धोकादायक झालेल्या पुलाला बांबुच्या काठयांचा आधार...अंबरनाथ तालुक्यातील चिरड शेलारपाडा गावचा पुल झाला धोकादायक...धोकादायक पूल देत आहे जीवघेण्या अपघातांना निमंत्रण...अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या चिरड गावचा पूल सध्या धोकादायक झाला आहे. पुलाच्या कडा या नदीत पडत असून सध्या ग्रामस्थांनी या धोकादायक पुलाला बांबुच्या काठ्यांचा आधार दिलेला आहे. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीकडे प्रशासकीय यंत्रणा कधी लक्ष देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. अंबरनाथ तालुक्यातील पोसरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेला चिरड गावचा पूल हा धोकादायक झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नव्या पुलाची मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत. मात्र ग्रामस्थांच्या मागणीकडे राजकीय मंडळी देखील दुर्लक्ष करत आहेत. चिरड गावचा पूल हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या पूल थेट मलंगगड भागाला राज्य महामार्गाला जोडत आहे. चिरड गावच्या पुलावरून थेट खोणी तळोजा या मार्गाला जोडला जाणारा पूल सध्या धोकादायक झाल्याने त्याला बांबुच्या काठ्यांचा आधार दिला जात आहे. मात्र या आपुलाला संरक्षक कठडे नसल्याने आणि पुलाचे स्लॅब झाली कोसळत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. त्यामुळे सध्या या पुलावरून होणारी वाहतूक धोकादायक ठरत आहे. त्यामुळे प्रशासन कधी अश्या धोकादायकल पुलांकडे लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. माजी कामगार मंत्री शाबीर भाई शेख यांच्या कालखंडात या पुलाचे काम करण्यात आले होते. मात्र आता हा पूल धोकादायक झाला असून अपघातांना निमंत्रण देत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा याकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप