जनहित न्यूज महाराष्ट्रच्या दणक्याने एम.जी. एम. हॉस्पिटलला आली जाग


पनवेल वार्ताहर-मयूर भोसले
श्रीमती सुवर्णा सीताराम सकपाळ हा रुग्ण गेली 14 दिवस एम. जी. एम. हॉस्पिटल मध्ये कोरोना च्या नावाखाली महात्मा फुले जीवन आरोग्य योजने अंतर्गत उपचार घेत आहें. उपचार घेत असताना रुग्णाच्या नातेवाईकांना हॉस्पिटल कडून मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत होता.रुग्णाच्या तब्यती विषयी कोणतीही माहिती रुग्णाच्या नातेवाइकाला दिली जात न्हवती. रोज कोणत्या ना कोणत्या कारणास्तव मेडिकल स्टोअर मधून औषधे आणण्यास भाग पाडत होत.जनहित न्यूज महाराष्ट्रचे उप संपादक मयूर भोसले यांनी एम जी एम प्रशासनाला धारेवर धरून महात्मा फुले जीवन आरोग्य योजने चे वरिष्ठ अधिकारी मा. श्री. सुधाकर शिंदे यांच्या कडे माहिती देताच एम.जी. एम. हॉस्पिटलला जाग आली व रुग्णाच्या नातेवायकांना बोलाऊन घेऊन त्यांना यां योजने अंतर्गत पूर्ण सेवा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन रुग्णाच्या नातेवाईकांना दिले आहें. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार   आहें. मा. श्री. सुधाकर शिंदे हे पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त असताना त्यांनी केलेले कार्य व आपल्या कार्याने पनवेल मधील जनते वर केलेले प्रेम पनवेल मधील जनता कधीही विसरणार नाही. आज पुन्हा एकदा श्री. सुवर्णा सकपाळ या रुग्णाच्या नातेवाईकांना दिलासा देऊन पनवेल वरील त्यांच प्रेम असेच कायम राहील हे सिध्द झालं.
जनहित न्यूज महाराष्ट्रचे उप संपादक मयूर भोसले यांनी जनहित न्यूज तर्फे श्री सुधाकर शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहेत़.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप