रिक्षा-आणि कार चा भीषण अपघात रिक्षातील तिघांचा होरपळून मृत्यू कर्जत कल्याण राज्यमार्गावर कारने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षातील सीएनजी सिलेंडरचा स्फोट होऊन तिघांचा मृत्यू झाला. तर कारमधील तिघेजण किरकोळ जखमी झाले असून, नेरळ पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेल्या कारचालकाला ताब्यात घेतले आहे. 29 मार्च रोजी सकाळी ही दुर्घटना घडली. बदलापूर येथील कुळगाव भागात राहणारे सुभाष जाधव हे रिक्षा (एमएच 05-सीजी 4351) घेऊन पत्नी शुभांगी यांच्यासह सकाळी कर्जतमधील नेरळ पाडा येथे आले. तेथे राहणार्‍या सरिता मोहन साळुंखे यांना सोबत घेऊन ते कर्जतला गेले. सरिता साळुंखे या रिक्षाचालक जाधव यांच्या मेहुणी असून त्या नेरळ येथील अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. कर्जत येथील कामे उरकून जाधव हे रिक्षा घेऊन कर्जत-कल्याण राज्यमार्गाने नेरळकडे येत होते.गारपोली गावाचा जोडरस्ता ओलांडून रिक्षा सिद्धिविनायक हॉस्पिटलसमोर येत असताना कल्याण येथून कर्जत रस्त्याने जात असलेल्या हुंडाई एक्सेंट कारने रिक्षाला समोरून धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की रिक्षाचालक यांच्या सीट खाली असलेला सीएनजी सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यांच्यापैकी एकही व्यक्ती बाहेर पडू शकली नाही. रिक्षाचालक सुभाष जाधव, शुभांगी जाधव (दोघे रा.बदलापूर) यांच्यासह सरिता साळुंखे यांचा होरपळून मृत्यू झाला दोन्ही वाहने जळून खाक झाली होती. रिक्षामधील कागदपत्रांवरुन अपघातात जळालेल्या व्यक्तींची ओळख पटली. तर कारमधील तिघे या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत.कारचालकास नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रतिनिधी दिलीप वाघ कर्जत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप