ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर स्थित एकमात्र सिद्धान्त समाज विकास संस्थेची कोविड योद्धा प्रशिक्षणा साठी निवड... प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यानी देशभरातील प्रशिक्षण केंद्रांचे लाईव्ह उद्‌घाटन केले...उल्हासनगर - देशात येणाऱ्या संभाव्य कोरोना लाटेला टक्कर देण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरात एक लाखाहून अधिक कोरोना योध्दा प्रशिक्षित करण्यात येत आहेत, या साठी संपुर्ण देशभरातील २६ राज्यात एकूण १११ प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या पैकी महाराष्ट्रात ८ सेंटरची निवड करण्यात आली आहे या पैकी ठाणे जिल्हातील एकमात्र उल्हासनगर स्थित सिद्धांत समाज विकास संस्थेची या प्रशिक्षण केंद्रासाठी निवड करण्यात आली असल्याने या निवडीमुळे उल्हासनगर महापालिकेच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा खोवला गेला आहे,गेली ३० वर्षाहून अधिक काळ सुशिक्षित व बेरोजगार युवक युवतींना राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कोर्सेसचे प्रशिक्षण देउन आपल्या सामाजिक कार्याची छाप राज्य शासन दरबारी उठविणाऱ्या सिद्धांत समाज विकास संस्थेत आज पर्यंत अनेक युवतींना नर्सेसचा कोर्स देउन त्यांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनविले आहे, संस्थेच्या या अनुभवाची दखल घेत राज्य शासनाच्या शिफारसी नुसार या संस्थेची पैरामेडिकल क्रैश कोर्स साठी निवड करण्यात आली आहे .देशभरात सुरु होणाऱ्या १११ पैरामेडीकल कोर्स सेंटरचे औपचारीक उद्‌घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले हा उद्घाटन सोहळा दुरदर्शवर लाईव्ह टेलीकास्ट झाला असून उल्हासनगरच्या सिद्धांत समाज विकास संस्थेचाही सहभाग होता, या सहभागात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यक्तीशः या संस्थेची कार्यप्रणाली जाणून घेण्यासाठी संस्था सदस्यां बरोबर संवाद साधला,या प्रशिक्षण संस्थेत कोवीड महामारीत नागरीकांचे जीव वाचविण्यासाठी सहा प्रकारचे कोर्स डिझाईन करण्यात आले आहेत, या मध्ये होम केअर सपोर्ट, बेसिक केअर सपोर्ट, एडवांस केअर सपोर्ट, इमरजेंसी केअर सपोर्ट, सँपल केअर सपोर्ट या बरोबरच इक्वीपमेंट सपोर्ट चे पण प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती सिद्धांत समाज विकास संस्थेचे संस्थापक संचालक सत्यवान माणिक जगताप यांनी दिली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप