समर्पण चँरिटेबल ट्रस्टने साजरी केली आदिवासी पाड्यावर आपुलकीची दिवाळी.

*समर्पण चँरिटेबल ट्रस्टने साजरी केली आदिवासी पाड्यावर आपुलकीची दिवाळी.*

सोमवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२० रोजी भाऊबीजचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेल्या माऊली गडाच्या पायथ्याशी असलेल्या तानसा अभयारण्यातील घनदाट जंगलाने वेढलेल्या दुर्गम भागातील दुर्लक्षित,उपेक्षित आदिवासी बहुल वस्तीच्या खोर गावातील नागरिकांना दिवाळी फराळाचे साहित्य,महिलांना साडी तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करून संस्थेच्या वतीने आपुलकीची दिवाळी - २०२० हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी तानसा वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने,खोर - वांद्रे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच वनिता झुगरे,वांद्रे गावचे सुपुत्र ठाणे ग्रामीण पोलीस विभागात कार्यरत असलेले शिंगे मेजर,खोर गावाचे पोलीस पाटील पांडुरंग दुभेले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सदरील कार्यक्रमात वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तानसा वन्यजीव विभागातील वनक्षेत्र पिवळीचे वनपाल व्हि.के.दरेकर वनरक्षक बी.जी.शिंदे,एस.ए.खंडागळे,एस.एच.पेढवी,प्रसाद पाटील,दिपक लटपटे,सुनिल वाटोरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.संस्थेच्या अध्यक्ष शितल कोरडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून आपले मनोगत व्यक्त केले. वनरक्षक एस.ए.खंडागळे यांनी सुत्रसंचालन आणि संस्थेेेचे सचिव मनोज कोरडे यांनी आभार प्रदर्शन केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप