बहुजन संग्रामच्या नेत्यारंजनाताई कांबळे यांचे निधन

बहुजन संग्रामच्या नेत्या
रंजनाताई कांबळे यांचे निधन
मुंबई: 'बहुजन संग्राम' या संघटनेच्या महिला आघाडीच्या राज्य प्रमुख रंजनाताई कांबळे (६२) यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानंतर आज रविवारी ( २४ सप्टेंबर) सकाळी ६ वाजता दुःखद निधन झाले. त्यांना डोंबिवली येथील एका खासगी रुग्णालयात शनिवारी दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
रंजनाताई कांबळे या भारतीय बौद्ध महासभेच्या कांदिवली ( पूर्व) क्रांती नगर शाखेच्या कोषाध्यक्ष होत्या. स्थानिक धम्मक्रांती महिला उत्कर्ष मंडळाच्या त्या अध्यक्षही होत्या.त्यांनी २०११ मध्ये भारिप- बहुजन महासंघाच्या उमेदवार म्हणून मुंबई महानगर पालिकेची निवडणूक लढवली होती.

त्या मूळच्या जालना जिल्ह्यातील केंधळी (ता. मंठा) येथील होत्या. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याच्या काळात दलित मुक्ती सेनेच्या विलेपार्ले येथील सम्राट अशोक नगर शाखेत त्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. 

त्यांच्यापाठी दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप