडा वाढल्याने आणखी धक्का बसला आहे. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळाजवळ गुरुवारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातातील मृतांची संख्या २७४ वर पोहोचली आहे, तर स्थानिकांमध्ये ३३ जण मृत्यूमुखी पडले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार शुक्रवारी विमानाचा ढिगारा बाहेर काढणाऱ्या बचाव पथकांना क्रॅश झालेल्या ७८७-८ ड्रीमलाइनर विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि आणखी २९ मृतदेह सापडले. त्यामुळे...

सीबीआयचे देशभरात १० ठिकाणी छापे, कल्याणमधून एकाला अटक

इमेज
सीबीआयचे देशभरात १० ठिकाणी छापे, कल्याणमधून एकाला अटक मुंबई :केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ऑपरेशन चक्र अंतर्गत सायबर आर्थिक गुन्ह्यांविरोधात देशभर मोहीम चालवली असून त्याअंतर्गत मुंबईसह देशभरात १० ठिकाणी छापे टाकले. त्यात कल्याण येथील कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली.                                सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सीबीआय ऑपरेशन चक्र अंतर्गत कारवाई करत आहे. सीबीआयने याप्रकरणी दिल्ली, हिसार, लखनऊ, मुंबई, पुणे आणि नाशिक येथील एकूण १० ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. तपासादरम्यान कल्याण येथील एका आरोपीस अटक करण्यात आली असल्याची माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली. तो कल्याण येथील रहिवासी आहे. सायबर आर्थिक फसवणुकीत तो सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. त्याची चौकशी करणे आवश्यक असल्यामुळे त्याला याप्रकरणी अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपींना बेकायदा सिमकार्ड व बनावट कागदपत्...

भटके विमुक्तांचा अंबरनाथ नगर परिषदेवर मोर्चा

https://youtu.be/gbaEXJm1o40?si=kA3pkVT3a750KbO3 जनहित न्यूज महाराष्ट्र  9960504729

कोरोनाची साथ पुन्हा एकदा आली आहे, पण हा कोरोनाचा व्हेरिंयट तितका गंभीर नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेय.

इमेज
हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना महामारीने पुन्हा डोकं वर काढलेय. दोन्ही देशातील कोरोना रूग्णाची संख्या झपाट्याटे वाढत आहे, त्यामुळे निर्बंध लावले जाणार आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरनंतर आता मुंबईतही धोक्याची घंटा वाजली आहे. मुंबईमध्ये कोरोना रूग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे समजतेय. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णात झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णसंख्येत आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्याच्या रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत. २०२० ते २०२२ या काळात जगात हाहाकार माजवणाऱ्या आणि लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलेय. कोरोनाची साथ पुन्हा एकदा आली आहे, पण हा कोरोनाचा व्हेरिंयट तितका गंभीर नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेय. कोरोना पुन्हा आला असला तरी घाबरण्याचे कारण नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. कोरोनाची लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता उपाय योजना कराव्यात, असेही सांगितलेय. केंद्रीय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी देशात ९३ कोर...