पोस्ट्स

बहुजन संग्राम संघटना व वृत्तदर्शन मीडियातर्फे १३५ किलो मिठाई आणि किराणा मालाचे वाटप*

इमेज
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मुंबईत १३५ कुटुंबांना मदतीचा आधार*   * बहुजन संग्राम संघटना व वृत्तदर्शन मीडियातर्फे १३५ किलो मिठाई आणि किराणा मालाचे वाटप*   *( प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट )*   * मुंबई * : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून 'बहुजन संग्राम' ही सामाजिक संघटना आणि 'वृत्तदर्शन मीडिया' या राज्यस्तरीय वृत्तसंस्थेच्या वतीने मुंबईत अनोखा सेवा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत १३५ किलो मिठाई तसेच १३५ गरजू कुटुंबांना प्रत्येकी १ हजार रुपयांचा शिधा, किराणा आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले. मुंबई उपनगरातील १३५ दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि बहुजन समाजातील निराधार कुटुंबांना साडी-चोळी व कपड्यांचे वाटप करण्यात आले. बहुजन संग्राम संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष विनोद कांबळे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. भीमराव चिलगावकर (प्रदेशाध्यक्ष, बहुजन संग्राम संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला असून, सर्व स्तरांतून या उपक्र...

अंबरनाथमध्ये २० एप्रिलला भव्य 'रोजगार मेळावा'; शिवसेनेचे सुभाष साळुंके आणि संवाद फाउंडेशन अध्यक्ष सुवर्णाताई साळुंके यांच्या पुढाकाराने शेकडो तरुणांना मिळणार 'ऑन द स्पॉट' नोकरी

इमेज
अंबरनाथमध्ये २० एप्रिलला भव्य 'रोजगार मेळावा'; शिवसेनेचे सुभाष साळुंके आणि संवाद फाउंडेशन अध्यक्ष सुवर्णाताई साळुंके यांच्या पुढाकाराने शेकडो तरुणांना मिळणार 'ऑन द स्पॉट' नोकरी अंबरनाथ: बेरोजगार तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी अंबरनाथमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना नगरसेवक श्री. सुभाष नारायण साळुंके आणि संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या मेळाव्यात पात्र उमेदवारांना 'ऑन द स्पॉट जॉब' मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मेळाव्याचे सविस्तर तपशील: हा मेळावा सोमवार, २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. 'पीएसएन सप्लाय चेन सोल्यूशन प्रा. लि. या कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. भरतीसाठी पात्रता आणि अटी: * काम: स्कॅनिंग, पॅकिंग आणि पिकिंग. कामाचे ठिकाण: आईस्क्रीम वेअरहाऊस, पाले MIDC, अंबरनाथ (पूर्व). पात्रता: फक्त पुरुष उमेदवार (वय १९ ते ३५ वर्षे). वेतन व सुविधा: १५,९०० ...

धूप में डटे रहने वाले यातायात पुलिसकर्मियों के सम्मान में आगे आया ज्योतिरमणि फाउंडेशन**

इमेज
धूप में डटे रहने वाले यातायात पुलिसकर्मियों के सम्मान में आगे आया ज्योतिरमणि फाउंडेशन** **उल्हासनगर:** "जो धूप में खड़े हैं हमारे लिए, आज उनके लिए हम खड़े हुए!" इसी प्रेरणादायी संदेश के साथ ज्योतिरमणि फाउंडेशन द्वारा शहर में एक सराहनीय सामाजिक पहल की गई। फाउंडेशन की ओर से उल्हासनगर कैंप नंबर 1 से लेकर कैंप नंबर 5 तक चिलचिलाती धूप में अपनी सेवाएं दे रहे यातायात (ट्रैफिक) पुलिस अधिकारियों और कर्मचारियों को सनग्लासेस (धूप के चश्मे) वितरित किए गए। तेज धूप, धूल और लगातार ट्रैफिक के भारी दबाव के बीच ये पुलिसकर्मी बिना थके अपनी जिम्मेदारी निभाते हैं। उनके इसी समर्पण और निष्ठा के प्रति आभार व्यक्त करने के उद्देश्य से फाउंडेशन ने यह कदम उठाया। इस दौरान फाउंडेशन के सदस्यों ने न केवल चश्मों का वितरण किया, बल्कि अधिकारियों से संवाद कर उनके प्रति कृतज्ञता भी प्रकट की। यह कार्यक्रम केवल एक वितरण अभियान न रहकर समाज और सुरक्षा बलों के बीच एक भावनात्मक जुड़ाव का प्रतीक बन गया। फाउंडेशन का मानना है कि जो लोग हर दिन हमारी सुरक्षा के लिए सड़कों पर डटे रहते हैं, उनके स्वास...

तपती धूप में सुरक्षा देने वाले हाथों को मिला सम्मान; ट्रैफिक पुलिस को बांटे सनग्लासेस

इमेज
तपती धूप में सुरक्षा देने वाले हाथों को मिला सम्मान; ट्रैफिक पुलिस को बांटे सनग्लासेस उल्हासनगर: शहर की यातायात व्यवस्था को सुचारू बनाए रखने के लिए कैंप नंबर 1 से 5 तक कड़ी धूप में तैनात रहने वाले ट्रैफिक पुलिस कर्मियों के प्रति आभार व्यक्त करने हेतु एक विशेष पहल की गई। मंडल 3B और ज्योतिरमणि फाउंडेशन** के संयुक्त तत्वावधान में ट्रैफिक पुलिस अधिकारियों और कर्मचारियों को धूप से राहत देने के लिए उच्च गुणवत्ता वाले सनग्लासेस (धूप के चश्मे) वितरित किए गए। कर्तव्यनिष्ठा का सम्मान** यह कार्यक्रम मंडल अध्यक्ष श्री हरेश भाटिया जी के मार्गदर्शन में संपन्न हुआ। इस अवसर पर उन्होंने कहा, "जब हम भीषण गर्मी में अपने घरों या कार्यालयों में होते हैं, तब ये पुलिसकर्मी सड़क पर खड़े होकर हमारी सुरक्षा और सुविधा सुनिश्चित करते हैं। उनके इस निस्वार्थ समर्पण को देखते हुए यह छोटा सा प्रयास किया गया है ताकि उन्हें कार्य के दौरान थोड़ी राहत मिल सके।" समाज और सुरक्षा के बीच बढ़ा जुड़ाव वितरण के दौरान मंडल 3B के कार्यकर्ताओं और ज्योतिरमणि फाउंडेशन के सदस्यों ने ड्यूटी प...

सहेली' संस्थेचा पुढाकार: ३० गरजू महिलांना शिलाई मशीन व प्रमाणपत्रांचे वाटप*

इमेज
* सहेली' संस्थेचा पुढाकार: ३० गरजू महिलांना शिलाई मशीन व प्रमाणपत्रांचे वाटप*   * प्रकल्प 'हुन्नर' अंतर्गत महिलांना स्वावलंबनाचे धडे; आतापर्यंत १३२ महिला झाल्या सक्षम*   * प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट*  उल्हासनगर: वंचित आणि शोषित घटकातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 'सहेली' संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'प्रकल्प हुन्नर' अंतर्गत ३० गरजू महिलांना शिलाई मशीन आणि शिवणकाम किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये एकल महिला, परित्यागता, विधवा, घरेलू कामगार आणि हात मजुरी करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. या प्रशिक्षणाद्वारे महिलांमध्ये स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करण्याइतपत आत्मविश्वास निर्माण झाला आहे. सहेली संस्थेच्या वतीने या महिलांना गेल्या चार महिन्यांपासून शिवणकामाचे 'बेसिक' पासून 'अ‍ॅडव्हान्स' पर्यंतचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल सर्व ३० महिलांना अधिकृत प्रमाणपत्रे देण्यात आली. या उपक्रमामुळे या महिला आता कोणावरही अवलंबून न राहता स्वाभिमानाने स्वतःचे आण...

स्त्रीच्या अंतर्मनातील न बोललेल्या भावनांचा शब्दबद्ध इतिहास: 'गर्भातील सावल्या'*

इमेज
* स्त्रीच्या अंतर्मनातील न बोललेल्या भावनांचा शब्दबद्ध इतिहास: 'गर्भातील सावल्या'*  ​ * पुणे/प्रतिनिधी:*  स्त्री मनाच्या वेदना, तिचा संघर्ष, आशा आणि अस्तित्वाच्या शोधाचा एक अंतर्मुख प्रवास म्हणजे कवयित्री प्रतिभा विनायक पवार यांचा 'गर्भातील सावल्या' हा काव्यसंग्रह. नावाप्रमाणेच या संग्रहातील कवितांमध्ये अंधार-प्रकाश, वेदना-आशा आणि बंधन-मुक्ती यांचा एक संवेदनशील खेळ वाचकांना पाहायला मिळतो. ​ *स्त्री जीवनाचा आरसा*  ​या संग्रहातील ‘ती एक स्त्री...’, ‘स्त्री मनाचा वेध’ आणि ‘तू एक बंदिस्त स्त्री’ यांसारख्या कविता स्त्रीच्या अदृश्य यातना आणि तिच्या अफाट सहनशीलतेचे प्रभावी चित्रण करतात. कवयित्रीने स्त्री जीवनातील तडजोड, सामाजिक बंधने, पुरुषप्रधान संस्कृतीतील संघर्ष आणि स्वसन्मानाचा लढा अत्यंत प्रामाणिकपणे शब्दांत मांडला आहे. ​ * साधी पण भावस्पर्शी मांडणी*  ​या संग्रहाची भाषाशैली साधी, सरळ आणि थेट काळजाला भिडणारी आहे. केवळ शब्दांची जुळवाजुळव किंवा अलंकारिकतेपेक्षा अनुभवांची तीव्रता आणि भावनेची प्रामाणिकता याला येथे अधिक महत्त्व दिले गेले आहे. वाचक जेव्हा ही कविता...

नवे आर्थिक वर्ष, नवे नियम

इमेज
**नवे आर्थिक वर्ष, नवे नियम!* आजपासून देशात प्राप्तिकर, वेतन संहिता आणि डिजिटल पेमेंटमध्ये मोठे बदल  *नवी दिल्ली:*  आज, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत असून, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. यामध्ये १९६१ च्या जुन्या प्राप्तिकर कायद्याची जागा घेणारा 'नवा प्राप्तिकर कायदा २०२५', नवीन वेतन संहिता आणि डिजिटल व्यवहारांसाठी कडक सुरक्षा नियमांचा समावेश आहे.  *नवा कायदा:* आता १९६१ ऐवजी 'प्राप्तिकर कायदा २०२५' लागू झाला आहे.  *१२ लाखांपर्यंत करमुक्ती:* वार्षिक १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. नोकरदारांसाठी ७५,००० रुपयांची अतिरिक्त वजावट जाहीर करण्यात आली आहे.  *बदललेले फॉर्म्स:* आता फॉर्म १६ ऐवजी 'फॉर्म १३१' वापरावा लागेल. तसेच फॉर्म १३० आणि १६ अ च्या जागी नवीन प्रक्रिया सुरू होईल.  *भत्त्यांमध्ये वाढ:* मुलांच्या शैक्षणिक भत्त्याची मर्यादा प्रति महिना १०० रुपयांवरून थेट ३,००० रुपये (प्रति मुल) करण्यात आली आहे. करमुक्त जेवण कूपनची मर्यादा...

३२वर्षाच्या यशस्वी सेवेनंतर एमआयडीसीचे उपअभियंता सुधीर कुंभार सेवानिवृत्त

इमेज
अंबरनाथमधील अति. एमआयडीसी उपविभागात निरोप समारंभ संपन्न; मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव  *अंबरनाथ (प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट):*  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अतिरिक्त अंबरनाथ उपविभागाचे उप अभियंता सुधीर कुंभार हे आपल्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर ३० मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त ३० मार्च २०२६ रोजी अंबरनाथ येथील 'सुदामा हॉटेल, कृष्णा पॅलेस' येथे एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत भावूक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी कुंभार यांच्या कार्यशैलीचा गौरव केला.   *कर्तव्यतत्पर आणि अभ्यासू अधिकारी*  सुधीर कुंभार यांनी आपल्या ३२ वर्षांच्या सेवाकाळात अनेक आव्हानात्मक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले. लोकप्रतिनिधी, उद्योजक, पत्रकार किंवा सामान्य कर्मचारी असो, प्रत्येकाचे प्रश्न स्मितहास्याने ऐकून घेऊन ते मार्गी लावण्याकडे त्यांचा कल असे. मितभाषी आणि साधे व्यक्तिमत्व असूनही कर्तव्यपालनात ते तितकेच कठोर होते. विभागातील कामकाजा...

पलावा तमिळ संगम'तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्याचा जागर

इमेज
पलावा तमिळ संगम'तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्याचा जागर  * डोंबिवली: प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट*   जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'पलावा तमिळ संगम' (PTS) या संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यंदाच्या वर्षी देखील या परंपरेचे जतन करत संस्थेने डोंबिवलीतील 'रोटरी मूक-बधिर विद्यालया'ला आर्थिक मदत सुपूर्द केली, तसेच वृद्धाश्रमात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून एक आगळावेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. मूक-बधिर विद्यालयाला आर्थिक बळ संस्थेच्या महिला विभागाने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता. सदस्या उमा मणिकवासगम आणि लक्ष्मी वैरावन यांच्या समन्वयाखाली महिला विंगने या सत्कार्यासाठी भरीव निधी संकलित केला. 'पलावा तमिळ संगम'चे अध्यक्ष पांडियन सर, समिती सदस्य लक्ष्मी वयरवन, श्रीविद्या, कलावती जी, आणि मालती यांनी प्रत्यक्ष विद्यालयाला भेट देऊन शाळेच्या प्रमुखांकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी सदस्यांनी वर्गांना भेटी देऊन मुलांशी संवाद साधला. मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि शिक्षकांचे समर्पण पाहून सर्व सदस्य भा...

समाज सेवा के क्षेत्र में 'सिमरन सेवा एनजीओ का सराहनीय कदम; पटेल रिटेल लिमिटेड' ने सी एस आर के माध्यम से बढ़ाया मदद का हाथ

इमेज
समाज सेवा के क्षेत्र में 'सिमरन सेवा एनजीओ का सराहनीय कदम; '* पटेल रिटेल लिमिटेड' ने सी एस आर के माध्यम से बढ़ाया मदद का हाथ उल्हासनगर: रिपोर्टर बाळकृष्ण आल्हाट*                     पिछले 12 वर्षों से निरंतर समाज के जरूरतमंद वर्गों की सेवा में समर्पित 'सिमरन सेवा एन जी ओ के राजकुमार शर्मा के  कार्यों को देखते हुए, प्रसिद्ध रिटेल श्रृंखला 'पटेल रिटेल लिमिटेड' ने अपना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सी एस आर योगदान संस्था को प्रदान किया है। इस सहयोग का उद्देश्य समाज के वंचित लोगों तक आवश्यक सहायता पहुँचाना है समाज सेवा के क्षेत्र में 'सिमरन सेवा एनजीओ का सराहनीय कदम;  पटेल रिटेल लिमिटेड' ने सी एस आर के माध्यम से बढ़ाया मदद का हाथ उल्हासनगर: पिछले 12 वर्षों से निरंतर समाज के जरूरतमंद वर्गों की सेवा में समर्पित 'सिमरन सेवा एनजीओ के कार्यों को देखते हुए, प्रसिद्ध रिटेल श्रृंखला 'पटेल रिटेल लिमिटेड' पटेल लो प्राईसने अपना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सी एस आर योगदान संस्था को प्रदान किय...

अध्यक्ष चषक २०२६:* अंबरनाथ शिवसेना नगरसेवक संघाचा दणदणीत विजय

इमेज
* अध्यक्ष चषक २०२६ :* अंबरनाथ शिवसेना नगरसेवक संघाचा दणदणीत विजय ​ * कल्याण/डोंबिवली:*  शिवसेनेचे कल्याण-डोंबिवलीतील ज्येष्ठ नगरसेवक मा. अर्जुनशेट पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'अध्यक्ष चषक २०२६' या क्रिकेट स्पर्धेत राजकीय मैदानानंतर आता क्रिकेटच्या मैदानावरही अंबरनाथच्या नगरसेवकांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शिवसेना अंबरनाथ नगरसेवक+युवासेना विरुद्ध कल्याण-डोंबिवली नगरसेवक+युवासेना यांच्यात रंगलेल्या प्रेक्षणीय सामन्यात अंबरनाथ संघाने एकतर्फी विजय मिळवत बाजी मारली. ​ * अंबरनाथ संघाची अष्टपैलू कामगिरी*  या अटीतटीच्या लढतीत नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ संघाने मैदानात उतरत उत्कृष्ट रणनीती आखली होती. प्रथम फलंदाजी करताना अंबरनाथ संघाने अवघ्या ४ षटकांत २ गडी गमावून ४६ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये नगरसेवक शैलेश भोईर यांनी स्फोटक फलंदाजी करत संघाला भक्कम धावसंख्या उभारून दिली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना 'सामनावीर' (Man of the Match) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ​ * सार्थक साळुंके यांची ...

उल्हासनगर तहसील कार्यालयामार्फत 'महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न*

इमेज
*उल्हासनगर तहसील कार्यालयामार्फत 'महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न*  ​एकाच छताखाली विविध शासकीय दाखले व सेवांचे वाटप; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ​ *उल्हासनगर:* महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली, उल्हासनगर तहसील कार्यालयाच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' अभियानाचे शनिवारी, ७ मार्च २०२६ रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले. नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवा आणि दाखले विनाविलंब उपलब्ध करून देणे, हा या शिबिराचा *मुख्य उद्देश होता.*  ​तहसीलदार कार्यालयातील कॅम्प नंबर ५ येथे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर पार पडले. तहसीलदार कल्याणी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे जागेवरच वाटप करण्यात आले. ​ *विविध सेवांचा लाभ*  ​या शिबिरात नागरिकांच्या सुविधेसाठी विविध कक्षांची स्थापना करण्यात आली होती, ज्यामध्ये खालील सेवा पुरवण्यात आल्या: ​ *महसूल दाखले:* उत्पन्न द...

कालकथित सावित्रीबाई दामू सुरवाडे यांचा उद्या प्रथम स्मृतिदिन; कल्याण येथे अभिवादन सभेचे आयोजन*

इमेज
* कालकथित सावित्रीबाई दामू सुरवाडे यांचा उद्या प्रथम स्मृतिदिन; कल्याण येथे अभिवादन सभेचे आयोजन*   * कल्याण:*  बहुजन संग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा वृत्तदर्शन मीडियाचे संपादक भीमराव निकम-चिलगावकर यांच्या भगिनी  कालकथित सावित्रीबाई दामू सुरवाडे यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम उद्या, रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दुपारी १२ वाजता लेक कॅन्सल बिल्डिंग (रूम नं. ७०४), बिर्ला कॉलेज जवळ, कल्याण (पश्चिम), जिल्हा ठाणे येथे संपन्न होईल.  * मेहनती आणि संघर्षमय जीवनप्रवास*  सावित्रीबाई सुरवाडे यांचा जीवनप्रवास अत्यंत कष्टप्रद आणि प्रेरणादायी राहिला आहे. मूळच्या वाकडी येथील असलेल्या सावित्रीबाई पतीच्या निधनानंतर आपल्या तीन मुलांसह चिलगाव येथे माहेरी आल्या होत्या. त्यांचे काका रामा निकम (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे खंदे समर्थक) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भीमराव निकम-चिलगावकर व त्यांच्या बंधूंच्या (सुखदेव व श्रावण निकम) सहकार्याने त्यांनी आपल्या मुलांचे संगोपन केले. ' * सावित्रीबाई यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत ...

भारत पुन्हा गुलामगिरीच्या दिशेने; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात*

इमेज
* भारत पुन्हा गुलामगिरीच्या दिशेने; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात*   * मुंबई/ (प्रतिनिधी, अशोक शिरसाट)*  आर.एस.एस.चे इस्रायलशी असलेले संबंध, केंद्राचे परराष्ट्र धोरण आणि अमेरिकेसोबतचे एकतर्फी करार यामुळे भारत पुन्हा एकदा गुलामगिरीच्या दिशेने जात असल्याची भीती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. या धोरणांमुळे भारतीय नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली असून, देशात संतापाची लाट असल्याचे सांगत आंबेडकरांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेल्या 'एपस्टीन फाईल्स' आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या एकतर्फी व्यापार कराराच्या निषेधार्थ सोमवारी मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसर कार्यकर्त्यांच्या घोषणांनी दणाणून गेला होता. ' * मोदी हटाव, देश बचाव'च्या घोषणांनी मुंबई दणाणली*  या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी 'मोदी हटाव, देश बचाव' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आंदोलनाचे गांभीर्य लक्ष...