श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त "भक्ती-शक्ती" चौक येथील प्रतिमेला पुष्पहार अर्पण

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त "भक्ती-शक्ती" चौक येथील प्रतिमेला पुष्पहार अर्पण
अंबरनाथ: नगरसेवक श्री सुभाष साळुंके यांच्या संकल्पनेतून  उभारलेल्या छत्रपती शिवराय व जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या भेटीचे शिल्प अर्थात "भक्ती-शक्ती" चौक येथील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले, छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकोबाराय यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ शिवसैनिक श्री. चद्रकांत फाळके मामा यांना पुष्पमाला अर्पण करण्याचा मान देण्यात आला.
मा.नगरसेवक श्री. सुभाष साळुंके यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोवाडे व घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी श्री. सुभाष साळुंके यांच्या सोबत  मा.नगरसेवक श्री. रविंद्र करंजुले,संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके , आम्ही रायगडकर प्रतिष्ठान चे कैलास फलके, अनेक शिवप्रेमी नागरिक, संस्था व मान्यवर उपस्थित होते.बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सम्पर्क साधा संपादक हरी आल्हाट ९९६०५०४७२९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप