ठाणे जिल्ह्यातील तालुका.मुरबाड...................... येथील अनुदानित आश्रम शाळेची स्वयंपाकिन. या पदावर काम करीत असलेल्या एका आदिवासी विधवा २ लहान मुलांचे आई चा न्याय मिळविण्या साठी लढ्ढा. अनुदानित आश्रम शाळा चे संचालक व मुख्याध्यापक यांनी प्रकल्प अधिकारी यांना ठरविले दोषी. तर प्रकल्प अधिकारी यांनी जबाबदारी न घेता या महिलेचे काही बरे वाईट झाल्यास अनुदानित शाळा चे मुख्याध्यापक राहतील जबाबदार असे दिले मुख्याध्यापक यांना लेखी आदेश ठाणे जिल्ह्यातील .तालुका मुरबाड तळवली या ठिकाणी असलेल्या अनुदानित आश्रम शाळे ची विधवा महिला कर्मचारी श्रीमती. रेखा नंदकुमार निरगुडा हिला दिनांक ७ जानेवारी २०१७ रोजी अनुकंपावर पती च्या जागेवर अनुदानित आश्रम शाळेमध्ये स्वयंपाकिन या पदावर नेमणूक करण्यात आली या नेमणूक पत्रकावर कोणत्याही ठिकाणी कर्मचारी नियुक्ती पत्रावर गट श्रेणी . अ. ब. क. ड. चा उलेख लिखित केला नाही. असे नियुक्ती पत्र देवून तिला कामावर रुजू करण्यात आले. या पूर्वी श्रीमती रेखा नंदकुमार निरगुडा हीचे पती नंदकुमार आलो निरगुडा यांची नियुक्ती दिनांक २३ जून २००८ रोजी शिक्षक या पदावर नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्या ही नियुक्ती पत्रकावर गट. श्रेणी अ. ब. क. ड. असा लिखित उलेख केलेला नाही दिनांक ७ सप्टेंबर २०१६ रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला असून अनुदानित आश्रम शाळा चे संचालक मंडळ आणि मुख्याध्यापक यांनी अनुदानित आश्रम शाळेमध्ये काम करीत असलेले मयत कर्मचारी. नंदकुमार आलो निरगुडा यांचे वारस पत्नी. रेखा नंदकुमार निरगुडा हिला कोणतीही रक्कम देण्यात आली नाही. या साठी तिने सतत अनुदानित आश्रम शाळा चे संचालक आणि मुख्याध्यापक यांच्या कडे पतीच्या निधनानंतर मिळणाऱ्या रक्कम तसेच गेली ३ वर्षापासून तिने काम केलेल्या वेतनाची साठी रीतसर पत्र व्यवहार केले . परंतु नेहमीच तिला उडवा उडवीची उतरे देण्यात येत होती असी माहिती रेखा नंदकुमार निरगुडा यांनी दिली... सतत पतीच्या मिळणाऱ्या रक्कम ची व ती काम करीत असलेल्या ३ वर्षाच्या वेतनाची मागणी करीत असलेल्या रेखा नंदकुमार निरगुडा हिला अनुदानित आश्रम शाळे मधून कामावरून काढण्यात आले. तिने कारण विचारले असता. माहिती देण्यात आली की. नंदकुमार आलो निरगुडा हे ब श्रेणी चे कर्मचारी आहेत आणि या कारणास्तव रेखा नंदकुमार हिला कामावरून कमी करण्यात आले... माहिती मिळताच. रेखा नंदकुमार हिने अपर आयुक्त ठाणे यांच्या कडे चौकशी करून माहिती मिळवली व नंदकुमार हे क. श्रेणीचे कर्मचारी असल्याचे पत्र आणले परंतु पुन्हा तिला दुसरे पत्रक देण्यात आले त्या मध्ये प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर जिल्हा ठाणे यांनी पत्रा द्वारे माहिती दिली . नंदकुमार निरगुडा यांच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर दिलेली नियुक्ती अनुदनैय असा उलेख करण्यात आलेले पत्र देण्यात आले . सध्या एक आदिवासी विधवा असलेली २ मुलांची आई रेखा नंदकुमार निरगुडा हिने .२७ जानेवारी २०२० रोजी माहिती अर्ज दाखल करून मला न्याय मिळाला नाही तर मी अमरण उपोषण करीन असा इशारा दिला परंतु प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर चे सहायक प्रकल्प अधिकारी यांनी. कोणतीही जबाबदारी न घेता . शासकीय आश्रम शाळा चे मुख्याध्यापक यांना लेखी कळविले आहे की. आपण केलेल्या दिरंगाई मुळे श्रीमती निरगुडा यांच्या बाबत काही बरे वाईट झाल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी. असे लेखी पत्र दिले. असतानाही मुख्याध्यापक व संचालक श्रीमती रेखा निरगुडा यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे. तर एकीकडे प्रकल्प अधिकारी आपली जबाबदारी घेण्यास नकार देत आहेत...... आता एका विधवा आदिवासी महिलेने न्याय मिळविण्या. संबंधित अधिकारी तसेच शासनाकडे. मागणी केली आहे.................................................................. ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप