उल्हासनगर मधील धोकादायक इमारतीवरील टॉवर त्वरित हटवा

उल्हासनगर मधील धोकादायक इमारतीवरील टॉवर त्वरित हटविण्यात यावे : आमदार कुमार आयलानी

 उल्हासनगर मधील धोकादायक इमारतीवरील टॉवर त्वरित हटविण्यात यावे असे निवेदन पत्र उल्हासनगर चे आमदार कुमार आयलानी यांनी दिनांक 14 जून रोजी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त  यांना दिले असून  सध्या उल्हासनगर शहरात 505 इमारती या धोकादायक असून उल्हासनगर शहरात सतत इमारती ढासळत आहेत व त्यामध्ये जीवितहानी आणि होत आहे  यामुळे धोकादायक इमारतीवरील टॉवर त्वरित हटविणे गरजेचे आहे टॉवरच्या रेडिएशनमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचेही त्यांनी या पत्रात लिहिले  असून धोकादायक इमारतीवर टॉवर लागल्यास त्या इमारतीवरील वजन सुद्धा वाढत आहे यामुळे धोकादायक इमारत कोसळून  जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे तात्काळ इमारतीवरील टॉवर हटविण्यात यावे अशी मागणी पत्राद्वारे केली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप