पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथे बैठकी चे आयोजन

पत्रकार सुरक्षा समितीची  पंढरपूर येथे  बैठकी चे  आयोजन
उल्हासनगर (अशोक शिरसाट )  
पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तसेच या बैठकीत अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यावेळी उपस्थित होते तसेच या बैठकीत चर्चा करण्यात आली    
प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा
ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याची चौकशी
पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना
राज्यातील सर्वच पत्रकारांची नोंदणी
यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती
कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसांना शासकीय सेवेत समाविष्ट व मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत
पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण
राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता
यासह पत्रकारांच्या विविध 
विषयावर चर्चा करून पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला
असून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न अत्यंत गंभीर असून राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारात धुळखात पडले आहे तसेच   पत्रकारांच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला तरच पत्रकारांचे प्रश्न मार्गी लागतील असं प्रतिपादन  पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी बोलताना सांगितले  
या बैठक प्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य सचिव डॉ आशिष कुमार सुना जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र शेवडे जिल्हा अध्यक्ष (महिला विभाग) सुवर्णा सुना  जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गणपा पंढरपूर तालुकाध्यक्ष  प्रशांत माळवदे पंढरपूर शहराध्यक्ष  दत्ताजी पाटील कार्याध्यक्ष दिनेश खंडेलवाल उपाध्यक्ष राम कृष्ण बिडकर सचिव विश्वास पाटील वीरेंद्र उत्पात सचिन कुलकर्णी चैतन्य उत्पात कबीर देवकुळे  बाहुबली जैन  अजित देशपांडे संजय यादव विनोद पोतदार खान  मुलाणी रफिक आत्तार महेश कदम तानाजी जाधव लखन साळुंखे यांच्यासह आदी पत्रकार यावेळी  उपस्थित होते
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा जनहित न्यूज महाराष्ट्र 
हरी चंदर आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप