उल्हास नदी जलपर्णी मुक्त व नाला मुक्त करणे साठी सुरु आंदोलन चे 18 व्या दिवशी समापन.

उल्हास नदी जलपर्णी मुक्त व नाला मुक्त करणे साठी सुरु आंदोलन चे 18 व्या दिवशी समापन...
ठाणे जिल्हा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांचे आश्वासन...

उल्हास नदी वाचवा, मानव आणि पर्यावरणाचे रक्षण करा. यासाठी मी कल्याणकर सामाजिक संस्था चे नितीन निकम हे सातत्याने गेली कित्येक वर्षापासून पाठपुरावा करत आहेत. परंतु प्रशासन आणि संबंधित प्रदुषण नियंत्रण विभागा कडून वारंवार दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे उल्हास नदी प्रदूषित होऊन जलपर्णी तयार झाली आहे. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे महानगरपालिके कडून कुठली ही प्रकिया न करता मोहना एनआरसी नाला, गाळेगाव नाला व म्हारल नालाचे सांडपाणी सोडणे आहे,
10 फेब्रूवारी 2021 पासुन नितीन निकम यांनी उल्हास नदी वाचवण्यासाठी कैलास शिंदे आणि उमेश बोरगांवकर यांचे सहभाग घेऊन धरणे आंदोलन सुरु केले होते,
उल्हास नदी जलपर्णी मुक्त व नाला मुक्त करणे साठी सुरु असलेले आंदोलन चे 18 व्या दिवशी समापन झाले, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज प्रत्यक्ष आंदोलन स्थळी जाऊन भेट दिली, सोबत खासदार डॉ श्रीकांत शिंदे, कडोंमपा आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी, उल्हासनगर मनपा आयुक्त डॉ राजा दयानिधि याना तातडीने  संबंधित विभागाला सूचना देऊन मोहना बंधारा नवीनीकरण, नदी चे खोलिकरण, जलपर्णी काढणे साठी मशीन व्यवस्था, म्हारल नाल्या वर कामा ला प्रत्यक्ष सुरुवात करुन देणार असल्याचे नितीन निकम यांना आश्वासन दिले,
आज सर्व प्रशासकीय अधिकारी, पाटबंधारे, एमपीसीबी, एमआईडीसी, तहसीलदार कार्यालयातिल अधिकारी हे पालकमंत्री यांचे सोबत पाहणी दौरा मध्ये सहभागी होते. अशी माहिती आंदोलनकर्ते यांनी दिली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप