प्रयत्न आमचेनशा मुक्त अंबरनाथ करण्याचे__मा , सुभाष साळुंके

प्रयत्न आमचे
नशा मुक्त अंबरनाथ करण्याचे__मा , सुभाष साळुंके 
चरस,गांजा,ड्रग्स इ.नशा केल्याने व दारू व्यसनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याचे तसेच काही जण ऐन तारुण्यात मृत्युमुखीला जवळ केल्याच्या घटना घडताना मन सुन्न होत असे,
यावर उपाय म्हणून दारू मुक्त घर व नशा मुक्त अंबरनाथ करण्याचा प्रयत्न संवाद फाऊंडेशन च्या वतीने मा.नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या वाढदिवसानिमित 
भव्य नशा मुक्ती शिबिर
रविवार,११ मे २०२५* रोजी
सकाळी १० ते दु.१ वाजेपर्यंत*
 रोटरी क्लब हॉल, वडवली विभाग अंबरनाथ पूर्व येथे आयोजित केले आहे.
लाखो व्यक्तींना दारुमुक्ती देणारे *प्रख्यात उपचार तज्ज्ञ मा.डॉ.कृष्णा भावले हे समुपदेशन व आयुर्वेदिक औषध देणार असून IRS मा. समीर वानखेडे व सिने अभिनेत्री मा. क्रांती रेडकर उपस्थित राहणार आहे.
सदर आयुर्वेदिक उपचारामुळे लाखो व्यसनाधीन व्यक्तीनी दारू पासून मुक्ती मिळविले आहे, म्हणूनच अंबरनाथमधील व्यसनाधीन व्यक्ती दारू पासून मुक्ती करण्याचा व त्यांचा कुटुंबात सुख समाधानाचा आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न कार्यकुशल नगरसेवक - सुभाष साळुंके यांच्या संकल्पनेतून होत आहे,
मा.सुभाष साळुंके यांच्या ८ मे रोजी होणाऱ्या वाढदिवस वरील अवाढव्य खर्च टाळून तो व्यसन मुक्तीच्या कार्यात,अभियानात खर्ची पाडवा,, प्रतीव्यक्ती ₹१५००/– प्रमाणे १०० व्यक्तींना होणारा औषध खर्च करणार आहेत, जेणेकरून व्यसनाधीन व्यक्ती व कुटुंबाला भार न पडता मदत होऊन विनामूल्य औषध उपलब्ध होणार आहे.,याची संबंधित व्यक्तींनी नोंद घेऊन १००% दारू मुक्ती करण्यासाठी *नावे नोंदणी मा. सुभाष साळुंके, मा.नगरसेवक यांच्या जनसंपर्क कार्यालयात, Mb.9423080608/8788515075 येथे दि.8/5/25 पूर्वी करावी,
सदर प्रभावी व  दारूत्रस्त कुटुंब आनंदी करण्याच्या दृष्टीने अंबरनाथ मध्ये प्रथमच आयोजित केलेल्या  उपक्रमात त्रस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन 
संवाद फाऊंडेशन अध्यक्षा व अंबरनाथ विधानसभा संघटक – *सौ.सुवर्णा साळुंके* यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत