पोस्ट्स

शेकडो भगिनींची माजी आमदार नरेंद्र पवार यांना राखी बांधण्यासाठी मोठी गर्दी

इमेज
माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यंदाही जपली 'सामाजिक रक्षाबंधना' ची संवेदना शेकडो भगिनींची नरेंद्र पवार यांना राखी बांधण्यासाठी मोठी गर्दी 9 कल्याण : *प्रतिनिधी कल्याणी आगटे*   रक्षाबंधन बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याची महती अधोरेखित करणारा आपल्या संस्कृतीतील एक प्रमूख सण.आजच्या या पवित्र सणाचे औचित्य साधत कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यंदाही आपली सामूहिक रक्षाबंधनाची संवेदना जपल्याचे दिसून आले.  पवार यांना राखी बांधण्यासाठी कल्याण पश्चिमेतील शेकडो महिला भगिनींनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती.  गेल्या कित्येक वर्षांपासून माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने हा सामाजिक आणि सामुदायिक रक्षाबंधनाचा उपक्रम साजरा केला जात आहे. त्यामध्ये आता केवळ फरक इतकाच आहे की यापूर्वी तो मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन साजरा केला जायचा. आणि यंदा हा सोहळा पवार यांच्या निवासस्थानी साजरा झाला. मात्र त्यानंतरही त्याची व्याप्ती यत्किंचितही कमी झाली नाही. कल्य...

वंचित चे ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

इमेज
वंचित चे ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा  उल्हासनगर (अशोक शिरसाट) उल्हासनगर - ४ मध्ये सुभाष टेकडी येथे  सारंग थोरात यांनी प्रथम भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत केक कापून आपला वाढदिवस केला साजरा तसेच वाढदिवसा निमित्ताने सर्व कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना बॅग वाटप करण्यात आल्या  वंचित बहुजन आघाडीचे माजी अध्यक्ष नानासाहेब चव्हाण यांनी बोलताना सांगितले सारंग थोरात साहेब यांचे सामाजिक कार्य महान आहे असे चव्हाण वाढदिवसानिमित्त मागदर्शन करीत होते तसेच वंचितचे सारंग थोरात यांना पुढील वाटचालीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या असून या कार्यक्रमात  वंचित चे शेषराव वाघमारे,  रेखाताई उबाळे, उज्वल महाले , दिवाकर खळे, देवानंद ( प्रकाश) शिरसाट, महेंद्र अहिरे,प्रा सुरेश सोनवणे सर, प्रकाश इंगळे, प्रशांत सोनवणे, नितिन  भालेराव, निलेश  देवडे, दिपक आढाव, भारत थोरात, यांच्यासह भारतीय बौध्द महास...

प्रियकराचा प्लॅन तगडा, पण जळीत मृतदेहामुळेच सत्य उघड; किरणही होती कटात सहभागी, पोलिसही झाले अचंबित

इमेज
प्रियकराचा प्लॅन तगडा, पण जळीत मृतदेहामुळेच सत्य उघड; किरणही होती कटात सहभागी, पोलिसही झाले अचंबित.                        सोलापूर : पाटखळ (ता. मंगळवेढा) येथील निशांत सावतचे (वय २०) घराशेजारील चुलत वहिनी किरण सावतसोबत (वय २३) प्रेमसंबंध जुळले. बारावीपर्यंत शिकलेला निशांत कराड येथील एका ज्वेलरी शॉपमध्ये कामाला होता.           २० दिवसांपूवी तो किरणला कायमचेच घेऊन जायचे म्हणून गावी आला होता. त्या दोघांनी 'सापही मेला पाहिजे आणि काठीही तुटली नाही पाहिजे' असा तगडा प्लॅन आखला होता. निशांतने पंढरपूर हद्दीतून एक अनोळखी मनोरुग्ण महिलेला हेरून गावीही आणले होते. किरणच्या आई-वडिलांनी तिचा विवाह धुमधडाक्यात लावला होता. किरणला छोटी मुलगी आहे. पती तिच्यावर जिवापाड प्रेम करायचा, पण निशांतने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि ती त्याच्या प्रेमात पडली. काही महिन्यांनंतर त्यांनी पळून जाऊन एकत्र राहण्याचा डाव आखला. त्यासाठी निशांतने मनोरुग्ण महिलेला आणून गळा आवळला आणि तिचा मृतदेह घराजवळील कडब्याच्या गंजी...

गुहेत राहणाऱ्या रशियन बाईनं सांगितली सापांपासून बचावाची सोपी ट्रीक.

इमेज
गोकर्णचं किर्र जंगल, खतरनाक विषारी सापं, जीव कसा वाचवला?  गुहेत राहणाऱ्या रशियन बाईनं सांगितली सापांपासून बचावाची सोपी ट्रीक.   उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या गोकर्णमध्ये रामतीर्थ नावाचा डोंगर आहे, या भागामध्ये किर्र जंगल आहे, हा प्रदेश चारही बाजुनं विशाल आणि उंच झाडानं वेढलेला आहे. घनदाट जंगलामुळे या भागात सहसा कोणाचाही वावर नसतो. दुसरी गोष्ट म्हणजे या जंगलामध्ये माणसांचा फारसा वावर नसल्यामुळे अनेक हिंस्त्र आणि खतरनाक प्राण्यांचं हे जंगल अश्रयस्थान आहे. या जंगलामध्ये तब्बल वीस पेक्षा अधिक खतरनाक विषारी प्रजातीचे साप आढळून येतात.  थोडक्यात काय तर या जंगलामध्ये जाण्याची कोणीही हिंमत करत नाही, आणि गेलाच तर जिंवत परत येईल याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. हा रामतीर्थ नावाचा जो डोंगर आहे, तीथे काही गुफा आहेत. त्यातील एका गुफेमध्ये एक रशियन महिला गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या दोन मुलींसोबत राहात असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. या भागांमध्ये वारंवार भूस्खलनाच्या घटना घडतात, असंच एक दिवस भूस्खलन झालं, मातीच्या ढिगाऱ्याखाली कोणी दबलं तर नाही ना? याच...

५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात ?

इमेज
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात ?                           आजच्या युगात, बदलत्या काळानुसार उपचार महाग होत चालले आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना अनेक गंभीर आजारांवर उपचार घेणे कठीण होत आहे. हे लक्षात घेऊन, सरकार प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत देशातील गरीब आणि गरजू कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देत आहे.        हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवावे लागेल. या योजनेचा लाभ कोणाला मिळेल? सरकारच्या या आरोग्य विमा योजनेत ७० वर्षे आणि त्यावरील सर्व लोकांचा समावेश आहे, त्यांचे उत्पन्न कमी असो वा जास्त. याशिवाय, ज्या लोकांना इतर कोणत्याही आरोग्य योजनेचा लाभ मिळत नाही त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. करदाते, आर्थिकदृष्ट्या श्रीमंत लोक, पीएफ किंवा ईएसआयसीची सुविधा मिळवणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. तुम्ही या पद्धतीने देखील तपासू शकता तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तपासण्यासाठी, त्याच्या...

लोकलच्या मालडब्यात बदल करून, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आकर्षक डबा तयार झाला आहे.

इमेज
लोकलच्या मालडब्यात बदल करून, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आकर्षक डबा तयार झाला आहे. मुंबईतील प्रत्येक लोकल ट्रेनमध्ये लागणार 'हा' एक्स्ट्रा डब्बा; तयारीही झाली, 'या' प्रवाशांना सर्वाधिक फायदा.           मध्य रेल्वेने एका नव्या बदलासंदर्भातील निर्णय घेतला असून त्याबद्दलचे रचनात्मक बदलही करण्यात आले आहेत. या निर्णायचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार आहेत.           रेल्वेने प्रवास आरामदायी होण्यासाठी लोकलचा मालडबा ज्येष्ठ नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने माटुंगा कारखान्यात लोकलच्या मालडब्यात बदल करून, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आकर्षक डबा तयार झाला आहे. नेमका काय आहे हा सारा प्रकार मध्य रेल्वेवरील प्रत्येक लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. लोकलमध्ये प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी असे डब्याचे प्रकार आहेत. तर, महिला, दिव्यांग आणि मालवाहतुकीसाठी स्वतंत्र डबे आहेत. गरोदर स्त्रियांना आणि ज्येष्ठ नागरिकांना लोकलच्या डब्यात काही आसने राखीव आहेत. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना गर्दीतून प्रवास करणे कठीण होते....

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण ब्लॉक

इमेज
मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण ब्लॉक मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी 10.40 ते दुपारी 3.40पर्यंत जलद मार्गावर ब्लॉक असेल. तसेच हार्बर लाईनवर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05पर्यंत ब्लॉक राहणार आहे. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.34 ते दुपारी 3.03पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्धजलद लोकल ठाणे व कल्याणदरम्यान धिम्या मार्गावर वळवल्या जातील.