केंद्र सरकारचं दिवाळी गिफ्ट, ठाणे-कोल्हापूरसह १५ शहरांत PM ई-बस सेवा

केंद्र सरकारचं दिवाळी गिफ्ट, ठाणे-कोल्हापूरसह १५ शहरांत PM ई-बस सेवा,
कोल्हापूर : राज्यातील महापालिका क्षेत्रातील जनतेचा प्रवास नवीन वर्षापासून अतिशय सुखकर होणार आहे. यासाठी केंद्राने पीएम इ बस सेवा प्रकल्पा अंतर्गत तब्बल तेराशे वातानुकूलित बसेस मंजूर केल्या आहेत. दोन महिन्यात या बसेस महापालिका परिवहन समितीच्या ताफ्यात दाखल होतील. यामध्ये नागपूर, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यासह पंधरा शहरांचा समावेश आहे.

यासाठी केंद्राकडून तब्बल पाचशे कोटीपेक्षा अधिक निधी खर्च करणार आहे. राज्यात बहुतांशी महापालिका क्षेत्रात सुरू असलेली परिवहन सेवा ही तोट्यात आहे. काही ठिकाणी बसेसची संख्या प्रचंड कमी आहे. ज्या आहेत, त्यांची स्थिती खराब आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेचा प्रवास सुखकर आणि गतीमान व्हावा, पर्यावरणाचे प्रदूषण कमी व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या विशेष समितीच्या वतीने पीएम इ बस सेवा प्रकल्प ही योजना राबविली. त्याअंतर्गत देशभरातील शहरात इ बस देण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते.देशभरातून आलेल्या प्रस्तावाबाबत केंद्र, राज्य व महापालिका अधिकाऱ्यांची या आठवड्यात बैठक झाली.

त्यानंतर गुरूवारी पुन्हा अंतिम चर्चा झाल्यानंतर देशभरातील शहरांसाठी तीन हजार १६२ बसेस मंजूर करण्यात आल्या. यामध्ये महाराष्ट्राचा वाटा तब्बल १२९० इतका आहे. देशात गुजरात, हरियाणा, जम्मू काश्मिर, ओडिसा आणि पंजाब अशा विविध राज्यांना या बसेस मिळणार आहेत.यातील प्रत्येक बसेसची किंमत चाळीस लाख रूपये आहे. दोन महिन्यात या बसेस त्या त्या शहरात दाखल होणार आहेत. त्यांची पार्किंग, चार्जिंग व इतर सुविधांची तयारी तोपर्यंत करण्याची मुदत आहे. नवीन वर्षात या बसेस दाखल होणार असल्याने नव्या वर्षात महाराष्ट्रातील पंधरा शहरातील प्रवास वातानुकूलित होणार आहे.

शहरे व मंजूर बसेस १५० बसेस : नागपूर, ठाणे, १०० बसेस : छत्रपती संभाजीनगर कल्याण डोंबिवली नाशिक, विरार, भिवंडी, मिरा भाईंदर, कोल्हापूर, सोलापूर, उल्हासनगर५० बसेस : लातूर, अहमदनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप