उल्हासनगर मध्ये 15 लाख 64 हजार रुपयाच्या गुटख्या सह तीन आरोपी अटकेत

 विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गुरु संगत दरबार उल्हासनगर कॅम्प नंबर 4 या ठिकाणी पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक  करीत अमली पदार्थांचा काळाबाजार सर्रास पणे सुरू होता अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली असता माहितीच्या आधारे पहाटे 4 वाजेच्या सुमारास सहआयुक्त समाधान पवार. सहाय्यक आयुक्त रमेश जाधव. दक्षता व गुप्तवार्ता अन्नसुरक्षा अधिकारी अरुणा वीरकायदे. यांच्या पथकाने पोलीस पथकासह सापळा रचून पहाटे 4 च्या दरम्यान धाड टाकली असता गुटख्याने भरलेला एक ट्रक. एक कार टेम्पो आणि तीन चाकी रिक्षा पकडली व कुख्यात गुटखा माफिया दिलीप वलेच्या आणि निलेश डिंगरा यांच्यासह गाडी चालक दत्तात्रेय एकशिंगे. जयेश हरेशलाल गुलाबानी. आणि सोमनाथ फुलमाळी यांना अटक करण्यात आली यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. गुटखा व अमली पदार्थ ट्रक मधून आणून तो रिक्षा टेम्पो अशा छोट्या वाहनांमधून  शहरात  विक्री केला जात होता  गाड्या मधून 15 लाख 64 हजार रुपये किमतीचा गुटखा अन्न औषध प्रशासन पथकाने हस्तगत करून विठ्ठलवाडी पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप