पोस्ट्स

घबाडकुंड'च्या सेटवरचा मजेशीर किस्सा; १९ जूनला उलगडणार रहस्याचा पडदा

इमेज
फिटनेसच्या बाबतीत देवदत्त नागेचा 'रोल मॉडेल' कुशल बद्रिके! ​' घबाडकुंड'च्या सेटवरचा मजेशीर किस्सा; १९ जूनला उलगडणार रहस्याचा पडदा ​मुंबई (विशेष प्रतिनिधी : गणेश तळेकर) : मनोरंजन सृष्टीतील 'पिळदार शरीरयष्टी' आणि दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता देवदत्त नागे सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. आपल्या फिटनेससाठी प्रचंड मेहनत घेणाऱ्या देवदत्तने चक्क अभिनेता कुशल बद्रिके हा आपला 'फिटनेस रोल मॉडेल' असल्याचा खुलासा केला आहे. आगामी 'घबाडकुंड' चित्रपटाच्या फर्स्ट लूक लाँच सोहळ्यात देवदत्तने सेटवरील हे मजेशीर गुपित उघड केले. ​मैत्री आणि फिटनेसची अनोखी जुगलबंदी 'घबाडकुंड' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणींना उजाळा देताना देवदत्त नागे म्हणाला, "मित्रांकडून मिळणारी प्रेरणा आयुष्याला नवी ऊर्जा देते. माझ्यासाठी फिटनेसच्या बाबतीत कुशल बद्रिके खऱ्या अर्थाने रोल मॉडेल आहे." देवदत्तने पुढे सेटवरची धमाल सांगताना कुशलची फिरकी घेतली. "पहाटेच्या अंधारात दिव्याच्या प्रकाशात कुशलसोबत केलेला व्यायाम, त्यानंतर घेतलेला फ...

उल्हासनगर तहसील कार्यालयामार्फत 'महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न*

इमेज
*उल्हासनगर तहसील कार्यालयामार्फत 'महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न*  ​एकाच छताखाली विविध शासकीय दाखले व सेवांचे वाटप; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ​ *उल्हासनगर:* महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली, उल्हासनगर तहसील कार्यालयाच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' अभियानाचे शनिवारी, ७ मार्च २०२६ रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले. नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवा आणि दाखले विनाविलंब उपलब्ध करून देणे, हा या शिबिराचा *मुख्य उद्देश होता.*  ​तहसीलदार कार्यालयातील कॅम्प नंबर ५ येथे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर पार पडले. तहसीलदार कल्याणी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे जागेवरच वाटप करण्यात आले. ​ *विविध सेवांचा लाभ*  ​या शिबिरात नागरिकांच्या सुविधेसाठी विविध कक्षांची स्थापना करण्यात आली होती, ज्यामध्ये खालील सेवा पुरवण्यात आल्या: ​ *महसूल दाखले:* उत्पन्न द...

कालकथित सावित्रीबाई दामू सुरवाडे यांचा उद्या प्रथम स्मृतिदिन; कल्याण येथे अभिवादन सभेचे आयोजन*

इमेज
* कालकथित सावित्रीबाई दामू सुरवाडे यांचा उद्या प्रथम स्मृतिदिन; कल्याण येथे अभिवादन सभेचे आयोजन*   * कल्याण:*  बहुजन संग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा वृत्तदर्शन मीडियाचे संपादक भीमराव निकम-चिलगावकर यांच्या भगिनी  कालकथित सावित्रीबाई दामू सुरवाडे यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम उद्या, रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दुपारी १२ वाजता लेक कॅन्सल बिल्डिंग (रूम नं. ७०४), बिर्ला कॉलेज जवळ, कल्याण (पश्चिम), जिल्हा ठाणे येथे संपन्न होईल.  * मेहनती आणि संघर्षमय जीवनप्रवास*  सावित्रीबाई सुरवाडे यांचा जीवनप्रवास अत्यंत कष्टप्रद आणि प्रेरणादायी राहिला आहे. मूळच्या वाकडी येथील असलेल्या सावित्रीबाई पतीच्या निधनानंतर आपल्या तीन मुलांसह चिलगाव येथे माहेरी आल्या होत्या. त्यांचे काका रामा निकम (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे खंदे समर्थक) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भीमराव निकम-चिलगावकर व त्यांच्या बंधूंच्या (सुखदेव व श्रावण निकम) सहकार्याने त्यांनी आपल्या मुलांचे संगोपन केले. ' * सावित्रीबाई यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत ...

रत्नागिरीच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा; उद्या ‘मिनी थिएटर’चे थाटात लोकार्पणपालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून साकारले सुसज्ज व्यासपीठ; ३०० आसनक्षमतेचे नाट्यगृह कलाकारांच्या सेवेत

इमेज
रत्नागिरीच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा; उद्या ‘मिनी थिएटर’चे थाटात लोकार्पण ​पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून साकारले सुसज्ज व्यासपीठ; ३०० आसनक्षमतेचे नाट्यगृह कलाकारांच्या सेवेत ​ *रत्नागिरी : प्रतिनिधी गणेश तळेकर*  रत्नागिरीच्या सांस्कृतिक आणि कला क्षेत्रासाठी एक सुवर्णक्षण समीप आला आहे. शहराची वाढती सांस्कृतिक गरज आणि स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुसज्ज ‘मिनी थिएटर’ चे उद्घाटन उद्या, शनिवार, ७ मार्च २०२६ रोजी संपन्न होत आहे.  *​लोकार्पण सोहळा:* अरिहंत मॉल येथील 'रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र' येथे सायंकाळी ६ वाजता हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याच शुभहस्ते या नूतन मिनी थिएटरचे लोकार्पण करण्यात येईल. या नव्या वास्तूमुळे रत्नागिरीतील सांस्कृतिक चळवळीला आता नवी उभारी मिळणार आहे.  *​कलेसाठी हक्काची जागा:* रत्नागिरी जिल्ह्याला कला आणि संस्कृतीची मोठी परंपरा आहे. अनेकदा मोठ्य...

पुण्यतिथीनिमित्त ११ मार्च रोजी दादरच्या शिवाजी मंदिरात विशेष प्रयोगमुंबई: प्रतिनिधी गणेश तळेकर

इमेज
'इथे ओशाळला मृत्यू' नाटकाद्वारे धर्मवीर संभाजी महाराजांना देणार मानवंदना ​ पुण्यतिथीनिमित्त ११ मार्च रोजी दादरच्या शिवाजी मंदिरात विशेष प्रयोग ​ मुंबई: प्रतिनिधी गणेश तळेकर  स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या धगधगत्या शौर्यगाथेचा इतिहास 'इथे ओशाळला मृत्यू' या अजरामर नाटकाद्वारे पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरणार आहे. महाराजांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून, ११ मार्च रोजी दुपारी ४:०० वाजता दादर येथील श्री शिवाजी मंदिर येथे या विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. ​प्राध्यापक वसंत कानेटकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली ही संहिता शिवगणेश प्रॉडक्शन्सच्या कलाकारांनी पुन्हा एकदा ताकदीने सादर केली आहे. औरंगजेबाविरुद्ध नऊ वर्षे दिलेला लढा आणि स्वराज्यासाठी केलेला सर्वोच्च त्याग असा अंगावर शहारे आणणारा प्रवास या नाटकातून मांडला जातो. ​ दिग्गज कलाकारांचा संच: या नाटकाचे दिग्दर्शन गणेश ठाकूर यांनी केले असून, त्यांनीच छत्रपती संभाजी महाराजांची आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत डॉ. सोनल लेले यांनी आपल्या अभिनयाची...

भारत पुन्हा गुलामगिरीच्या दिशेने; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात*

इमेज
* भारत पुन्हा गुलामगिरीच्या दिशेने; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात*   * मुंबई/ (प्रतिनिधी, अशोक शिरसाट)*  आर.एस.एस.चे इस्रायलशी असलेले संबंध, केंद्राचे परराष्ट्र धोरण आणि अमेरिकेसोबतचे एकतर्फी करार यामुळे भारत पुन्हा एकदा गुलामगिरीच्या दिशेने जात असल्याची भीती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. या धोरणांमुळे भारतीय नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली असून, देशात संतापाची लाट असल्याचे सांगत आंबेडकरांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेल्या 'एपस्टीन फाईल्स' आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या एकतर्फी व्यापार कराराच्या निषेधार्थ सोमवारी मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसर कार्यकर्त्यांच्या घोषणांनी दणाणून गेला होता. ' * मोदी हटाव, देश बचाव'च्या घोषणांनी मुंबई दणाणली*  या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी 'मोदी हटाव, देश बचाव' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आंदोलनाचे गांभीर्य लक्ष...

दिव्यांगांना आता १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य; तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णयतीन दशकानंतर निधीत १५ पट वाढ; स्वयंरोजगारासाठी 'दिव्यांग सहाय्यक' पोर्टलवर नोंदणीचे आवाहन

इमेज
दिव्यांगांना आता १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य; तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय तीन दशकानंतर निधीत १५ पट वाढ; स्वयंरोजगारासाठी 'दिव्यांग सहाय्यक' पोर्टलवर नोंदणीचे आवाहन मुंबई : राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी आणि त्यांच्या स्वयंरोजगाराला बळ देण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री (टूलकिट) खरेदी करण्याकरिता आता १,००० रुपयांऐवजी थेट १५,००० रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तब्बल ३० वर्षांनंतर या रकमेत १५ पटीने वाढ करण्यात आल्याने दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, "विकसित महाराष्ट्र २०४७" या आराखड्याचा भाग म्हणून दिव्यांगांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हे शासनाचे मुख्य ध्येय आहे. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि स्वरूप थेट लाभ हस्तांतरण (DBT): मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाईल. पात्रता: अर्जदाराने शासकीय किंवा शासनमान्य संस्थेतून कौशल्य ...