दिव्यांग कल्याणकारी विभागाच्या दालनामध्ये बैठक आयोजन केली.

 दिव्यांग कल्याणकारी विभागाच्या दालनामध्ये बैठक आयोजन केली.

उल्हासनगर: दि, 10/05/2023 रोजी उल्हासनगर महानगरपालिका दिव्यांग कल्याणकारी विभागामध्ये उल्हासनगर शहरांमधील दिव्यांग हितार्थ कार्य करणारे संघटना यांनी दिनांक 11/5/2023 रोजी दिव्यांग बांधवांच्या हितार्थ मागणी पत्राद्वारे " *ठिय्या आंदोलन* " करण्याचे योजले होते, तत्पूर्वी दिव्यांग विभागाचे अधिकारी राजेश घणघाव, दिव्यांग विभाग प्रमुख, संतोष खोटरे ,दिव्यांग विभाग लिपिक यांनी आंदोलन कर्त्यांच्या शिष्टमंडळाची दिनांक 10/5/2023 रोजी दुपारी 3.00 वा. दिव्यांग कल्याणकारी विभागाच्या दालनामध्ये बैठक आयोजन केली. यावेळी ठिय्या आंदोलन आयोजित केलेल्या शिष्टमंडळांनी दिव्यांग आधार सेवा संस्थेचे अध्यक्ष सचिन राम सावंत, अंध हितकारी संस्था चे अध्यक्ष जगदीश पाटील, अपंग भाविक सेवा अध्यक्ष विक्रम उदासी, विकलांग गुरुकृपा शक्ती अध्यक्ष विजय सिंग लबाना, दिव्यांग संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेश गायकवाड, तसेच बी. आर. पाटील, छाया सावंत, जनहित न्यूज चैनल चे संपादक हरी आल्हाट , ज्योती पवार, संगीता साळवे यांच्या उपस्थितीमध्ये दिव्यांग बाबतीत उपस्थित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी दिव्यांग कल्याणकारी योजनेचे संबंधित अधिकारी यांनी उपस्थित मुद्द्यांवर योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करण्याचे आश्वासन दिले व दिनांक 11/5/2023 चे आंदोलन हे मागे घेण्याबाबत विनंती केली. तूर्तास आयोजित केलेले आंदोलन हे पंधरा दिवसांकरिता मागे घेण्यात येत आहे. अशी माहिती सचिन राम सावंत यांनी दिली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप