शांतीदूत विश्वकर्मी डॉ विश्वनाथ कराड यांच्याकडून मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचा गौरव.

*शांतीदूत विश्वकर्मी डॉ विश्वनाथ कराड यांच्याकडून मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचा गौरव.*
पुणे ( विशेष प्रतिनिधी)
भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा वारसा जपण्यात योगदान असणारे, महाराष्ट्राभूषण व्यक्तिमत्व, तत्वज्ञानी, विश्वकर्मी शांतीदूत,पाच विद्यापीठाचे संस्थापक,एम आय टीचे संस्थापक डॉ प्रा विश्वनाथ दा कराड यांनी कोथरुड शैक्षणिक संकुलात लातूर चे लोकप्रिय, संसद रत्न,कार्यसम्राट माजी खासदार,प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचा स्मृती चिन्ह आणि मानाची शाल देऊन यथोचित गौरव केला.
डॉ विश्वनाथ कराड यांनी माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी २०१४ ते २०१९ या काळात केलेल्या कामाचे कौतुक करुन उच्च शिक्षित खासदार म्हणून अनेक केंद्र सरकार च्या विकास कामाच्या योजना आणि विशेष म्हणजे लातूर ला आणि नांदेड ला NEET परीक्षा केंद्र आणि पासपोर्ट सेवा केंद्र आणि रेल्वे बोगी कारखाना आणि सुपर स्पेशिलिटी हॉस्पिटल असे अनेक लोकउपयोगी काम केल्याबद्दल समाधान व्यक्त करुन पुढील काळासाठी डॉ सुनील गायकवाड यांना शुभेच्छा देऊन अत्यंत आनंदानी विद्यापीठ कॅम्पस मधे गौरव करुन शुभेच्छा दिल्या.
शिक्षक दिनाच्या निमित्य डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी लिहलेला राजभाषा किसे कहते है? आणि जनसेवक जमिनीशी नाळ असलेला नेता हे दोन ग्रंथ विश्वधर्मी शांतिदूत डॉ विश्वनाथ कराड यांना देऊन त्यांचे आशीर्वाद डॉ सुनील गायकवाड यांनी घेतले.
या प्रसंगी विद्यापीठ चे रजिस्टार आणि अनेक अधिकारी उपस्थित होते.विशेष उपस्थित पांच पांडव यांची मातोश्री कुंती यांच्या परिवाराचे वंशज राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख डॉ ब्रिजेश कुंतल, चोखामेळा साहित्य संमेलन प्रमुख संयोजक सचिन पाटील,भाजपा चे विस्तारक सिद्धेश्वर माने,आदी मान्यवर उपस्थित होते.शांतीदूत विश्वकर्मी डाॅ.विश्वनाथ कराड यांच्याकडून मा.खासदार डाॅ.सुनिल गायकवाड यांचा गौरव झाल्याबद्दल बहूजन संग्रामचे प्रदेशाध्यक्ष व व्रूत्तदर्शन मिडीयाचे संपादक भीमराव चिलगावकर यांनी त्यांचे त्रिवार अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप