नोकरी अन् कर्जाचे आमिष, ३५७ कोटींचे रॅकेट उद्ध्वस्त; सीबीआयची देशभरात कारवाई

 मुंबई : तरुणांना नोकरीचे आमिष दाखवणे, सुलभ कर्जाचे गाजर दाखवणे, भरघोस परतावा योजना सादर करत फसवणे, अशा विविध कारणांद्वारे तब्बल ३५७ कोटींचे रॅकेट चालविणाऱ्या भामट्यांचा सीबीआयने पर्दाफाश केला. ऑपरेशन चक्र -२ या अंतर्गत यात गुंतलेल्या कंपन्या व लोकांचा वर्षभर मागोवा घेत ही कारवाई केली आहे. 

गुरुवार आणि शुक्रवार अशा दोन दिवसी सीबीआयने देशभरात ७५ पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी केली. अनेक संगणक, डिजिटल उपकरणे ताब्यात घेतली. सामान्यांना फसविण्यासाठी या सायबर भामट्यांनी सोशल मीडियाद्वारे जाहिराती देत लोकांना पैसे गुंतविण्यास भाग पाडले.

१३७ बनावट कंपन्यांद्वारे परदेशात फिरवला पैसा

लोकांना गंडा घालून मिळवलेला हा पैसा फिरवण्यासाठी तब्बल १३७ बनावट कंपन्या स्थापन  केल्या. या कंपन्यांद्वारे यूपीआय आणि ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून परदेशात पैसा फिरवला. पुढे या पैशांची गुंतवणूक क्रिप्टो करन्सीमध्ये केल्याचेही सीबीआयच्या तपासात आढळले आहे. सुमारे १६ बँक खात्यातून ३५७ कोटींचे व्यवहार झाल्याचे आढळले आहे.

जप्ती कशाची? 

कारवाईदरम्यान एकूण ३२ मोबाईल, ४८ लॅपटॉप, दोन सर्व्हर, ३३ सीमकार्ड, शेकडो पेनड्राईव्ह, आदी साहित्य जप्त केले आहे. आरोपींनी संवाद व संपर्कासाठी एकूण १५ ई-मेल आयडी तयार केले होते.

५ राज्यांत नऊ कॉल सेंटर

आरोपींनी पाच राज्यांत ९ कॉल सेंटरदेखील उघडले होते. सामान्य लोकांना फोन करून त्यांना योजना सांगितल्या जात होत्या. ही कॉल सेंटर्सही छाप्यात उद्ध्वस्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप