नवरात्री च्या दिवसांत शेकडो नवदुर्गा आक्रमक

नवरात्री च्या दिवसांत शेकडो नवदुर्गा आक्रमक..
उल्हासनगर

उपविभागीय अधिकारी 
उल्हासनगर प्रांत कार्यालय, व आयुक्त व प्रशासक, उल्हासनगर महानगर पालिका यांना शेकडो महिलानी हस्ताक्षर करुन निवेदन दिले जाईल कि समाजमंदिर बांधून मिळावे,
ह्यासाठी सतत 10 वर्षांपासुन मागणी करुन सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही म्हणुन प्रशासनाचे ध्यानाकर्षण करणेसाठी 20 ऑक्टोबर रोजी सह्यांची मोहिम राबवण्यात आली,
रमाबाई आंबेडकर नगर च्या बाजुला, दत्त मंदिर च्या पुढे, राम डेकोरेटर च्या मागे, भाऊराव तबेला च्या बाजुला, चोपडा कोर्ट उल्हासनगर 3 येथील खाली असलेल्या शासकीय जागेवर समाजमंदिर बांधून मिळावे ह्याकामी गेल्या 10 वर्षांपासुन स्थानिक नागरिक व महिला पुर्व आमदार ज्योती कालानी व पुर्व महापौर पंचम कालानी यांचेद्वारे पत्रव्यवहार करुन उल्हासनगर महानगर पालिका प्रशासनास सतत मागणी करीत आहेत,
सदर रिकाम्या असलेल्या जागेच्या आसपास 1500 ते 2000 लोकवस्ती आहे, व त्या जागी आसपास एक ही समाजमंदिर नसल्याने ही मागणी केली जात आहे,
धार्मिक कार्य, आंगणवाडी, छोट्या मुलांसाठी चे उपक्रम ह्यासाठी सदर समाजमंदिर त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना उपयोगी राहील,
व रिकाम्या जागेवर असामाजिक तत्व सुद्धा वावरणार नाहीत,
म्हणुन, सदर जागी खाली असलेल्या शासकीय जागेवर समाजमंदिर बांधून मिळावे ह्यासाठी स्थानिक नेत्या शोभाताई जाधव यांचे अध्यक्षतेखाली शेकडो महिलानी सह्या केल्या, 
सदर प्रसंगी उल्हासनगर चे माजी आमदार श्री पप्पु कालानी उपस्थित होते,ह्या विषयावर श्री पप्पु कालानी यांची उपविभागीय अधिकारी यांचेशी चर्चा झाली असुन माहिती घेऊन पुढील आठवड्यात अहवाल दिला जाईल, असे आश्वासन एसडीओ महोदयानी दिले अशी माहिती उमनपा पुर्व नगरसेवक मनोज लासी यानी उपस्थित महिलांना दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप