नवीमुंबई दिनांक.२/४/२०२१ जनहित लोकशाही पार्टी चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अशोकराव आल्हाट यांचा वाढदिवस नवीन मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात आला.या वेळी खास करून हा वाढ दिवस एक आगळा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला प्रत्येकजन वाढ दिवसा निमित्त केक कापतात परंतु अशोक राव आल्हाट यांचा वाढदिवस मात्र कलिंगडे कापून साजरा करण्यात आला. या बाबत जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे संपादक यानी कलिंगड कापून वाढ दिवस साजरा केला या मागचा उद्देश काय ? हा प्रश्न विचारला असता . अशोक राव आल्हाट यांनी या मागचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले सध्या आपल्या देशात शेतकरी हवालदिल झाले असून अनेक शेतकरी कर्ज बाजारी होऊन शेती व फळ बागे लावीत आहेत. म्हणून आम्ही वाढ दिवसाला केक न कापता कलिंगडे कापून महाराष्ट्रातील जनतेला संदेश देण्याचा प्रयत्न केला की रोज लाखो लोकं केक कापून वाढ दिवस साजरा करतात जर लाखो लोकांनी कलिंगडे किंवा इतर फळे कापून वाढ दिवस साजरे केले तर याचा फायदा नक्कीच महाराष्ट्रातील शेतकरी जनतेला होणार. हे नक्की. यावेळी संतोष दादा चौधरी यांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.व नवीन मुंबई पदाधिकारी यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देवून,हा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप