आपत्कालीन परिस्थितीत कर्तव्य बजावत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा गुणगौरव



मागील आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात तोक्ते चक्रीवादळाने थैमान घातले होते
 यावेळी उल्हासनगर शहरात अनेक ठिकाणी विजेचे खांब तसेच रस्त्यावरील मोठी झाडे पडली होती
 अनेक रस्त्यावर पाणी साचले व पाणी ओसरल्यानंतर वाहत आलेल्या कचऱ्याचे ढिगारे पडले होते 
अशा परिस्थितीमध्ये उल्हासनगर शहरातील महावितरण विभाग. उल्हासनगर महानगरपालिका अग्निशमन विभाग. 
तसेच उल्हासनगर महानगरपालिका सफाई कामगार यांनी तोक्ते चक्रीवादळाच्या संकटात सुद्धा नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेऊन आपले कर्तव्य बजावले
 अशा अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार मा राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 
लालगड शाखा व समृद्धी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. 
उल्हासनगर महानगरपालिका अग्निशामक दलाचे बाळासाहेब नेटके व त्यांचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचा सत्कार करण्यात आला . 
तसेच महावितरण अधिकारी दिलीप कुमार कुंभरे आणि त्यांचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. 
ह्याच सोबत महापालिका विधुत विभागचे हनुमंत खरात यांचा व त्यांचे अधिकारी व कर्मचारी त्यांचाही सत्कार करण्यात आला. 
उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 13 मधील मुकादम व सफाई कामगार यांना उत्कृष्ट दर्जाचे मास्क चे वाटप करण्यात आले 
आणि वाढदिवसानिमित्त पाचशे गरजू कुटुंबांना मोफत धान्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन मनसे लाल गड शाखा उल्हासनगर नंबर 4 यांचे वतीने करण्यात आले होते
 अशी माहिती मनसेचे प्रदीप गोडसे यांनी दिली 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप