महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटूरे यांनी केली मागणी

महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटूरे यांनी केली मागणी.    उस्मानाबाद
शेतकऱ्यांच्या शेतामध्ये महावितरण कंपनीकडून विजेचे खांब तारा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले व होत असल्याने महावितरणने शेतकर्‍यांना भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटुरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिनांक 25 मार्च 2022 रोजी निवेदन पत्राद्वारे केली असून दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये महावितरण कंपनी कडून करण्यात येणार्‍या वीज पुरवठा चे विद्युत खांब पोल तारा ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी जागा वापरली आहे परंतु या जागेपोटी बहुतांशी शेतकऱ्यांना कोणतीही नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही काही शेतकऱ्यांना तर नुकसान भरपाई मिळते हे माहिती देखील नाही ? तर भारतीय टेलिग्राफ कायदा 1985 च्या कलम 16 नुसार वापरासाठी घेतलेल्या जमिनीचे भाडे नुकसान भरपाईची परिगणना करून व त्यावरील नियमाप्रमाणे व्याज आकारून संपूर्ण रक्कम देण्याची तरतूद करण्यात आली आहे परंतु या कायद्यान्वये नुकसान भरपाई देण्यात येत नाही उलट अशा कामासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना वीज देखील व्यवस्थित पुरविली जात नाही उलट अनेक वेळा विद्युत कनेक्शन तोडून अन्याय केला जातो त्यामुळे या कायद्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल माफ करावे तसेच शासनाने संबंधितांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा पक्षाच्यावतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अरुण निटुरे यांनी दिला आहे अशी माहिती राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण नीटूरे यांनी दिली आहे.   
      
 ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उस्मानाबाद

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप