.मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा टँकर उलटला आहे.


 मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर टँकर उलटला
मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणामपुण्यातून टँकर अपघाताची मोठी अपघात घडली आहे. गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना घडली आहे. चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने आज पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा टँकर उलटला आहे. यामुळे या जुन्या महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात काल मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या दरम्यान गॅस कॅप्सूल टँकरचा अपघात झाला. गॅस कॅप्सूल टँकर चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने वाहन उलटून हा अपघात झाला आहे.

मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बीपीसीएल कंपनीच्या या गॅस टँकरचा अपघात झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील जुन्या पुणे - मुंबई महामार्गावरील मधुकरराव पवळे पुलाच्या सुरुवातीलाच हा अपघात झाला आहे.वायू गळती थांबवण्याचा प्रयत्न सुरू

गॅस टँकरचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यांनंतर पिंपरी चिंचवड महापालिकेचे अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी वायू गळती थांबवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

ज्या ठिकाणी अपघातग्रस्त टँकरमधून गॅस गळती झाली आहे. तो भाग वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद करण्यात आला आहे. तसेच दुपारी तीन वाजेपर्यंत वायू गळती थांबवण्याचा प्रयत्न अग्निशमन विभाग करत आहे.

अग्निशमन दल, पोलीस मदतीला धावले

दरम्यान, टॅकरचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अग्निशमन विभागाची टीम तसेच मुख्य अग्निशमन अधिकारी विजय थोरात, अग्निशमन अधिकारी चिपाडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, पोलीस उपायुक्त विवेक पाटील ,सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, उपायुक्त रविकिरण घोडके, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे व इतर 50 पोलीस पोहोचले. त्यांच्याकडून पुढील कार्यवाही सुरू आहे. सध्या गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वाहने आलेली असून कार्यवाही सुरू आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप