प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आमरण उपोषण सुरू असतानाच रस्ते कामाला सुरुवात

प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आमरण उपोषण सुरू असतानाच रस्ते कामाला सुरुवात अंबरनाथ मधील फुलेनगर गुप्ता तबेला पासून जावसई रिक्षा स्टॅन्ड पर्यंतचा राहदारीचा डांबरीकरण रस्ता अर्धवट बनविण्यात आला होता तो रस्ता पूर्ण बनवून मिळावा या करिता प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने अंबरनाथ नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना अनेक वेळा पत्र व्यवहार करून मागणी केली असतानाही रस्त्याचे काम होत नव्हते दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी, प्रहार जनशक्ती पक्षाचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष, आलम खान, कुशाल सोनकांबळे, दत्तात्रेय घोगरे, सोनू नायक, अभिमन्यू गुप्ता, सोनू चव्हाण, यांच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात केली आणि काही तासातच  महानगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी तात्काळ रस्ता दुरूस्तीला परवानगी देत रस्ता दुरूस्तीचे काम उपोषण सुरू असतांनाच सुरू केले
तसेच अंबरनाथ येथील फुलेनगर मधील सर्व स्ट्रीट लाईटवर  जूने लाईट बदलून एलईडी लाईट सुद्धा सुरू करण्यात आल्या
तसेच रस्ता कायमस्वरूपी बनवण्याकरीता २०२२-२०२३ मार्च २०२३ अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली असल्याबाबत पत्राद्वारे लेखी आश्वासन देण्यात आले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप