26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

२६ जानेवारी
७३ वा प्रजासत्ताक दिन वडवली विभागात उत्साहात झाला साजरा

अजादी का अमृत महोत्सव वर्ष निमित्त मा. नगरसेवक  सुभाष साळुंके व संवाद फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले 

यावेळी सीमेवर लढून देशरक्षण करणाऱ्या सैन्य दलातील ११ निवृत्त सैनिकांचा प्राथमिक स्वरूपात कुटुंबासह सन्मान सोहळा आयोजित केला 

ध्वजारोहन कॅप्टन अनंत धर्मा जगताप  यांच्या हस्ते  व इतर मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले

देशाला परकीय आक्रमणापासून ऊन– पाऊस–हवा–बर्फ अश्या प्रतिकूल तमा न बाळगता केलेल्या अहोरात्र सेवेमुळे भारतीय नागरिक सुखाची झोप घेत असून सैनिकांच्या सेवेमुळेच देश स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करीत आहे

त्यांनी केलेल्या देशसेवेचा नितांत आदर वाटतो, म्हणूनच 
प्रजासत्ताक दिना निमित्त सैनिक प्रमाण पत्र देऊन सन्मान करताना आम्हांस आनंद होत आहे,असे प्रतिपादन कार्यक्रमाचे आयोजक सुभाष साळुंके यांनी केले

सहपत्नीक आम्हां सैनिकांचा अंबरनाथ प्रथमच असा सत्कार  सुभाष साळुंके व सौ.सुवर्णा साळुंके यांनी केला, त्याबद्दल त्यांचे ऋणी आहोत तसेच सुभाष साळुंके व सुवर्णा साळुंके हे नेहमी आगळेवेगळे लोकोपयोगी उपक्रम व कार्यक्रम यशस्वीपणे राबवित असतात.त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. असे कॅप्टन  अनंत जगताप व माजी सैनिक .रणजित सुर्यवंशी यांनी सत्करा प्रसंगी मत व्यक्त केले

प्रास्तविक माजी नगरसेवक परशुराम एगडे, कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु.पौर्णिमा शिंदे यांनी केले
 आभार प्रदर्शन कु.मानसी साळुंके यांनी केले.

यावेळी सौ.सुवर्णा साळुंके, लक्ष्मण कदम, अमित साळुंके, कृष्णा मोरे यांनी मत व्यक्त केले.
याप्रसंगी निवृत्त पोलीस अधिकारी विजय करावडे, कु.पौर्णिमा शिंदे, कु.ओवी आचरेकर, कु.ओवी अक्षय पाध्ये यांनी भक्तीपर गाणी सादर केली तसेच कु.सुमित बनसोडे यांनी लहान मुलांसह कवायत सादर केली.

भारत संस्कार केंद्र परिसरातील विठ्ठल खर्चे,कैलास महाजन, श्रीधर गायकवाड,
 प्रशिक गायकवाड.
दिनकर नारखेडे, सुनिल देशपांडे, सार्थक साळुंके, विलास शेट्ये, गोविंद शेडगे, सौ.सुनंदा मांढरे, सौ. सुषमा आचरेकर, सौ. सुनिता रघुनाथन,सौ.जयश्री वाघेला, सौ. पाध्ये यांनी कार्यक्रम यशस्वी केला.
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप